AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ चुकांमुळे तुमचा आनंद हिरावला जाईल, आयुष्यात निर्माण होईल अशांती

आचार्य चाणक्य नीती यांच्या नीतीनुसार तुम्ही जर त्याच्या गोष्टींचे पालन केल्यास तुमच्या जीवनात कोणत्याच समस्येला सामोरे जावे लागणार नाही. त्यांच्या नियमाचे पालन केल्यास यशस्वी आणि समृद्ध जीवन जगू शकतात.

'या' चुकांमुळे तुमचा आनंद हिरावला जाईल, आयुष्यात निर्माण होईल अशांती
चाणक्यImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 22, 2024 | 1:15 PM
Share

आचार्य चाणक्य यांच्याबद्दल माहिती नसलेले असे क्वचितच कोणी असेल. त्यांना त्यांच्या काळातील सर्वात ज्ञानी आणि विद्वान लोकांच्या श्रेणीत ठेवण्यात आले होते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारची नीती रचली होती, ज्यात त्यांनी मानवजातीच्या भल्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टीही सांगितल्या आहेत.

जर कोणत्याही व्यक्तीला यशस्वी आणि समृद्ध जीवन हवे असेल तर त्याने चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले पाहिजे. आचार्य चाणक्य यांनीही त्यांच्या नीतींमध्ये काही चुकांचा उल्लेख केला आहे ते म्हणजे जर कोणत्याही व्यक्तीने या चुका केल्या तर तो आयुष्यात कधीही सुखी राहू शकत नाही. या चुकांमुळे त्याला उर्वरित आयुष्य दु:खात घालवावे लागू शकते. आज या लेखात आम्ही तुम्हाला या चुकांबद्दल सविस्तर सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.

महिलांना चुकीची वागणूक देणे

आचार्य चाणक्य यांच्यानुसार जे महिलांशी चुकीचे किंवा अशोभनीय वर्तन करतात त्यांना योग्य वागणूक देत नाही अशी लोकं आयुष्यात कधीही आनंदाने जगू शकत नाहीत. जेव्हा एखादी व्यक्ती असे करते तेव्हा त्याची प्रगती थांबते. चाणक्य यांनी असेही सांगितले आहे की, ज्या घरांमध्ये स्त्रियांचा सन्मान केला जात नाही, तिथे कधीच प्रगती होत नाही. कारण अशा घरांमध्ये देवी लक्ष्मी कधीच राहत नाही.

वृद्ध आणि लहान मुलांचा अपमान

चाणक्य नीतीनुसार ज्या घरात वृद्ध आणि मुलांचा अपमान केला जातो त्या घरांमध्ये केव्हाही संकट येऊ शकते. ज्या घरांमध्ये असं घडतं तिथे लोकांचा पैसे टिकत नाही आणि त्यांना अनेकदा आर्थिक अडचणींतून जावं लागतं. या घरांमध्ये नकारात्मक ऊर्जेची सावलीही असते.

पूजेचा अभाव

आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या घरांमध्ये पूजा केली जात नाही किंवा देवाचे नाव घेतले जात नाही, अशा घरात राहणारे लोकं नेहमीच अस्वस्थ असतात. तसेच आयुष्यभर नेहमीच दु:खी असतात आणि त्यांना नेहमीच काही ना काही त्रास सहन करावा लागतो. या घरांमध्ये राहणाऱ्यांचे काम नीट होत नाही.

गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.