AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार मुलांच्या आईचा सेल्समनवर जडला जीव, नवऱ्याचा जीव घेऊन नदीत फेकलं

प्रेमसंबंधांना असलेल्या विरोधातून महिला आणि तिच्या प्रियकराने तिच्या पतीचा जीव घेतल्याचं समोर आलं. हत्येनंतर आरोपींनी मृतदेह पेटीत भरुन जवाहर पुलावरुन यमुना नदीत फेकून पळ काढला होता.

चार मुलांच्या आईचा सेल्समनवर जडला जीव, नवऱ्याचा जीव घेऊन नदीत फेकलं
| Updated on: Nov 19, 2019 | 11:39 AM
Share

आग्रा : प्रेमात आंधळ्या झालेल्या विवाहितेने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये उघडकीस आली आहे. 15 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या हरिओम सिंह याचा शोध घेताना उलगडलेलं रहस्य पोलिसांनाही अवाक करणारं (Wife Kills Husband with Boyfriend) होतं.

सिकंदरा भागातील राधानगरमध्ये राहणारा कामगार हरिओम सिंह तीन नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. पत्नी बबली आणि तिचा प्रियकर कमल यांनीच हरिओमची हत्या केल्याचा संशय सुरुवातीपासून पोलिसांना होता. अखेर प्रेमसंबंधांना असलेल्या विरोधातून दोघांनी हरिओमचा जीव घेतल्याचं समोर आलं. हत्येनंतर बबली आणि कमल यांनी मृतदेह पेटीत भरुन जवाहर पुलावरुन यमुना नदीत फेकून पळ काढला होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून मृतदेहाचा शोध सुरु आहे.

36 वर्षांचा हरिओम सिंह हा राजवीर चेन फॅक्टरीत नोकरी करत होता. 17 वर्षांपूर्वी त्याचा विवाह बबली सिंह हिच्याशी झाला होता. त्यांना ज्योती, राशी, नमन आणि गुड्डू अशी चार मुलं आहेत. ‘अमर उजाला’ वेबसाईटने यासंदर्भात बातमी दिली आहे.

प्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

बबलीचा प्रियकर असलेला आरोपी करण हा साडीच्या दुकानात काम करत होता. फेब्रुवारी महिन्यात दोघांची ओळख झाली होती. हरिओमलाही या प्रेमसंबंधांची कुणकुण लागली होती. त्याने बबलीला विरोध केला, पण तिने काहीएक ऐकलं नाही.

बबली आणि हरिओम चौघा मुलांसह वीस दिवसांपूर्वी राधानगर भागात राहायला आले. ज्योती आणि नमन ही मुलं आजोबा राजवीर यांच्याकडे राहायला गेली, तर राशी आणि गुड्डू त्यांच्यासोबतच राहत होती. तीन तारखेला अचानक हरिओम बेपत्ता झाला. बबली आणि दोन्ही मुलांशीही संपर्क न होऊ शकल्यामुळे राजवीर यांनी पोलिसात तक्रार नोंदवली.

पोलिसांच्या तपासात बबली आणि कमल यांनीच हरिओमची हत्या केल्याचं समोर आलं. दोघांनी त्याची गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. बबलीने सांगितलेला घटनाक्रम चक्रावून टाकणारा आहे.

घटनेच्या दिवशी हरिओमने आपल्याला मारहाण केली, असा दावा बबलीने केला. बबलीने फोनवरुन कमलला याविषयी सांगितलं. तो रात्री साडेअकरा वाजता घरी आला. दोघांमध्ये वादावादी झालं. कमलने हरिओमची गळा दाबून हत्या केली. पकडलं जाण्याच्या भीतीने बबली कमलसोबत निघाली.

कमलने रात्री अडीच वाजता रिक्षा बूक केली. मृतदेह पेटीत भरुन ते निघाले. यमुना नदीजवळ जवाहर पुलावर त्यांनी रिक्षा थांबवली. पेटी नदीत फेकून दोघं दिल्लीला (Wife Kills Husband with Boyfriend) पळाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.