AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या 5 वर्षांनंतर पाळणा हलला, महिलेने एक-दोन नव्हे… ‘इतक्या’ बाळांना दिला जन्म

या महिलेला लग्नानंतर पाच वर्षे मुल झाले नव्हते.त्यामुळे या महिलेने आता इतक्या अपत्यांना जन्म दिल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. आई आणि बाळांची तब्येत उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

लग्नाच्या 5 वर्षांनंतर पाळणा हलला, महिलेने एक-दोन नव्हे... 'इतक्या' बाळांना दिला जन्म
| Updated on: Oct 14, 2025 | 10:56 PM
Share

बिहार येथील मोतीहारी भागात एका विवाहितेने एकाच वेळी चार मुलांना जन्म दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आई आणि बाळ दोघांची प्रकृती उत्तम आहे. या महिलेचा विवाह होऊन पाच वर्षे झाल्यानंतर तिची ही पहिलीच प्रसूती झाली आहे. या महिलेने एक मुलगा आणि तीन मुलींना जन्म दिला आहे.

बिहार राज्यातील मोतिहारी वात्सल्य नर्सिग होम एण्ड आयव्हीएफ सेंटर येथे एका महिलेने चार बाळांना जन्म दिला आहे. विसुनपुर ढेकहा येथे रहाणारे पप्पू कुमार चौधरी यांची पत्नी रंजू देवी यांनी सकाळी चार अपत्यांना जन्म दिला. यात तीन मुली आणि एक मुलगा आहे. यामुळे या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

मोतीहारी येथील हॉस्पिटल रोड स्थित वात्सल्य नर्सिंग होम एण्ड आयव्हीएफ सेंटरच्या डॉ.स्वास्तिक सिन्हा आणि डॉ.अनन्या सिन्हा यांच्या टीमने हे ऑपरेशन केले. डॉक्टरांनी सांगितले की ऑपरेशन यशस्वी झाले असून आई आणि बाळांची तब्येत चांगली आहे.

रंजू देवी यांना लग्नाला सुमारे पाच वर्षे झाली आहेत. त्यांची ही पहिलीच प्रसुती आहे. चार मुलांना एकाच वेळी जन्म दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वात्सल्य नर्सिंग होम डॉक्टर अनन्या सिन्हा यांनी सांगितले की हे प्रकरण दुर्मिळ आहे. कारण एकाच वेळी इतक्या मुलांना जन्म देण्याची घटना कमी घडत असते.

सध्या या बाळांना डॉक्टरांच्या विशेष देखरेखी खाली ठेवले आहे. या बाळांची प्रकृती सामान्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अनोख्या बातमीमुळे या गावात आनंदाचे वातावरण आहे. आजुबाजूचे लोकही या दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. रंजू देवी आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा महत्वाचा दिवस ठरला आहे. एकाच वेळी चार बाळांना त्यांनी जन्म दिल्याने त्यांचे सर्वत कौतूक होत आहे.

Follow Us
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल