AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरच्या घरी तुमच्या केसांना काळे भोर ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या ट्रिक्स

केसांच्या निरोगी वाढीसाठी त्यांच्यावर अनेक प्रयोग केले जातात. केसांच्या योग्य वाढीसाठी तुमच्या दैनंदिन आहारामध्ये फयबर, प्रोटिन, मॅग्निशियम अशा घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे. त्यासोबतच केसांची योग्य काळजी घेणे देखील महत्त्वाचे असते. मार्केटमधील कृत्रिम शैम्पू आणि रसायनिक ब्युटी प्रोडक्ट्समुळे तुमच्या केसांवरील नैसर्गिक चमक निघून जाते. केसांची योग्या पद्धतीनं काळजी कशी घ्यावी चला जाणून घेऊया.

घरच्या घरी तुमच्या केसांना काळे भोर ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स
hair longImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 01, 2025 | 7:14 PM
Share

निरोगी आणि काळे भोर केस कोणालला नको असतात! लांब, चमकदार आणि रेशमी केस सर्वांनाच आवडतात. परंतु आजकालच्या वातावरणामुळे आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे तुमच्या केसांचे आरोग्य निरोगी राहात नाही. आजकल अनेकजण भरपूर प्रमाणात जंक फूडचे सेवन करतात. जंक फूडमध्ये शरीराला पोषक घटक नसतात ज्यामुळे शरीराला काही फायदा होत नाही. शरीराला पुरेसं पोषण मिळत नाही. केसांकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात. केसांना योग्य पोषण नाही मिळाल्यामुळ केस गळती, केसांममध्ये कोंडा अशा अनेक समस्या उद्भवतात. केसांची निगा राखण्यासाठी विशेष काळजी घय्वी लागते.

केसांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. निरोगी केसांसाठी तुमच्या आहाराकडे विशेष देणे गरजेचे आहे. केसांच्या निरोगी वाढीसाठी तुमच्या दैनंदिन आहारामध्ये फायबर, मिनरल्स, पोटॅशियम आणि चांगले फॅट्स अशा गटकांचा समावेश करा. यामुळे तुमच्या केस गळतीची आणि कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया केसांच्या निरोगी वाढीसाठी केसांची काळजी कशी घ्यावी.

केसांना चमकदार आणि मुलायम ठेवण्यासाठी केसांना आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांना तेल लावा. केसांना तेल लावल्यामुळे केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच तेल लावल्यामुळे केसांमध्ये गुंता होत नाही आणि केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत होते. त्यानंतर आठवड्यातून २ वेळा केस धुतल्यामुळे तुमच्या केसांमधील चिकटपणा, धुळ आणि कोंडा निघुन जातो. त्यामुळे केसांना निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा केस धुणे महत्त्वाचे आहे.

केस धुतल्यानंतर त्यांना कंडीश्नर करणे देखील महत्त्वाचे असते. केसांना कंडिश्नर लावल्यामुळे केसांमध्ये गुंता होत नाही आणि केसगळतीची समस्या निघून जाते. त्याानंतर केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर न करता टॉवेलचा वापर करावा. हेअर ड्रायरच्या वापरामुळे केस डॅमेग होतात आणि त्यांच्यावरील नैसर्गिक चमक निघून जाते. तुमच्या केसांवर नेहमी जाड दातांचा कंगवा वापरा यामुळे कसे कमी प्रमाणात तुटतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केसांना कोणत्याही प्रकारचे कृत्रिम प्रक्रिया केलेले तेल किंवा कंडिश्नर वापरू नये.

निरोगी केसांसाठी या गोष्टींची काळजी घ्या :

केस धुताना गरम पाण्याचा वापर करू नये. गरम पाण्याचा वापर केल्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल निघुन जाते.

केसांवर रसायनिक शैम्पूचा वापर करू नये. त्यामुळे केसगळती, केसांमध्ये कोंडा यांच्या सारख्या समस्या होतात.

जास्त ताण आणि टेंशन घेतल्यामुळे तुम्हाला केसगळतीच्या समस्या होऊ शकतात.

कधीच चुकूनही केस धुताना मिठाच्या पाण्याचा वापर करू नये यामुळे अनेक समस्या होतात.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.