AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंघोळ करताना सर्वात आधी शरीराच्या या भागावर पाणी ओता; अन्यथा एक चूक पडेल महागात

अंघोळ करताना एक छोटीशी चूक महागात पडू शकते. म्हणजे अंघोळ करताना सर्वात आधी कोणत्या अवयवावर पाणी ओतलं पाहिजे हे समजणं महत्त्वाचं असतं.पण अनेकांना ही गोष्टी माहित नसल्याने त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. 

आंघोळ करताना सर्वात आधी शरीराच्या या भागावर पाणी ओता; अन्यथा एक चूक पडेल महागात
Best Showering Technique, Avoid Health RisksImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 23, 2025 | 8:31 PM
Share

अंघोळ आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. शरीरापासून ते मनापर्यंत स्वच्छता करण्यासाठी अंघोळ ही हवीच आहे. पण अंघोळ ही आपली नित्याचीच सवय किंवा भाग असला तरी देखील नकळतपणे आपल्याकडून अशा चुका होत असतात ज्या आपल्याला दिसत नाही पण त्याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. अशी एक चुक म्हणजे अनेकांना हे माहित नसेल की अंघोळ करताना शरीराच्या कोणत्या भागावर सर्वात आधी पाणी ओतलं पाहिजे. चुकीच्या पद्धतीने आंघोळ केली तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.

आंघोळ करताना छोटीशी चूक महागात पडू शकते

आंघोळ करताना शक्यतो आपण शरीराच्या कोणत्या भागावर पाणी आधी घ्यावं याकडे लक्ष देत नाहीत. पण तुम्हाला माहिती आहे का की आंघोळीची पद्धत तुमच्या आरोग्य बिघडवू शकते. एक छोटीशी चूक महागात पडू शकते. आंघोळ करण्याची योग्य पद्धत आणि ही छोटीशी सवय का बदलणे महत्त्वाचे आहे ते जाणून घेऊया.

चुकीच्या पद्धतीने आंघोळ करणे म्हणजे काय?

अंघोळ करताना जेव्हा तुम्ही अचानक डोक्यावर किंवा छातीवर थंड किंवा गरम पाणी ओतता तेव्हा शरीराला झटका बसू शकतो. यामुळे रक्तदाब वेगाने वाढू किंवा कमी होऊ शकतो. विशेषतः जर तुम्हाला उच्च किंवा कमी रक्तदाबाची समस्या असेल तर ही पद्धत तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कधीकधी यामुळे चक्कर येणे, थकवा येणे किंवा अस्वस्थता देखील जाणवू शकते

शरीराच्या कोणत्या भागावर प्रथम पाणी ओतले पाहिजे?

आंघोळ करताना, प्रथम पायांवर पाणी ओतले पाहिजे. कारण पायांवर पाणी ओतल्याने शरीर हळूहळू तापमानातील बदल स्वीकारते. हो, यामुळे हृदय आणि मेंदूला अचानक धक्का बसत नाही आणि रक्ताभिसरण संतुलित राहते.

अंघोळीच योग्य क्रम काय आहे?

सर्वप्रथम पायांवर पाणी घाला.

नंतर घोट्यापासून गुडघ्यांपर्यंत आणि मांड्यांपर्यंत हळूहळू पाणी ओता.

यानंतर, हातांवर आणि नंतर खांद्यावर पाणी घाला.

शेवटी, डोक्यावर पाणी घाला.

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुमच्या पायांवर पाणी ओतता तेव्हा तुमच्या शरीराला हळूहळू थंड तापमानाशी जुळवून घेण्यास वेळ मिळतो. यामुळे रक्तवाहिन्या अचानक आकुंचन पावण्यापासून रोखतात आणि रक्तदाब अचानक वाढण्याची शक्यता कमी होते. नंतर पाणी शरीराच्या हळूहळू वरच्या दिशेने ओतल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि शरीराचे तापमान हळूहळू बदलते, ज्यामुळे शरीरावर कमी दाब पडतो.

चुकीची आंघोळ करण्याच्या पद्धतीचा रक्तदाबावर होणारा परिणाम

अंघोळ करताना बऱ्याचदा लोक थेट डोक्यावर पाणी ओतात. पण असे केल्याने शरीराचा वरचा भाग अचानक थंड होतो, तर बाकी शरीर हे गरम राहते. तापमानात अचानक झालेल्या या बदलामुळे रक्तवाहिन्या वेगाने आकुंचन पावू शकतात, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. हे हृदयाचे विकार असलेल्या आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी हानिकारक ठरू शकते.

अंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवा

नेहमी साध्या किंवा कोमट पाण्याने आंघोळ करा. खूप थंड किंवा खूप गरम पाणी रक्तदाबासाठी चांगले नाही.

जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा अशक्त वाटत असेल तर जास्त वेळ आंघोळ करू नका.

हृदय विकार आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी आंघोळ कशी करावी याबद्दल त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.