AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात सर्वाधिक खाल्ले जाणारे लोकप्रिय 7 खाद्यपदार्थ परदेशात पूर्णपणे ‘बॅन’; खाल्ले तर थेट शिक्षीच, कारण वाचून आश्चर्य वाटेल

आपल्या भारताची खाद्यसंस्कृती किती प्रसिद्ध आहे हे तर सर्वांनाच माहित आहे. आपल्या देशात लाखो प्रकारचे पदार्थ बनतता. पण तुम्हाला माहितीये का की, आपल्या देशात सर्वात जास्त खाल्ले जाणारे आणि लोकप्रिय असणारे असेत 7 पदार्थ आहेत जे परदेशात पूर्णपणे बॅन आहेत. त्या पदार्थांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

भारतात सर्वाधिक खाल्ले जाणारे लोकप्रिय 7 खाद्यपदार्थ परदेशात पूर्णपणे 'बॅन'; खाल्ले तर थेट शिक्षीच, कारण वाचून आश्चर्य वाटेल
7 most popular foods eaten in India are completely banned abroadImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 19, 2025 | 2:21 PM
Share

भारतीय लोक खाण्या-पिण्याचे खूप शौकीन असतात. आणि आपण जेव्हा जेव्हा खाद्यसंस्कृतीचा विचार करतो तेव्हा सर्वात आधी भारताचं नाव समोर येत. कारण भारतात जेवढ्या धर्माचे लोक राहतात तेवढ्याच खाद्यसंस्कृती देखील विविध पाहायला मिळतात. आपल्या देशात लाखो प्रकारचे खाद्यपदार्थ तयार होत असतात.ते खूप आवडीने खाल्लेही जातात. पण हे अनेकांना माहित असेल कि भारतीतील सर्वात जास्त खाल्ले जाणारे आणि लोकप्रिय असणारे पदार्थ परदेशात मात्र बॅन करण्यात आले आहेत. चला, जाणून घेऊया कोणते पदार्थ आहेत आणि त्या पदार्थांवर बंदी का आहे ते?

समोसा

भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ सारख्या अनेक देशांमधील लोकांना समोसा आवडतो. आपण भारतीय समोसा चहासोबत नाश्त्यासाठी आणि स्कॅन्स म्हणून कधीही खातो . पण आफ्रिकन देश सोमालियामध्ये समोसा खाण्यास बंदी आहे. या देशात समोसा बनवण्यासाठी, खरेदी करण्यासाठी आणि खाण्यासाठी लोकांना थेट शिक्षा दिली जाते. यामागील कारण म्हणजे त्याचा त्रिकोणी आकार. येथे, अल शबाद गटाचे लोक त्रिकोणी आकाराला ख्रिश्चन धर्माचे प्रतीक मानतात. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की येथे समोशामध्ये कुजलेले मांस भरले जात होते, ज्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली.

केचप

बर्गर असो, पिझ्झा असो किंवा फ्रेंच फ्राईज असो, कोणतेही स्कॅन्स केचपशिवाय पूर्ण होत नाही. जगभरात केचप मोठ्या आवडीने खाल्लं जातं. भारतातही लोक ते समोसे, बटाट्याचे पॅटीज आणि पकोड्यांसोबत खातात. लहान मुलांना तर त्याची चव इतकी आवडते की त्यांचे जेवण त्याशिवाय पूर्ण होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की फ्रेंच सरकारने केचपवर बंदी घातली आहे? यामागील कारण म्हणजे तेथील किशोरवयीन मुले ते जास्त प्रमाणात खात होती.

च्यवनप्राश

भारतात, लोक हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी च्यवनप्राश खातात. त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे लोकांना ते खायला आवडतं. पण 2005 मध्ये कॅनडामध्ये च्यवनप्राशवर बंदी घालण्यात आली होती. बंदी घालण्यामागील कारण म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणात शिसे आणि पारा असतो असं म्हटलं गेलं.

तूप

भारतात तूप म्हणजे हेल्थी पदार्थ जो प्रत्येकाच्या घरात असतोच असतो. एवढंच काय तर, मिठाई, पराठे, रोटी, डाळ, भाज्या इत्यादी जवळजवळ प्रत्येक पदार्थात तूप वापरले जाते. लोक पराठे आणि रोटीवर देखील भरपूर तूप घालतात. पण अमेरिकेत तूपावर बंदी आहे. तिथल्या अन्न आणि औषध प्रशासनाचा असा विश्वास आहे की तूप खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका, रक्तदाब आणि लठ्ठपणा येऊ शकतो. म्हणून तुप खाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

च्युइंग गम

अनेक लोकांना च्युइंग गम चघळताना पाहिले असेल. काही लोक ते स्टाईल म्हणून खातात तर काही जण डबलचीनची एक्सरसाईज म्हणून. पण 1992 पासून सिंगापूरमध्ये च्युइंग गमवर बंदी घालण्यात आली आहे. खरंतर, येथील बरेच लोक च्युइंग गम खाल्ल्यानंतर कुठेही थुंकत असत, ज्यामुळे तिथे घाण पसरत असे. सिंगापूर त्याच्या स्वच्छतेसाठी खूप प्रसिद्ध आहे, म्हणून लोक ते कुठेही फेकू किंवा चिकटवू नये म्हणून येथे च्युइंग गमवर बंदी घालण्यात आली आहे.

खसखस

भारतात, खसखसचा वापर अनेक गोष्टींमध्ये केला जातो.अनेकदा गोड पदार्थ बनवायला तर खमंग चव लागण्यासाठी खसखस वापरतो. परंतु सिंगापूर, तैवान, सौदी अरेबिया आणि युएई सारख्या देशांमध्ये त्यावर बंदी आहे कारण त्यात मॉर्फिन असतं असं म्हटलं आहे.

तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....