AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chankya Niti For Mens : पुरुषांनी या गोष्टी शक्यतो गुप्तच ठेवाव्या, अन्यथा समाजात होईल हसे

समाजात मान आणि प्रतिष्ठा राखायची असेल तर आपल्या काही बाबी गुप्तच राहु द्या. आचार्य चाणक्य यांच्या मते खास करुन पुरुषांनी काही बाबींचा जाहीरपणे उल्लेख करु नये यामुळे तुम्ही समाजात टिंगलटवाळीचे विषय व्हाल...

Chankya Niti For Mens : पुरुषांनी या गोष्टी शक्यतो गुप्तच ठेवाव्या, अन्यथा समाजात होईल हसे
Chanakya Niti For Mens Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 17, 2024 | 9:15 PM
Share

आचार्य चाणक्य यांना अर्थशास्रज्ञ आणि राजकीय मुत्सदी आणि परराष्ट्रनितीसाठी देखील ओळखले जाते. त्यांचे कौटिल्याचे अर्थशास्र हे प्रसिद्ध आहेच. शिवाय त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात देखील कसे राहावे याचे मंत्र सांगितले आहेत. यामुळे व्यक्ती सुखी आणि समृद्ध तसेच प्रतिष्ठीत जीवन जगू शकतो असे आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे.

आचार्य चाणक्य यांची वाणी चाणक्य निती म्हणून गाजली आहे. त्यांनी समाजाला केलेला उपदेश सर्वांनाच उद् बोधक आहे. तर पाहूयात चाणक्य नितीप्रमाणे समाजात वावरताना काय करावे. चाणक्यने प्रत्येक क्षेत्रातील जनमाणसाची काळजी घेतली आहे. चाणक्य निती वापरुन आपण जीवनात प्रगती करु शकता. सुखी आणि समाधानी जीवनासाठी चाणक्य निती गरजेची आहे. आपण सर्व एकाच सामाजिक परिवेषात राहतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला हे गरजेचे आहे की घर आणि परिवारासोबतच समाजात देखील आपला मान सन्मान राहील हे पाहीले पाहीजे.

पुरुषांनी या बाबी गुप्त ठेवाव्यात :

घर आणि कुटुंब किंवा पत्नी संबधीत बाबी – पुरुषांनी आपल्या घरातील आणि कुटुंबातील वाद – विवाद, घरातील कोणत्याही गोष्टीची बाहेर वाच्छता करणे चुकीचे आहे. जर आपल्या पत्नीबद्दल कोणत्याही गोष्टीबद्दल नाराज होऊन तिच्या चरित्र, व्यवहार आणि सवयींबाबत कोणालाही सांगू नका. या गोष्टी सांगितल्याने त्यावेळी जरी काही झाले नाही तरी नंतर त्याचे नुकसान भोगायला लागू शकते हे लक्षात ठेवा.

अपमान झाल्याचे सांगू नका :

जर आपला कोणत्याही कारणांनी यापूर्वी जर अपमान झाला असेल तर मस्करीतही कोणालाही ते सांगू नका. सर्वसाधारणपणे मस्ती मजाकमध्ये आपण या गोष्टी जवळच्या व्यक्तींना किंवा मित्रांना सांगतो. परंतू अपमान झाल्याच्या बाबी जितक्या गुप्त ठेवता येतील तेवढ्या ठेवाव्यात. जरी आपला अपमान झाला असेल तर तो स्वत: जवळच ठेवावा. अपमानाचे घोट स्वत:च गुपचुप गिळावेत जगजाहीर करु नयेत..

पैशांच्या बाबतीतील दक्षता :

धनसंपती कोणाला नको असते. प्रत्येकाला श्रीमंत आणि समर्थ बनायचे असते. आजच्या काळात पैसा सर्वात मोठी ताकद आहे. परंतू आपल्या आर्थिक स्थितीबाबत कोणालाही काही सांगू नये. असे केल्याने समाजात आपला सन्मान कमी होतो. आणि जेव्हा दुसऱ्याला कळते की आपल्याजवळ पैसा नाही तेव्हा ते आपल्याला टाळायला लागतात. त्यांना वाटते की हा आपल्याकडे पैसे मागायला आला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.