AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाज्या स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती? फक्त पाणी नाही तर… शेवटचा उपाय नक्की ट्राय करा

भाज्या आणि फळांवरील कीटकनाशके काढून टाकण्यासाठी उत्तम घरगुती उपाय. मीठ, हळद आणि व्हिनेगरचा वापर करून आपल्या कुटुंबाला विषारी रसायनांपासून कसे सुरक्षित ठेवावे याची सविस्तर माहिती.

भाज्या स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती? फक्त पाणी नाही तर... शेवटचा उपाय नक्की ट्राय करा
clean vegetables at home
| Updated on: Jan 14, 2026 | 2:25 PM
Share

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आरोग्यासाठी ताज्या पालेभाज्या आणि फळांना प्राधान्य देतो. मात्र या भाज्या शेतातून आपल्या ताटापर्यंत येताना त्यावर मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा (Pesticides) आणि रसायनांचा मारा केलेला असतो. त्यामुळे जर तुम्हीही केवळ साध्या पाण्याने भाज्या धुवत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात.

भाज्या केवळ पाण्याने धुतल्याने ही रसायने निघून जात नाहीत. ज्यामुळे कालांतराने कर्करोग, पोटाचे विकार आणि हार्मोनल असंतुलन यांसारख्या गंभीर आजारांना होऊ शकतात. त्यामुळे जर तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी भाज्या स्वच्छ धुण्याच्या काही सोप्या घरगुती टीप्स आज आपण जाणून घेणार आहोत.

१. मिठाचे पाणी : कीटकनाशके घालवण्यासाठी मीठ हा सर्वात स्वस्त आणि प्रभावी मार्ग आहे. एका मोठ्या टबमध्ये पाणी घेऊन त्यात २ चमचे समुद्री मीठ (मीठाचे मोठे खडे) टाका. या पाण्यात भाज्या २० मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर साध्या नळाच्या पाण्याखाली त्या पुन्हा एकदा स्वच्छ धुवा.

२. बेकिंग सोडा : अनेक संशोधनानुसार, बेकिंग सोड्याचे पाणी कीटकनाशके काढून टाकण्यासाठी सर्वात प्रभावी मानले जाते. यासाठी १ लीटर पाण्यात साधारण १ चमचा बेकिंग सोडा मिसळा. साधारण १२ ते १५ मिनिटे भाज्या त्या पाण्यात ठेवा. हे द्राव्य भाज्यांवरील चिकट रसायने काढून टाकण्यास मदत करते.

३. व्हिनेगर : व्हिनेगरमधील आम्लयुक्त (Acidic) गुणधर्म केवळ रसायनेच नाही तर भाज्यांवरील जीवाणू देखील नष्ट करतात. यासाठी पाण्याचे आणि पांढऱ्या व्हिनेगरचे ३:१ असे प्रमाण ठेवा. जर ३ कप पाणी असेल तर १ कप व्हिनेगर घ्या. द्राक्षे, बेरीज आणि सफरचंद यांसारख्या फळांसाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे.

४. गरम पाणी, हळद आणि मीठ : फ्लॉवर, ब्रोकोली किंवा कोबी यांसारख्या भाज्यांमध्ये बारीक किडे लपलेले असतात, जे डोळ्यांना सहज दिसत नाहीत. कोमट पाण्यात चिमूटभर हळद आणि मीठ टाका. हळद ही नैसर्गिक जंतुनाशक (Antiseptic) म्हणून काम करते, ज्यामुळे भाजी पूर्णपणे निर्जंतुक होते.

५. साल काढणे : काकडी, बटाटा, गाजर किंवा सफरचंद यांसारख्या भाज्या आणि फळांच्या सालीमध्ये रसायनांचे प्रमाण सर्वाधिक असते. शक्य असल्यास त्यांची साल काढूनच वापर करा. यामुळे कीटकनाशकांचा धोका ९० टक्क्यांपर्यंत कमी होतो. भाज्या बाजारातून आणल्यानंतर लगेच फ्रीजमध्ये न ठेवता, आधी त्या वरीलपैकी एका पद्धतीने स्वच्छ करा, पूर्ण कोरड्या करा आणि मगच साठवून ठेवा. यामुळे त्या जास्त काळ टिकतात.

Follow Us
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे...
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा
Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले...
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अ
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही...
अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री!
Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या
Pratap Sarnaik On ST Bus | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या टक्क्यांनी वाढणार; पगारात होणार मोठी वाढ