Common Lifestyle Mistakes: निरोगी आयुष्य जगायचंय?, मग या पाच सवयी सोडाच

आजच्या युगामध्ये कमी वयात देखील अनेकांना हृदय विकाराचा झटका येतो. हृदय विकाराचा धक्का तीव्र असल्यास तुमचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. चुकीची जीवनपद्धत आणि खाण्या-पिण्याच्या सवयी ही हृदय विकाराचे प्रमाण वाढण्याची मुख्य कारणे आहेत.

Common Lifestyle Mistakes: निरोगी आयुष्य जगायचंय?, मग या पाच सवयी सोडाच
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 1:20 PM

Common Lifestyle Mistakes :आजच्या युगामध्ये कमी वयात देखील अनेकांना हृदय विकाराचा झटका येतो. हृदय विकाराचा धक्का तीव्र असल्यास तुमचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. चुकीची जीवनपद्धत आणि खाण्या-पिण्याच्या सवयी ही हृदय विकाराचे प्रमाण वाढण्याची मुख्य कारणे आहेत. आरोग्याची काळजी न घेणे, अवेळी जेवण करणे, पथ्य न पाळणे, चुकीच्या पद्धतीने बसणे, अधिक मद्यपान करणे या सवईमुळे तुम्हाला भविष्यात गंभीर आजार होऊ शकतात. या आजारांमध्ये हृदय विकार, किडनीशी संबंधित आजार, तसेच मानसिक आजारांचा समावेश होतो. असे आजार हे शरीरासाठी हानिकारक असतात. अशा कोणत्या चुकीच्या सवई आहेत, ज्या तुम्हाला पुढे चालून अडचणीच्या ठरू शकतात, त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

नियमित व्यायाम न करणे

वयाचे 40 वर्ष पूर्ण केल्यानंतरही तुम्ही जर व्यायाम करत नसाल तर सावधान व्हा, या वयात तुम्हाला दररोज कमीतकमी अर्धातास व्यायामाची आवश्यकता असते. चाळीसी पार केल्यानंतर तुम्ही तुमचे डेली रूटीन ठरून घ्या. डायट प्लॅन बनवा. असे केल्यास तुम्ही दीर्घकाळ आजारापासून दूर राहू शकतात. मात्र तुम्ही जर नियमित व्यायाम न केल्यास तुम्हाला लठ्ठापणा सारख्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. पुढे हा लठ्ठपणाच अनेक आजारांना आमंत्रण देतो.

चुकीच्या पद्धतीने बसणे

तुम्ही तुमच्या बसण्याच्या पद्धतीचा एकदा चांगला अभ्यास करा, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने बसत असाल तर तुम्हाल पाठ, कंबर याच्याशी संबंधित आजार होऊ शकतात. हे दुखणे बळावल्यास अनेक समस्या निर्माण होतात.

धूप्रमान

तुम्ही जर नियमित धूम्रपान करत असाल तर ही सवय वेळीच बदला, कारण वाढते धूम्रमान हे हृदय विकार उद्धभवण्याचे सर्वात मोठे कारण आहे. धूम्रपान हे आरोग्यास हाणीकारणक असून, धुम्रपानामुळे विविध आजार होऊ शकतात.

ब्रेन एक्ससाईज नियमित करा

वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर ब्रेन एक्ससाईज नियमित करा, ब्रेन एक्ससाईज केल्यामुळे स्मुतीभ्रंशासारख्या गंभीर आजाराचा धोका कमी होतो. तसेच ब्रेनहॅम्रेज सारख्या आजारापासून देखील बचाव होतो.

नियमितपणे रक्तदाब चेक करा

रक्तदाब हा नेहमी सामान्य असावा, अति रक्तदाब किंवा कमी रक्तदाब हा विविध आजारांना आमंत्रण देतो. आपला रक्तदाब किती आहे. याची माहिती आपल्याला हवी. त्यानुसार योग्य ते उपचार करता येतात. म्हणून नियमितपणे डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तदाब चेक करा.

संबंधित बातम्या 

Health | व्हिटॅमीन डीची कमी सहज घेऊ नका, रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित आजार होऊ शकतात; कशी घ्याल काळजी?

Omicron Alert: औरंगाबादेत आता मुलांना लस, ज्येष्ठांना बूस्टर डोस, वाचा कुणाला कोणती लस मिळणार?

Mumbai | रुग्णवाढीची धास्ती, पालिका मुख्यालयात आढावा बैठक, नियम कठोर करण्यासोबतच आयुक्त काय म्हणाले?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.