AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिंबूपाणी आणि मधाचे सेवन करताना रहा सावध, आयुर्वेद तज्ज्ञांनी सांगितले कारण

लिंबूपाणी आणि मधाचे सेवन केल्याने फॅट बर्न होण्यास मदत होत असली तरी सर्वजण त्याचे सेवन करू शकत नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लिंबूपाणी आणि मधाचे सेवन करताना रहा सावध, आयुर्वेद तज्ज्ञांनी सांगितले कारण
| Updated on: Oct 07, 2022 | 12:07 PM
Share

आपल्यापैकी बहुतांश लोक सकाळी लिंबूपाणी (lemon water) आणि मध (honey) सेवन करणे पसंत करतात. सकाळी उठल्यावर अंशपोटी लिंबूपाणी व मधाचे सेवन केल्याने केवळ वजन कमी (weight loss) होत नाही तर आपले शरीरही डिटॉक्स होते. लिंबू हे व्हिटॅमिन-सी चा उत्तम स्त्रोत आहे. तर मध हा आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतो. लिंबू आणि मध या दोन्ही पदार्थांमध्ये पोषक तत्वं मुबलक प्रमाणात असतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीरही असते. मात्र असे असले तरीही सर्व लोक लिंबूपाण्यासह मधाचे सेवन करू शकतात का असा प्रश्न उपस्थित होतो ? त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

काय आहे आयुर्वेद तज्ज्ञांचे म्हणणे ?

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर नमूद केले आहे की लिंबूपाणी आणि मधाचे सेवन केल्याने फॅट बर्न होण्यास मदत होते. मात्र असे असले तरीही लिंबू पाणी आणि मधाचा वापर सर्व लोक करू शकत नाहीत. लिंबू पाणी आणि मधाचे सेवन केल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते, असे बरेच जणांनी ऐकले असेल. मात्र हे खरोखर किती जणांनी करून पाहिले आणि किती लोकांना त्याचा फायदा मिळाला ?

आयुर्वेद तज्ज्ञांनी याच्या फायद्यांबद्दल सांगितले आहे.

– लिंबू आणि मध आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी ( फॅट बर्न) करण्यास मदत करते.

– त्याचे सेवन केल्याने आपले लिव्हर (यकृत) डिटॉक्स होते.

– ब्लोटिंगच्या समस्येपासूनही मुक्ती मिळते.  

या गोष्टी लक्षात ठेवा –

– लिंबूपाणी व मधाचे सेवन करण्यापूर्वी हे लक्षात ठेवावे की ते पाणी खूप गरम नसावे.

– मध नेहमी कोमट पाण्यात मिसळावा. जास्त गरम पाण्यात मध घातल्यास त्याचे विषात रुपांतर होऊ शकते.

– कोमट पाण्याच १ चमच्यापेक्षा अधिक मध मिसळू नये.

– हे पाणी सेवन करताना सुरुवातीला अर्धे लिबू वापरावे. ते योग्य वाटल्यास हळूहळू लिंबाचा वापर वाढवावा व एक लिंबाचा रस पाण्यात मिसळावा, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

लिंबूपाणी व मधाचा वापर केव्हा टाळावा ?

तुम्हाला जर संधिवात, हायपरॲसिडिटी, कमकुवत अथवा ठिसूळ हाडं, तोंडातील अल्सर इत्यादी त्रास होत असेल तर तुम्ही लिंबूपाणी व मधाचे सेवन करणे टाळावे. अन्यथा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?