AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरी चिंचवडमध्ये पाणीबाणी; नागरिकांसाठी पालिकेचा मोठा अलर्ट

एकीकडे कोरोनाचं संकट तर आता दुसरीकडे पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये पाणीबाणी; नागरिकांसाठी पालिकेचा मोठा अलर्ट
| Edited By: | Updated on: Oct 06, 2020 | 9:37 AM
Share

पिंपरी चिंचवड : राज्यात आधीच कोरोनाच्या महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशात पुण्यात कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका आहे. एकीकडे कोरोनाचं संकट तर आता दुसरीकडे पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद राहणारा असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. (water supply will be cut off today and tomorrow in pimpri Chinchwad)

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा दिला जाणाऱ्या रावेत इथल्या जलउपसा केंद्रातील उच्चदाब वीज संच मांडणीचं अचानक काम उद्भवलं आहे. उपस्कर वाहिनीचे तातडीने दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्याने संपूर्ण शहरात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती आहे.

पालिकेने सांगितल्यानुसार, आज सकाळी 11 ते 12.30 या कालावधी जलउपसा बंद राहणार आहे. त्यामुळे 12 नंतरचा, सायंकाळचा आणि रात्रीचा तसंच दूसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळचा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने किंवा विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे चिंचवडकरांनी याची दक्षता घेत पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पुरेसा पाणीसाठा घरात भरून ठेवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचं आवाहन महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे. (water supply will be cut off today and tomorrow in pimpri Chinchwad)

खरंतर, यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे पुणेकरांची तहान भागवणारी सर्व धरणं चांगली भरली आहेत. त्यामुळे वर्षभरासाठी पुणेकरांची तहान भागली असं म्हणायला हरकत नाही. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने चारही धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. चारही धरणांमध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत 18.13 टीएमसी म्हणजेच 62.21% टक्के पाणीसाठा होता, आता त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांची वर्षभर तहान भागणार आहे. पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी जलसाठा आहे.

गेल्या वर्षीच्या 29.15 टीएमसी म्हणजेच 100 टक्क्याच्या तुलनेत जलसाठा कमी आहे. त्यामुळे यंदा धरण पूर्ण भरल्यास जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. जुलै महिन्यात पाणी साठा कमी झाल्यानं पाणी कपातीची टांगती तलवार होती.

इतर बातम्या – 

ट्रम्प खरंच कोरोना पॉझिटिव्ह होते की होता पॉलिटिकल स्टंट? अमेरिकेत चर्चेला उधाण
Alert! ताशी 24046 किमी वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतोय लघुग्रह, विमानाइतका आहे आकार

(water supply will be cut off today and tomorrow in pimpri Chinchwad)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.