AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनदरम्यान पत्नी माहेरी अडकली, पतीचं चुलत बहिणीसोबत लग्न

लॉकडाऊनदरम्यान पत्नी माहेरी अडकल्यानंतर उत्तर प्रदेशच्या (UP Corona Update) बरेली जिल्ह्यातील एका व्यक्तीने चुलत बहिणीसोबत लग्न केलं.

लॉकडाऊनदरम्यान पत्नी माहेरी अडकली, पतीचं चुलत बहिणीसोबत लग्न
| Edited By: | Updated on: May 23, 2020 | 3:44 PM
Share

(प्रातिनिधीक फोटो)

लखनऊ : लॉकडाऊनदरम्यान पत्नी माहेरी अडकल्यानंतर उत्तर प्रदेशच्या (UP Corona Update) बरेली जिल्ह्यातील एका व्यक्तीने चुलत बहिणीसोबत लग्न केलं. पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेने ‘मेरा हक’ या सामाजिक संस्थेकडे मदत मागितली आहे. ही संस्था केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची बहिण फरहत नकवी यांची आहे. ज्या महिलेच्या पतीने दुसरं लग्न केलं तिचं नाव नसीम असं आहे (UP Corona Update).

नसीमचं 2013 साली नईम मंसूरी या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. या दाम्पत्याला तीन मुलं आहेत. नसीम 3 मार्च रोजी आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी माहेरी गेली होती. मात्र, याचदरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे नसीमला आपल्या माहेरीच थांबावं लागलं. यादरम्यान नसीमच्या पतीने आपल्या चुलत बहिणीसोबत लग्न केलं. तो तिच्यासोबतच राहू लागला.

पतीच्या लग्नाची माहिती मिळताच नसीमला धक्काच बसला. त्यानंतर प्रचंड खटाटोप करत नसीम तिच्या सासरी पोहोचली. सासरी पोहोचल्यावर तिने क्रोध व्यक्त केला. पतीला दुसऱ्या लग्नाबाबत जाब विचारला. पतीने दोघी पत्नींना सोबत घेऊन संसार करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, नसीमने या गोष्टीला विरोध केला आहे. आपल्याला न्याय मिळावा यासाठी तिने ‘मेरा हक’ संस्थेकडे मदत मागितली आहे.

दरम्यान याप्रकरणी लवकरच पोलिसात तक्रार दाखल केली जाईल. नसीमला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वोत्तोपरी मदत करत आहोत, अशी प्रतिक्रिया ‘मेरा हक’ संस्थेच्या संचालिका फरहत नकवी यांनी दिली.

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाखांच्या उंबरठ्यावर

देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 96 हजार 169 वर पोहोचला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशभरात गेल्या 24 तासात 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 36 हजार 824 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या देशभरात 56 हजार 316 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

संबंधित बातम्या :

गडचिरोलीत ‘कोरोना’चा शिरकाव, मुंबई-पुण्याहून आलेल्या तिघांना लागण

औरंगाबादेतील ‘कोरोना’ग्रस्त एक हजाराच्या पार, 59 नव्या रुग्णांची वाढ, कुठे किती रुग्ण आढळले?

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.