कोरोनाच्या दोन लसींमध्ये किती अंतर असावं? सरकारी पॅनलची नवी सूचना लस सर्वांपर्यंत पोहोचवणार?

कोरोनाचा दुसरा डोस कधी घ्यावा याबाबत असलेला संभ्रम आज दूर झाला. (corona vaccination procedure and standard method)

कोरोनाच्या दोन लसींमध्ये किती अंतर असावं? सरकारी पॅनलची नवी सूचना लस सर्वांपर्यंत पोहोचवणार?
VACCINATION
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 5:16 PM

मुंबई : सध्या कोरोना लस घेण्यासाठी जो तो उत्सुक आहे. ही लस आली तेव्हा कित्येक जण लसीकरण केंद्राकडं फिरकायलाही तयार नव्हते. पण आता पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत लसीकरण केंद्रावर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतायत. लस मिळण्याची खात्री नसतानासुद्धा लोक मे महिन्यातल्या उन्हात थांबण्यासाठी तयार आहेत. (what gap should be in second dose of Covid vaccine here are all details)

काय आहेत NTAGIच्या शिफारशी ?

कोरोनाचा दुसरा डोस कधी घ्यावा याबाबत असलेला संभ्रम आज दूर झाला. लसीकरणासंबंधी केंद्र सरकारनं नेमलेल्या पॅनेलनं सर्वच शंकांना उत्तर मिळतील अशा शिफारसी केल्यात. नॅशनल टेक्निकल अडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन अर्थात NTAGIनं या शिफारशी केल्यात. काय आहेत या शिफारशी वाचा सविस्तरपणे…

1) कोविशील्डची लस घेतलेल्यांनी दुसरा डोस 12 ते 16 आठवड्यांनंतरच घ्यावा म्हणजे तीन ते चार महिन्यांचे अंतर ठेवावे असं या पॅनलनं सुचवलंय. सध्या हे अंतर चार ते आठ आठवडे म्हणजे एक ते दोन महिने इतकं आहे. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटनं ही कोविशील्ड लस बनवली आहे.

2) जे रुग्ण कोरोनातून बरे झालेयत त्यांनी सहा महिने कोणतीही लस घेऊ नये असं या पॅनेलनं सुचवलंय.

3) गरोदर महिलांनी बाळंतपणानंतर कोविशील्ड किंवा कोवॅक्सिन अशी कोणतीही लस घ्यावी, त्यात काहीही धोका नाही असं या पॅनेलनं म्हंटलंय.

4) स्तनपान करणाऱ्या महिलांनाही लस घ्यायला या पॅनलनं आपल्या शिफारशींत हिरवा कंदील दाखवलाय.

कोवॅक्सिनच्या दोन डोसमधलं अंतर मात्र सध्या जेवढे आहे तेवढंच म्हणजे चार ते आठ आठवडे इतकंच आहे. भारतात सध्या कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या दोनच लसी दिल्या जातायत आणि देशभर 18 कोटी लोकांना या लसी देण्यात आल्यात. केंद्र सरकारनंही राज्यांना दिलेल्या सूचनांमध्ये दोन डोसमधले अंतर चार ते सहा आठवडे आणि चार ते आठ आठवडे ठेवा असं सांगितलं होतं. नॅशनल टेक्निकल अडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन अर्थात NTAGIनं या शिफारशी ‘नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन’कडे पाठवल्या आहेत.

द लॅन्सेट जर्नल काय म्हणतंय ?

द लॅन्सेट या जगप्रसिद्ध जर्नलनंही दोन डोसमधल्या अंतराबद्दल भाष्य केलंय. दोन डोसमधलं अंतर सहा आठवड्यांऐवजी 12 आठवडे राहावं म्हणजे लसीचा अधिकाधिक प्रभाव राहण्यासाठी दीड महिन्यांऐवजी तीन महिन्यानंतर दुसरा डोस घ्यावा असं लॅन्सेटनं म्हंटलंय. पहिला डोस घेतल्यानंतरच्या तीन महिन्यांत कोरोनापासून 76 % संरक्षण होते असं लॅन्सेटचं मत आहे. दुसरा डोस तीन महिन्यांनंतर घेतला तर रोगप्रतिकारक शक्तीही पुढे फार काळपर्यंत टिकते असं लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेला अभ्यास सांगतो.

भारतातील लसीकरण मोहिमेचे टप्पे

भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाची मोहिम सुरु झाली. 2 फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्सना लस देणे सुरु झालं. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठांसाठी लस उपलब्ध झाली. ज्येष्ठांसोबत को-मॉर्बिड असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस देणे सुरु झाले. 1 मे पासून 45 वर्षांवरील सर्वांनाच लस उपलब्ध झाली, पण लसीच्या तुटवड्यामुळं काही ठिकाणीच हे लसीकरण होऊ शकलं. अनेक राज्यांनी तर 45 वर्षांवरील नागरिकांना लस सुरुही केली नाही. महाराष्ट्रात 1 मे रोजी 45 वर्षांवरील नागरिकांना लस उपलब्ध झाली, पण लसटंचाईमुळं 14 तारखेपासून ती बंद करण्यात आली. पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस प्राधान्यानं देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

लसीचं उत्पादन किती होणाराय ?

सगळा देश लस टंचाईला सामोरा जात असतानाच सिरम आणि भारत बायोटेक कंपन्यांनी पुढल्या 4 महिन्यांचा लस उत्पादनाचा प्लॅन केंद्र सरकारला पाठवलाय. सिरमनं आम्ही ऑगस्टपर्यंत 10 कोटी लसींचे उत्पादन करु असं म्हंटलंय तर भारत बायोटेकनं ऑगस्टपर्यंत 7.5 कोटी डोस बनवू असं म्हंटलंय. म्हणजे पुढल्या चार महिन्यांत भारतात फक्त 17.5 कोटी डोसचं उत्पादन होणार आहे. भारतात आतापर्यंत 13.66 कोटी लोकांना पहिला डोस तर फक्त 3.86 कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आलाय.

इतर बातम्या :

लॉकडाऊन वाढल्यामुळे व्यापारी ठाकरे सरकाविरोधात आक्रमक; तोडगा न काढल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

Maharashtra Coronavirus LIVE Update : शहापूरमध्ये 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन, नागरिकांकडून नियमांची पायमल्ली 

(what gap should be in second dose of Covid vaccine here are all details)

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.