AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवऱ्याचीच नजर लागेल! कोरड्या त्वचेवर ‘हे’ लावा

हिवाळा आला की त्वचेत कोरडेपणाची समस्या वाढते. थंड वाऱ्यांमुळे त्वचेत ओलाव्याची कमतरता भासते. त्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. ही समस्या टाळण्यासाठी स्किन एक्सपर्टने काही सोप्या टिप्स दिल्या आहेत.

नवऱ्याचीच नजर लागेल! कोरड्या त्वचेवर 'हे' लावा
dry skin Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 01, 2024 | 1:34 PM
Share

थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात थंडावा असल्याने आपल्या सर्वांची त्वचा अधिक कोरडी होते. यामुळे त्वचेशी संबंधित सर्व समस्या उद्भवू लागतात. हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी याबाबत आजही अनेकजण संभ्रमात असतात. हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे त्वचा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

तर यावेळी दिल्लीचे श्री बालाजी ॲक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट, वरिष्ठ सल्लागार, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. विजय सिंघल सांगतात की, हिवाळ्यात थंड वारे वाहत असल्याने आणि वातावरणात ओलावा नसल्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. अशावेळी ज्या लोकांची त्वचा कोरडी आहे त्यांनी हिवाळ्यात आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी. तर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून काही सोप्या आणि प्रभावी उपायांबद्दल, ज्यामुळे हिवाळ्यात तुमच्या कोरड्या त्वचेचे आरोग्य सुधारेल.

गुलाबपाणी

हिवाळाच्या दिवसात तुम्हाला कोरड्या त्वचेपासून आराम मिळावा यासाठी एका स्प्रे च्या बाटलीत गुलाबपाणी घेऊन त्यात ग्लिसरीनचे काही थेंब मिसळून चेहऱ्यावर स्प्रे केल्यास किंवा कापसाने चेहऱ्यावर लावल्यानेही त्वचेला झटपट ओलावा मिळतो. तसेच तुमची त्वचा खूपच कोरडी असेल तर हिवाळ्यात चेहरा जास्त स्क्रब करू नका. तसेच हिवाळ्यात हलका सूर्यप्रकाशही देखील तुमची त्वचा कोरडी करू शकतो. त्यामुळे बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावा. हिवाळ्यात त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्यावे. या उपायांचा अवलंब करून तुम्ही हिवाळ्यात तुमच्या त्वचेला कोरडेपणापासून वाचवू शकता आणि त्वचेला निरोगी व चमकदार ठेवू शकता.

कोरफड जेल

हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठीही कोरफड जेल उत्तम आहे. कोरड्या त्वचेपासून आराम मिळावा यासाठी रात्री झोपताना चेहऱ्याला कोरफड जेल लावा आणि सकाळी चेहरा धुवा. यामुळे त्वचा हायड्रेट होते. तसेच तज्ज्ञांच्या मते, कच्च्या दुधात थोडे मध मिसळून चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होईल.

मॉइश्चरायझर लावा

तुमची त्वचा सुद्धा हिवाळ्यात कोरडी पडत असेल तर दिवसातून 1 ते 2 वेळा मॉइश्चरायझर नियमित लावावे. यासाठी तुम्ही शिया बटर, ग्लिसरीन किंवा हायल्युरोनिक ॲसिड असलेले मॉइश्चरायझर निवडा. हे घटक असलेले मॉइश्चरायझर त्वचेचे सखोल पोषण करून त्वचा चांगली ठेवतात. तसेच झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर हलके गरम नारळ किंवा बदामाचे तेल लावावे. यामुळे त्वचेला ओलावा आणि नैसर्गिक चमक मिळते.

Follow Us
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य