AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सनस्क्रीन लावताना तुम्हीही या चुका करता का ? या गोष्टी जाणून घ्याच

त्वचेचं नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी प्रत्येक ऋतूमध्ये सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. पण अनेक वेळा आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे सनस्क्रीन त्वचेवर कमी परिणामकारक ठरतं. त्या चुका कोणत्या , हे समजून घेऊया.

सनस्क्रीन लावताना तुम्हीही या चुका करता का ? या गोष्टी जाणून घ्याच
Image Credit source: freepik
| Updated on: Jul 07, 2023 | 4:53 PM
Share

Sunscreen Mistakes : उन्हाळा असो किंवा पावसाळ्याचा ऋतू, नाहीतर कडाडती थंडी, त्वचेचे नुकसान होण्यापासून (skin care) वाचवण्यासाठी प्रत्येक ऋतूमध्ये सनस्क्रीन (sunscreen) लावणे आवश्यक आहे. हानीकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन हे प्रोटेक्टिव्ह बॅरिअर म्हणून कार्य करते. परंतु अनेक वेळा त्वचेवर सनस्क्रीन लावल्याने अपेक्षित परिणाम मिळत नाही.

जर तुम्हालाही हा त्रास जाणवत असेल तर याचाच अर्थ की तुम्ही सनस्क्रीन लावताना काही चुका करत आहात. सनस्क्रीन लावण्याशी संबंधित काही चुका जाणून घेऊया, ज्या बऱ्याच लोकांना कदाचित माहितही नसतील.

 कमी सनस्क्रीन लावणे

यातील सर्वात सामान्य चुकांपैकी एक म्हणजे योग्य प्रमाणात किंवा पुरेसं सनस्क्रीन न लावणे. त्यामुळे त्वचेचा जो भाग प्रकाशाच्या किंवा सूर्यकिरणांच्या संपर्कात येतो, त्यावर योग्य प्रमाणात सनस्क्रीन लावा. त्यामुळे एक्सपोजर मिळणारा शरीराचा भाग किंवा अवयवाला त्रास होणार नाही.

चेहऱ्याच्या काही भागांवर सनस्क्रीन न लावणे

अनेकदा लोक कानाच्या मागच्या बाजूला, मानेला, ओठांना आणि पायाच्या वरच्या भागाला सनस्क्रीन लावत नाहीत. या ठिकाणी सनबर्नचा धोका जास्त असतो. त्यामुळे सनस्क्रीन लावताना शरीराच्या या भागांवरही सनस्क्रीन आवर्जून लावा.

अर्धा तास आधी सनस्क्रीन लावा

बाहेर जायच्या किमान 15 ते 30 मिनिटे आधी सनस्क्रीन लावावे जेणेकरून ते त्वचेत योग्यरित्या शोषले जाईल आणि चांगले संरक्षण देईल.

परत न लावणे

जर तुम्ही पोहत असाल, जिममध्ये घाम येत असेल तर दर दोन तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावा. बरेच लोक चेहऱ्यावर सनस्क्रीन लावायला विसरतात, ज्यामुळे त्यांना उन्हापासून पूर्ण संरक्षण मिळत नाही. तसेच काही लोकं असेही असतात, जे ढगाळ हवामान असताना सनस्क्रीन लावत नाहीत. पण अशा हवामानातही सनस्क्रीन लावणे आवश्यक असते.

एक्सपायरी डेट तपासा

तुमच्या सनस्क्रीनवर असलेली एक्सपायरी डेट तपासा. एक्सपायरी डेट उलटून गेलेले सनस्क्रीन लावल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच ते नियमितपणे बदलणे देखील आवश्यक आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत