AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गावाने संकटाचंही सोनं केलं, भर दुष्काळातही शेकडो हातांना काम

पंढरपूर : दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना रोजी-रोटीसाठी स्थलांतर करावे लागते. पण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील 700 लोकसंख्या असलेलं गाव या परिस्थितीला अपवाद आहे. येळगी गावातील लोक स्थलांतर न करता दगड फोडून पोट भरतं. येथील गावकऱ्यांनी स्थलांतर न करता गावातील दगड फोडून पोट भरलेलं बरं असं म्हणत खडी क्रशरची उभारणी करून जगण्याचा नवा मार्ग शोधला. दगड […]

या गावाने संकटाचंही सोनं केलं, भर दुष्काळातही शेकडो हातांना काम
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM
Share

पंढरपूर : दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना रोजी-रोटीसाठी स्थलांतर करावे लागते. पण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील 700 लोकसंख्या असलेलं गाव या परिस्थितीला अपवाद आहे. येळगी गावातील लोक स्थलांतर न करता दगड फोडून पोट भरतं. येथील गावकऱ्यांनी स्थलांतर न करता गावातील दगड फोडून पोट भरलेलं बरं असं म्हणत खडी क्रशरची उभारणी करून जगण्याचा नवा मार्ग शोधला. दगड फोडून पोट भरणारं गाव अशी या गावाची ओळख निर्माण झाली आहे. शिवाय या माध्यमातून गावाची आर्थिक घडी व्यवस्थित बसली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी येळगी हे 700 लोकवस्तीचं गाव. जमिनीत फूटभर खोदल्यानंतर दगडच दगड. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अशी शेतजमीन कसताना सर्वांच्याच नाकीनऊ येते. त्यामुळे कोरड्या शेतावर जगायचं तरी कसं असं म्हणत काही ग्रामस्थांनी दुसऱ्या गावाला स्थलांतर करीत आपले बस्तान बसविले. तर गावातील काही तरुणांनी एकत्रित येत 10 वर्षांपूर्वी एक खडी क्रशर सुरु केला.

गावात पाच ते सहा लहानमोठे खडी क्रशर सुरु उभारले आहेत. प्रत्येक क्रशरवर सात कुशल-अकुशल कामगार, ट्रॅक्टर, टिपर, जेसीबीच्या माध्यमातून सुमारे 20 जणांना रोजगार मिळाला आहे. गावातील जवळपास 100 हून अधिक कुटुंबातील सदस्यांना या माध्यमातून रोजगार मिळाल्याने काम मागणारे गावं आज काम देणारे ठरले आहे. हे सर्व करत असताना शासनालाही रॉयल्टीच्या माध्यमातून दरवर्षी लाखोंचा महसूल मिळू लागला आहे.

येथील शेतकऱ्यांनी दगड खाणींचा शेततळी म्हणून वापर केला आहे. खाणीत पाणी साठल्यामुळे या भागातील विहीरी आणि बोअरची पाणी पातळी देखील टिकून आहे. अन्य दुष्काळी गावात पाण्याचे टँकर सुरु असताना येथे मात्र पाण्याचा सुकाळ आहे. येथील शेतकऱ्यांनी खाणीतील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करत 80 एकर क्षेत्रावर डाळिंब, द्राक्षांसारख्या फळपिकांची लागवड केली. शिवाय चाऱ्याचाही प्रश्न सुटला आहे. दुष्काळी येळगीच्या तरुणांनी क्रशरच्या माध्यमातून आर्थिक प्रगती तर साधली आहेच. शिवाय या माध्यमातून पाण्याची मोठी बँकही तयार केली आहे. ऐन दुष्काळात येळगी गाव पाण्याने देखील समृद्ध झालं आहे.

पाऊस कमी पडल्यानंतर ओसाड रान पाहण्यापलीकडे शेतकऱ्यांकडे काहीही पर्याय नसतो. पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते काम शेतकरी करतात. पण रोजगाराचे साधने अत्यंत मर्यादित असतात. पण दुष्काळात कसं रहायचं याचं उदाहरण येळगी गावाने घालून दिलं आहे. प्रत्येक गावच्या ग्रामस्थांनी आणि सरपंचाने हा आदर्श घेणं गरजेचं आहे.

Follow Us
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?