AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rosacea : पावसाळ्यात त्वचेला संसर्ग झाला? ‘हा’ आहे त्याचा आयुर्वेदिक उपचार!

पावसाळा सुरू झाल्यावर त्वचेच्या समस्या सामान्य आहेत. त्वचेवर पुरळ येणे, चट्टे येणे, खास सुटणे अशा एक ना अनेक समस्या पावसाळ्याच्या दिवसात त्वचेसंदर्भात समोर येतात. या समस्येवर काही आयुर्वेदिक उपचार खूप फायदेशीर ठरू शकतात.

Rosacea : पावसाळ्यात त्वचेला संसर्ग झाला? ‘हा’ आहे त्याचा आयुर्वेदिक उपचार!
Skin Care
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 07, 2022 | 11:39 PM
Share

दिल्लीत काही काळासाठी हवामानातील आर्द्रता 60 टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक दिवसांच्या कडक उन्हानंतर गेल्या आठवड्यात राज्यभरात पाऊस झाला. हवामानातील अशा बदलांमुळे त्वचेच्या समस्या (Skin problems) उद्भवू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आणि रोसेसियासारख्या समस्याही वाढतात. रोसासियाचा प्रभाव (Influence of rosacea) गालावर, कपाळावर आणि हनुवटीवर सर्वाधिक दिसून येतो. रोसासिया या समस्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु असे मानले जाते की ते अतिक्रियाशील रोगप्रतिकारक (immune system) शक्तीमुळे असू शकते. लोक सहसा रोसासियाला मुरुम, त्वचेशी संबंधित इतर समस्या किंवा त्वचेच्या कोरडेपणाशी जोडतात. परंतु जर रोसासियावर वेळेवर उपचार केले गेले नाहीत. तर, त्वचेवर उद्भवणारा लालसरपणा आणि सूज अधिक वाढू शकते आणि कायमचा चेहरा खराब होऊ शकतो.

हार्मोनल बदलांमुळे संसर्ग होतो

आयुर्वेदातील वरिष्ठ सल्लागार आणि मेदांता येथील एकात्मिक औषध विभागाचे प्रमुख डॉ. जी. गीता कृष्णन यांनी Tv9 ला सांगितले की, रोसासिया हे शरीरातील हार्मोनल बदलांचे लक्षण देखील असू शकते, ज्यामुळे शरीरात चयापचय किंवा उष्णता वाढते. ते म्हणाले की आयुर्वेदानुसार, ही पित्त प्रकृती असलेल्या व्यक्तींमध्ये उद्भवणारी ‘पित्त’ आधारित स्थिती आहे. पित्त दोष हा आयुर्वेदात अग्नि आणि पाण्यावर आधारित मानला जातो. ही प्रवृत्ती सामान्यतः उष्ण, हलकी, वेगवान, तेलकट, द्रव आणि स्थिर नसलेली अशी असते. असे दिसून आले आहे की, पित्ताची प्रवृत्ती असलेले लोक बहुतेक वेळा काटक शरीर यष्टीचे असतात.

आयुर्वेदिक उपचार काय आहे

रोसासिया झाल्यास अंजीर, कढीपत्ता ताक इत्यादींचे सेवन करावे असे डॉ कृष्णन यांनी सांगितले. ते म्हणाले की, रोससिया झाल्यास बाधित भाग स्वच्छ करण्याकडे विशेष लक्ष द्यावे आणि गुलाबपाणी लावावे. त्यामुळे लवकर आराम मिळतो. तसेच मसालेदार आणि चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळावे. या परिस्थितीत मासे आणि तीळ टाळणे देखील चांगले आहे. यासोबतच डॉ. कृष्णन यांनी रोससियाचा त्रास असलेल्या लोकांना रात्री चांगली झोप घेण्याचा आणि अनुलोम विलोमसारखे श्वासोच्छवासाचे व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन