AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“एक वेळ माझा गळा चिरा, पण…” ममता बॅनर्जी आक्रमक

राज्य सरकारकडून तातडीने मदत मिळावी यासाठी कोलकाता आणि इतर भागातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन निदर्शनं केली. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वांना शांत होण्याचं आवाहन केलं (West Bengal CM Mamata Banerjee).

एक वेळ माझा गळा चिरा, पण... ममता बॅनर्जी आक्रमक
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 24, 2020 | 4:25 PM
Share

कोलकाता :  “एकवेळ माझा गळा चिरा, पण शांत राहा“, असं आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी राज्य सरकारविरोधात निदर्शने देणाऱ्या नागरिकांना केलं आहे. अम्फान चक्रीवादाळामुले पश्चिम बंगालमध्ये जवळपास 1 लाख कोटींचं नुकसान झालं आहे. यादरम्यान राज्य सरकारकडून तातडीने मदत मिळावी यासाठी कोलकाता आणि इतर भागातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन निदर्शनं केली. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वांना शांत होण्याचं आवाहन केलं.

“राज्य सरकार दिवस-रात्र संपूर्ण परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. सर्व सुरळीत होईल. कृपया शांतता राखा. याव्यक्तीरिक्त मी तुम्हाला एकच सांगेल की, एकवेळ माझा गळा चिरा, पण शांत राहा”, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या (West Bengal CM Mamata Banerjee).

अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक भागांमध्ये वीज पूर्णपणे ठप्प झाली आहे. या परिस्थितीत पश्चिम बंगाल सरकारने तातडीने सोयीसुविधा पुरवाव्यात यासाठी कोलकाता आणि विविध भागातील शेकडो नागरकांनी रस्त्यावर येत पश्चिम बंगाल सरकारविरोधात निदर्शने दिली.

बैरकपूर-सोदेपूर बायपास परिसरात आंदोलनकर्त्यांची रस्त्यावर मोठी गर्दी उसळली होती. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाली. दरम्यान, पश्चिम बंगालची परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारला सर्वसामान्यांच्या सहकार्याची देखील आवश्यकता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शांततेचं आवाहन केलं आहे.

अम्फान चक्रिवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये 86 जणांचा मृत्यू झाला आहे. चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळ आणि इतर परिसरातही पाणी साचलं होतं. चक्रिवादळाच्या तीन दिवसांनंतरही काही भागांमधील परिस्थिती पूर्ववत होऊ शकलेली नाही.

(West Bengal CM Mamata Banerjee)

हेही वाचा :

पॅकेज घोषित कशाला करत बसायचं? थेट मदत करायची : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

India Corona Update | 24 तासात देशात 6,767 नवे रुग्ण, 147 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक