AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केस धुतल्यानंतर ‘या’ 5 सामान्य चुका आवर्जून टाळा, अन्यथा…

केस निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी फक्त धुणे पुरेसे नाही. तर केस धुतल्यानंतर त्यांची योग्य काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. परंतु केस धुतल्यानंतर लोकं काही सामान्य चुका करतात, ज्यामुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. तर आजच्या या लेखात आपण केस धुतल्यानंतर कोणत्या 5 चुका करू नयेत ते जाणून घेऊयात.

केस धुतल्यानंतर 'या' 5 सामान्य चुका आवर्जून टाळा, अन्यथा...
hair washImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 18, 2025 | 3:06 PM
Share

बदलत्या जीवनशैलीचा तसेच हवामानाचा आपल्या सर्वांच्या केसांवर परिणाम होत असतो. ज्यामुळे आजकाल प्रत्येकजण केसांच्या समस्येने त्रस्त झालेले आहेत. त्यात संशोधक आणि केस तज्ञांचा असा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही केस धुतल्यानंतर केसांची निगा राखता तेव्हा तुमच्या अशा काही सवयी आहेत ज्या केसांच्या मुळांना हळूहळू नुकसान पोहोचवतात आणि केस गळणे, कोंडा आणि केस पातळ होणे यासारख्या समस्या निर्माण करतात. फक्त केस धुणे पुरेसे नाही. केस धुतल्यानंतर तुम्ही तुमचे केस कसे योग्यरित्या सांभाळतात किंवा काळजी घेतात याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात केस धुतल्यानंतर वेळेअभावी आपण अशा अनेक गोष्टी करू लागतो ज्या आपल्या केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात, ज्यामुळे केस कमकुवत, कोरडे आणि तुटण्याची शक्यता असते. चला तर मग या लेखात जाणून घेऊया केस धुतल्यानंतर लगेच कोणत्या 5 गोष्टी करू नयेत.

1. टॉवेलने ओले केस जोरात चोळणे

केस धुतल्यानंतर काही महिला या केसांमधील अतिरिक्त पाणी काढुन टाकण्यासाठी टॉवेलने जोरदारपणे केस चोळतात, जेणेकरून ते लवकर सुकतील. पण ही सवय केसांची सर्वात मोठी शत्रू आहे. हेल्थलाइनच्या मते , तुम्ही जेव्हा केस धुता तेव्हा ओले केस सर्वात कमकुवत असतात आणि ते जोरात चोळण्याने तुटण्याची शक्यता अधिक असते. अशावेळेस तुम्ही मायक्रोफायबर टॉवेल किंवा मऊ कॉटन टी-शर्टने तुमचे केस हळूवारपणे वाळवा, त्यांना चोळू नका.

2. ओले केस विंचरणे

केस धुतल्यानंतर अनेकजण लगेचच केस विंचरण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा असे करणे टाळा कारण ओले केस मुळापासून कमकुवत असतात. त्यामुळे बहुतेक केस तुटतात. कारण तुम्ही जेव्हा हे ओले केस विंचारता तेव्हा धुतलेले केस गुंतलेले असतात. अशावेळेस चुकूनही ओले केस कंगव्याने विंचरू नयेत. त्याऐवजी, केस थोडे कोरडे होऊ द्या, नंतर मोठे दात असलेल्या कंगव्याने केस विंचरा.

3. हीट स्टाइलिंग टूल्स वापरणे

काहीजण केस धुतल्यानंतर लगेचच हेअर ड्रायर किंवा स्ट्रेटनर वापरण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे केसांमधील ओलावा तर निघून जातोच पण केसांमध्ये कोरडेपणा आणि फ्रिजी होतात. केस सुकेपर्यंत त्यावर हीटिंग टूल्स वापरू नका आणि केस नैसर्गिकरित्या सुकू द्या.

4. घट्ट केस बांधणे

बऱ्याचदा काही महिला ओल्या केसांमध्ये बन किंवा पोनीटेलसारखे हेअरस्टाईल करतात, ज्यामुळे केसांच्या मुळांना सर्वात जास्त नुकसान होते. ओले केस बांधल्याने केसांच्या मुळांवर दबाव येतो, ज्यामुळे केस तुटतात आणि केस गळतात. म्हणून, केस पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरच कोणतीही हेअरस्टाईल किंवा केस विंचरणे.

5. कंडिशनर लावल्यानंतर लगेच धुणे

रोजच्या ऑफिस तसेच इतर कामांच्या घाईघाईत केसांना कंडिशनर लावल्या लगेच काही मिनिटांत धुवून टाकतात किंवा कधीकधी कंडिशनर जास्त वेळ तसेच ठेवतात, ज्यामुळे स्कॅल्पवर सूज येऊ शकते. कंडिशनर केसांच्या लांबीपर्यंत लावा आणि 23 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका