AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्याच्या हंगामात घरी तयार करा केळी आणि कलिंगडचा फेस मास्क, वाचा !

वाढत्या तापमानाचा परिणाम त्वचेवर होत असून तेलकट टी झोन, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता असते.

उन्हाळ्याच्या हंगामात घरी तयार करा केळी आणि कलिंगडचा फेस मास्क, वाचा !
त्वचा
| Updated on: May 31, 2021 | 4:16 PM
Share

मुंबई : वाढत्या तापमानाचा परिणाम त्वचेवर होत असून तेलकट टी झोन, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता असते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेची विशेष काळजी ही घेतली गेली पाहिजे. सध्या बऱ्याच ठिकाणी लाॅकडाऊन असल्यामुळे आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नाहीत. यासाठी आपल्याला घरात असलेल्या साहित्याच्या आधारेच त्वचेची काळजी घ्यावी लागणार आहे. उन्हातही त्वचा तजेलदार दिसण्यासाठी आज आम्ही खास फेस मास्क सांगणार आहोत. (Banana and watermelon face mask is beneficial for the skin)

आपण केळी आणि कलिंगडचा फेस मास्क घरी तयार करू शकतो. यासाठी केळीचे तुकडे आणि किसलेले कलिंगड घ्या. केळी आणि कलिंगड बारीक करून त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा. तसेच आपण दही आणि कलिंगडचा फेसपॅक तयार करू शकतो. यासाठी दोन चमचे दही आणि कलिंगडचा रस मिक्स करा आणि 10 ते 15 मिनिटे हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. हे दोन्ही फेसपॅक आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा लावू शकतो.

यामुळे उन्हाळ्यातही आपली त्वचा सुंदर दिसते. दोन चमचा बारीक खडेमीठ घ्या त्यामध्ये तीन चमचे दही आणि लिंबाचा रस मिसळा आणि दहा मिनिटांनंतर आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहऱ्यावरील पेस्ट सुकल्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे आपला चेहरा तजेलदार दिसेल. हा फेसपॅक आपण आठवड्यातून तीन वेळा लावला पाहिजे. फेसपॅक बनविण्यासाठी कॉफी पावडर एक चमचा मधात व्यवस्थित मिसळा आणि हातांनी हलक्या हाताने मसाज करा. यानंतर 15 ते 20 मिनिटांसाठी पॅक चेहऱ्यावर ठेवा. मग आपले तोंड धुवा.

खरं तर, कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, तसेच यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म देखील असतात. ज्यामुळे आपली त्वचा चमकदार बनते आणि चेहर्‍यावरील सुरकुत्याची समस्या दूर होते. हा फेसपॅक आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावला पाहिजे. सर्वांत अगोरद अर्धी वाटी तांदूळ घ्या आणि ते बारीक करून घ्या. त्यामध्ये ताजे दही घाला ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि चेहऱ्यावर 30 ते 40 मिनिटे तसेच ठेवा आणि हा पॅक सुकल्यानंतर चेहऱ्यावर हात फिरवा यामुळे तुमचे स्क्रब देखील होईल. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा याचा फायदा त्वचेला होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

(Banana and watermelon face mask is beneficial for the skin)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली