AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona | देशभरात टीव्ही मालिका-चित्रपटांचं शूटिंग 31 मार्चपर्यंत बंद

31 मार्चपर्यंत देशभरातील सर्व टीव्ही मालिका, चित्रपट, वेब सीरिज यासारख्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं चित्रीकरण बंद ठेवण्यात येणार आहे TV Serial Films shooting to halt

Corona | देशभरात टीव्ही मालिका-चित्रपटांचं शूटिंग 31 मार्चपर्यंत बंद
| Updated on: Mar 15, 2020 | 6:19 PM
Share

मुंबई : ‘कोरोना’ व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वतोपरी उपाय आखले जात आहेत. राज्यभरातील थिएटर आणि नाट्यगृह मार्चअखेरपर्यंत बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता टीव्ही मालिका-चित्रपटांचं शूटिंगही बंद करण्यात येणार आहे. (TV Serial Films shooting to halt)

19 मार्च म्हणजेच येत्या गुरुवारपासून 31 मार्चपर्यंत देशभरातील सर्व टीव्ही मालिका, चित्रपट, वेब सीरिज यासारख्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं चित्रीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. ‘कोरोना’ व्हायरसमुळे भारत सरकारने वैद्यकीय आणीबाणी जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

Corona Care and Locked Down | लॉक डाऊन म्हणजे नेमकं काय?

‘इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशन (इम्पा), फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज आणि इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’च्या बैठकीत एकमताने याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी केंद्राने घेतलेल्या निर्णयांना आमचा पाठिंबा आहे, असंही पत्रकात जाहीर करण्यात आलं.

मालिका-चित्रपटांचं शूटिंग थांबेपर्यंत सेटवर सर्व काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 30 मार्चला परिस्थिती पाहून चित्रीकरण पुन्हा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांसोबतच व्यायामशाळा (जिम), जलतरण तलाव (स्विमिंग पूल) सिनेमागृह, नाट्यगृह, शॉपिंग मॉल्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आर्थिक राजधानी मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईतून राज्यात, देशात किंवा परदेशात कोणत्याही प्रकारचे सामूहिक पर्यटन आयोजित करता येणार नाही.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारताने पाकिस्तान, भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि नेपाळच्या सीमा सील केल्या आहेत. सीमेवरील प्रवासी वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. भारताने याआधीच उच्चपदस्थ अधिकारी वगळता परदेशी नागरिकांचे व्हिसा 15 एप्रिलपर्यंत रद्द करुन त्यांना भारतात प्रवेशबंदी केली आहे.

TV Serial Films shooting to halt

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.