AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Natural Remedies: कपाळावर चंदनाचा लेप लावल्याने होतील ‘हे’ 5 आरोग्यदायी फायदे

चंदन अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे, म्हणूनच ते केवळ पूजेसाठीच फायदेशीर नाही तर तुमच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. कपाळावर चंदनाचा लेप लावल्यानेही अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊयात.

Natural Remedies: कपाळावर चंदनाचा लेप लावल्याने होतील 'हे' 5 आरोग्यदायी फायदे
5 health benefits of applying chandan on forehead Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 30, 2025 | 8:12 PM
Share

हिंदू धर्मात चंदनाचं अनन्यासाधारण महत्त्व आहे. सर्व प्रकारच्या विधिंमध्ये चंदन पवित्र मानलं जातं. पूजा-पाठ, होम-हवन यांसाठीही चंदन लावलं जातं. तसेच याच चंदनाचे तुमच्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते, म्हणूनच आपण पाहतोच की सर्वाधिक ब्युटी प्रॉडक्टमध्ये चंदनाचा वापर केला जातो. त्यातच आपण पाहिलं असेल की लोकं कपाळावर चंदनाचा टिळा लावतात. कारण त्यामागचे अनेक स्वास्थ्याकारक फायदे आहेत. याकरिता तुम्ही सुद्धा कपाळावर चंदनाची पेस्ट लावू शकता, कारण त्यात अनेक एंजाइम आणि पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे. चंदनाच्या वापराने तुमच्या पोटाशी संबंधित असलेल्या समस्या जसे की अतिसार, पोटदुखी इत्यादी दूर होतात. तसेच चंदनाचे तेल देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर आपण चंदनाच्या औषधी गुणधर्मांच्या प्रमाणाबद्दल बोललो तर ते चंदनाच्या गुणवत्तेवर आणि त्याच्या प्रकारावर (पांढरे चंदन, लाल चंदन, पिवळे चंदन) अवलंबून असते.

चंदनाचा सुगंध एक आल्हाददायक अनुभूती देतो. त्याचे गुणधर्म सौंदर्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. ते अनेक प्रकारे वापरले जाऊ शकते. जसे की देवघरात सुगंधासाठी लोकं चंदनाचे तेल देखील वापरतात. पण अशातच कपाळावर चंदनाचा लेप लावल्याने आरोग्याच्या कोणत्या समस्या दूर होऊ शकतात तसेच चंदन आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे , ते जाणून घेऊया.

उन्हाळ्यातील डोकेदुखीपासून आराम

चंदनामध्ये नैसर्गिक थंडावा असतो, म्हणून ते कपाळावर लावल्याने उन्हाळ्यात होणाऱ्या डोकेदुखीपासून खूप आराम मिळतो आणि स्नायूंचा ताणही कमी होतो. चंदनाचा सुगंध मनाला शांत करतो आणि अस्वस्थता कमी करतो.

शरीराचे तापमान कमी होते

उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराचे तापमान वाढण्याची समस्या खूप सामान्य आहे. अशातच या दिवसांमध्ये शरीराचे तापमान कमी करण्यासाठी कपाळावर चंदनाचा लेप लावा. त्यासोबत तुम्हाला जर सामान्य ताप असला तरी, कपाळावर चंदनाचा लेप लावल्याने खूप आराम मिळतो.

निद्रानाशातून आराम मिळतो

रात्रीच्या वेळी निद्रानाशाची समस्या असलेल्यांसाठी कपाळावर चंदनाचा लेप लावणे देखील फायदेशीर आहे. ज्यामुळे तुम्हाला अधिक सक्रिय आणि ताजेतवाने वाटते.

एकाग्रता वाढते

कपाळावर चंदनाचा लेप लावल्याने थंडावा मिळतो आणि तणावही कमी होतो, ज्यामुळे नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळते आणि एकाग्रता वाढते. तसेच चंदनाचा सुगंधाने तुम्हाला आराम मिळतो.

मेंदूसाठी फायदेशीर

तुम्ही जेव्हा कपाळावर चंदन लावता तेव्हा ताण कमी होतो, निद्रानाश दूर होतो, एकाग्रता वाढते आणि त्याचा सुगंध मज्जासंस्थेलाही आराम देतो. त्याचे सुखदायक आणि दाहक-विरोधी गुणधर्म मेंदूचे एकूण आरोग्य सुधारते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.