AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी उठल्या उठल्या चहा पिताय? या गंभीर समस्या होऊ शकतात

भारतात मोठ्या संख्येने लोक रिकाम्या पोटी चहा पिऊन दिवसाची सुरुवात करतात. पण सकाळी रिकाम्या पोटी चहा पिल्याने तुमच्या आरोग्याला किती नुकसान होऊ शकते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

सकाळी उठल्या उठल्या चहा पिताय? या गंभीर समस्या होऊ शकतात
tea
| Updated on: Jan 11, 2026 | 4:19 PM
Share

आरोग्य आणि फिटनेस टिकवण्यासाठी फक्त योग्य आहारच नव्हे, तर सकाळच्या सवयीही खूप महत्त्वाच्या असतात. सामान्यतः असं मानलं जातं की, दिवसाची सुरुवात जशी होते, त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. विशेषतः यकृताच्या (लिव्हर) आरोग्यासाठी सकाळची जीवनशैली खूप महत्त्वाची मानली जाते. भारतात मोठ्या संख्येने लोक दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटी चहा पिऊन करतात. काही लोक ऊर्जेसाठी पितात, तर काही पोट साफ करण्याच्या सवयी म्हणून, पण तुम्ही कधी विचार केलाय का की, सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणं तुमच्या आरोग्याला किती नुकसान पोहोचवू शकतं?

रिकाम्या पोटी चहा का त्रासदायक ठरू शकतो?

खरं तर चहात कॅफिन आणि टॅनिनसारखे घटक असतात. हे दोन्ही घटक रिकाम्या पोटी शरीरावर थेट परिणाम करतात. सकाळी पोट जास्त संवेदनशील असतं, आणि अशा वेळी चहा पिण्याने अॅसिडिटी, गॅस आणि अपचन (इंडायजेशन) ची तक्रार होऊ शकते. ही सवय लांब काळ टिकली तर पचनसंस्था कमकुवत होऊ शकते.

यकृतावरही परिणाम होतो

तज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी चहा पिण्याने यकृताच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे यकृतात सूज येणे आणि फॅटी लिव्हर सारख्या समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो. सकाळी उठल्यावर चहा पिण्याऐवजी शरीराला प्रथम पाणी आणि हलके पोषणाची गरज असते.

लोहाची (आयर्न) कमतरतेचा धोका

चहातील टॅनिन शरीरातील लोहाचे शोषण रोखते. जर एखादी व्यक्ती दररोज रिकाम्या पोटी चहा पित असेल, तर कालांतराने हीमोग्लोबिनची पातळी कमी होऊ शकते. याचा परिणाम थकवा, कमजोरी, केस गळणे आणि इतर समस्या म्हणून दिसू शकतो.

गट हेल्थवर नकारात्मक परिणाम

सकाळी शरीराला पाणी आणि फायबरची गरज असते, जेणेकरून आतड्यातील चांगले बॅक्टेरिया सक्रिय होऊ शकतील. पण रिकाम्या पोटी चहा पिण्याने गट मायक्रोबायोमचे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे पचन कमकुवत होते आणि पोषक तत्वांचे योग्य शोषण होत नाही.

तज्ज्ञ काय सल्ला देतात?

तज्ज्ञांच्या मते, चहा पिण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी उठल्यावर सुमारे दोन तासांनी किंवा नाश्ता केल्यानंतर एक तासाने. यामुळे चहाचा शरीरावर नकारात्मक परिणाम होत नाही. तसेच दिवसाची सुरुवात १ ते २ ग्लास पाणी, फळे किंवा हलक्या नाश्त्याने करणे जास्त फायद्याचे मानले जाते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई; रामेश्वरम कॅफेवरही हातोडा
पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई; रामेश्वरम कॅफेवरही हातोडा.
ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद
ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद.
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही.
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू.
महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार आज ठरवणार – विजय वडेट्टीवार
महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार आज ठरवणार – विजय वडेट्टीवार.
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच?; नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच?; नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?.
शरद पवार यांची प्रकृती सुधारली; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवार यांची प्रकृती सुधारली; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज.
अमेरिका-इराण तणावाचा फटका; जळगावची केळी निर्यात ठप्प, शेतकरी संकटात
अमेरिका-इराण तणावाचा फटका; जळगावची केळी निर्यात ठप्प, शेतकरी संकटात.
ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत 'शिवतीर्थ'वर!
ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत 'शिवतीर्थ'वर!.
...तर शिंदेंचं विमान इराणने पाडलं असतं! रोहित पवारांचा मोठा दावा
...तर शिंदेंचं विमान इराणने पाडलं असतं! रोहित पवारांचा मोठा दावा.