AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उभे राहून पाणी प्यायल्याने खरंच गुडघ्यांवर होतो वाईट परिणाम? सत्य काय, जाणून घ्या

शरीरासाठी पाणी किती महत्त्वाचे असते हे सर्वांना माहित आहे. पण पाणी जर योग्यरित्या प्यायले नाही तर नक्कीच त्यामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो. जसंकी उभे राहून पाणी पिऊ नये असं सांगितले जाते. तसेच उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघ्यांचे नुकसान होते असं म्हटलं जातं, पण त्यात किती तथ्य आहे हे जाणून घेऊयात. 

उभे राहून पाणी प्यायल्याने खरंच गुडघ्यांवर होतो वाईट परिणाम? सत्य काय, जाणून घ्या
Does drinking water while standing cause knee pain, Lets find out the truthImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2025 | 5:49 PM
Share

पाणी पिणे आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचे असते हे आपल्या सर्वांना माहित आहे. पुरेसे पाणी पिल्याने शरीर हायड्रेटेड राहतेच, शिवाय शरीराच्या इतर अवयवांनाही योग्यरित्या कार्य करण्यास मदत होते. दैनंदिन जीवनात, लोक त्यांच्या गरजा आणि सवयींनुसार पाणी पितात. पण पाणी पिताना काही सोप्या नियमांचे पालन करणे गरजेचे असते. जसं की अनेकदा आपण ऐकलं असेल की उभे राहून कधीही पाणी पिऊ नये. नेहमी बसून आणि हळू हळू पाणी प्यावे.

उभे राहून पाणी प्यायल्याने त्याचा थेट गुडघ्यांवर परिणाम होतो असं म्हटलं जातं. उभे राहून पाणी पिणे गुडघ्यांसाठी हानिकारक आहे असे मानले जाते. यामागील सत्य काय आहे हे जाणून घेऊयात तसेच उभे राहून पाणी पिण्याचे तोटे काय आहेत हे देखील पाहुयात.

आहारतज्ज्ञांचा सल्ला

सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या आहारतज्ज्ञ जुही अरोरा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून याबाबत सांगितले आहे. जुही यांनी सांगितले आहे की उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघ्यांचे नुकसान होऊ शकते किंवा इतर सांध्यांवर परिणाम होऊ शकतो ही कल्पना एक मिथक आहे. खरं तर, उभे राहून पाणी प्यायल्याने ते अन्ननलिकेतून थेट पोटात जाते. त्यामुळे त्याचा उभे राहून किंवा बसून पाणी पिण्याशी थेट संबंध नाही. जरी काही लोकांना उभे राहून घाईघाईत पाणी प्यायल्याने अपचन किंवा अस्वस्थता जाणवू शकते. परंतु त्याचा गुडघ्यांशी अजिबात संबंधित नाही. तसेच जुही यांनी सामान्यपणे दररोज 2 ते 3 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.

उभे राहून पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक

आरोग्यासाठी उभे राहून पाणी पिणे तसे हानिकारकच असते. आयुर्वेदानुसार, यामुळे पाणी योग्यरित्या शरीरात शोषले जात नाही. ज्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. तथापि, याचा गुडघ्यांवर थेट परिणाम होतो याचा कोणताही पुरावा नाही.

उभे राहून पाणी पिण्याचे तोटे

पचनावर परिणाम होतो: उभे राहून पाणी पिल्याने अन्ननलिकेतून पाणी वेगाने पोटात जाते, ज्यामुळे पचन प्रक्रियेत अडथळा येतो, ज्यामुळे अपचन किंवा गॅसची समस्या उद्भवू शकते.

सांधेदुखीची कारणे: जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा ते नसांवर ताण आणते, ज्यामुळे द्रव संतुलन बिघडते. यामुळे कालांतराने सांध्यामध्ये द्रव जमा होऊ शकतो, ज्यामुळे भविष्यात सांधेदुखी होऊ शकते.

शोषणाचा अभाव : उभे राहून पाणी पितो तेव्हा आवश्यक पोषक तत्वे आणि जीवनसत्त्वे यकृत आणि पचनसंस्थेपर्यंत पोहोचू शकत नाहीत.

किडनीवर परिणाम : उभे राहून पाणी प्यायल्याने ते फिल्टर न करता थेट ओटी पोटात जाते. यामुळे पाण्यातील अशुद्धता मूत्राशयात जमा होते, ज्यामुळे किडनीच्या कार्यावर त्याचा परिणाम होतो आणि मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका वाढतो. तसेच किडनीचे आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो.

मज्जातंतूंचा ताण आणि द्रवपदार्थांचे असंतुलन : असेही म्हटले जाते की उभे राहून पाणी प्यायल्याने शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते आणि नसांमध्ये ताण येतो.

तर अशापद्धतीने उभे राहून पाणी प्यायल्याने नक्कीच शरीरावर नक्कीच हानिकारक परिणाम होऊ शकतात.आयुर्वेदानुसार, पाणी नेहमी बसून, आरामात तसेच लहान घोटांमध्ये आणि हळूहळू प्यावे. घाई घाईत आणि उभ्याने किंवा चालताना पाणी पिऊ नये.

Follow Us
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.