AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रविकांत तुपकरांच्या शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग; लाखोंचे नुकसान

रविकांत तुपकर यांच्या शेतातील सोयाबीन गंजीला आग लावल्याची घटना घडली आहे. यामध्ये 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तुपकरांनी दिली आहे. Unkown person burn soyabean in farm of Ravikant Tupkar

रविकांत तुपकरांच्या शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग; लाखोंचे नुकसान
| Updated on: Oct 17, 2020 | 11:07 AM
Share

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या शेतातील सोयाबीन गंजीला आग लावल्याची घटना घडली आहे. यामध्ये 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तुपकर यांनी दिली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Unkown person burn soyabean in farm of Ravikant Tupkar)

रविकांत तुपकर यांच्या शेतातील 65 ते 70 क्विंटल सोयाबीनच्या गंजीला आग लावल्याने साधारण 3 लाख रुपयांचे नुकसान झालं आहे. ही घटना 16 ऑक्टोबरच्या रात्री घडली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावे, अशी मागणी तुपकर यांनी केली.

बुलडाणा तालुक्यातील सावळा येथे रविकांत तुपकर यांची शेती आहे. स्वत: तुपकर, त्यांच्या पत्नी शर्वरी, आई-वडील आणि भाऊ यांच्या नावावर ही शेती आहे, हे सर्वजण मिळून शेती करतात. यावर्षी त्यांनी शेतात सोयाबीन पेरले होते. नुकतेच सोयाबीन सोंगून शेतात गंजी लावून ठेवले होते. मात्र, रविकांत तुपकर यांच्या सावळा येथील शेतातील सोयाबीन गंजीला रात्री आग लावण्यात आलीय.

सोयाबीनच्या गंजीला आग लावण्याचा प्रकार राजकीय वैमनस्याचा असून ज्यांना समोरासमोर लढायची हिंमत नसते, अशा व्यक्तींनी ही आग लावण्याचे काम केले आहे. कितीही त्रास देण्याचे प्रयत्न केले, तरी माझा आवाज दाबता येणार नाही, अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली.

आई वडिलांनी मेहनतीनं पीक आणलं होतं. अतिवृष्टीमुळे शेतकरी वाईट परिस्थितीत असून त्यांना आधाराची गरज आहे. अशा वेळी सोयाबीन पेटवल्यामुळे शेतकरी भयभीत आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीवंर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तुपकरांनी केली.

संबंधित बातम्या : 

‘लॉकडाउनचा फटका शेती उत्पादनाला, डिझेल-पेट्रोल मिळेना’ : रविकांत तुपकर

Onion Export Ban | वाजपेयींप्रमाणे मोदींचं सरकारही शेतकरीच पाडणार : रविकांत तुपकर

(Unkown person burn soyabean in farm of Ravikant Tupkar)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.