.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही चार लक्षणे जी सांगतील मुलांना चष्मा लागण्याची चिन्हे

आधुनिक तंत्रज्ञानामुळे मुले ‘गॅजेट्स फ्रेंडली’ झाली आहे. परंतु याचे जसे फायदे तसे शरीराला नुकसानही मोठ्या प्रमाणात आहे. ऑनलाईन शिक्षण, मोबाईलचा अतिरेक तसेच इतर डिजिटल माध्यमांमुळे मुलांमध्ये डोळ्यांसबंधी समस्या वाढलेल्या दिसतात.

ही चार लक्षणे जी सांगतील मुलांना चष्मा लागण्याची चिन्हे
child glasses problems
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Jan 18, 2022 | 9:10 AM
Share

मुंबई : जसाजसा तंत्रज्ञानाचा आविष्कार होत गेला तसा आपल्या जीवनपध्दतीतही आमुलाग्र बदल होत आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात नवी पिढी सर्वात पुढे असते. ऑनलाईन शिक्षण, मोबाईलचा (Mobile) अतिवापर आदींमुळे मुलांच्या डोळ्यांवर आणि मेंदूवर वाईट परिणाम होत आहेत. यातून त्यांना अनेकदा डोळ्यात जळजळ होण्याचा तक्रारी वाढत आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत. घरातील अन्न घाण्यापेक्षा मुलांना बाहेरील ‘जंक फूड’(Junk food) जास्त आवडते. यातून मुलांना अनेक आजार जडतात. त्याचबरोबर ‘गॅजेट्स फ्रेंडली’ (Gadgets) असल्याने मुलांच्या डोळ्यांवर आणि मनावर वाईट परिणाम होत आहे. मुलांच्या डोळ्यांशी संबंधित या समस्यांकडे पालक लक्ष देत नसल्याचेही दिसून येते. डोळ्यांवर वाईट परिणाम झाल्यामुळे अनेकदा मुलांना चष्मा लावावा लागतो. इतर अनेक कारणे आहेत ज्यांच्या लक्षणातून मुलाला चष्मा (glasses) लागणार की नाही ते आपणास समजू शकते.

1) अभ्यास करताना अडचणी

अभ्यास करीत असताना जर मुलांना डोळ्यांशी संबंधित काही समस्या जाणवत असतील तर या लक्षणांकडे वेळीच बघणे आवश्‍यक असते. अभ्यासातील अडचणीमागे डोळ्यांच्या समस्येचे कारण असू शकते. मुलाला शाळेतून गृहपाठ किंवा इतर कामांवर लक्ष केंद्रित करता येत नसेल, तो वारंवार डोळ्यांची समस्या सांगत असेल तर, तज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी करणे योग्य ठरते.

2) डोळे चोळणे

‘गॅजेट्स’चा अतिवापर करण्याबरोबरच वाढत्या प्रदूषणामुळेही मुलांच्या डोळ्यांच्या समस्या निर्माण होउ शकतात. त्यांच्या डोळ्यात अनेकदा जळजळ किंवा चूळचूळ होत असते. त्यामुळे मुले जोरात डोळे चोळू लागतात, परंतु हे डोळ्यांच्या आरोग्याला घातक ठरू शकते. तसेच हेदेखील चष्मा लागण्याचे लक्षण मानले जाते. जर मूले वारंवार डोळे चोळत असतील तर हे डोळे कमकुवत होण्याचे लक्षण समजावे, मुलांना डॉक्टरांकडे नेऊन उपचार घ्यावे.

3) डोकेदुखीची समस्या

टी. व्ही., मोबाईल आदी गॅजेट्सच्या अतिरेकामुळे डोळ्यांवर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे अनेकदा मुलांना डोकेदुखीची तक्रार होऊ लागते. जर मुल वारंवार डोके दुखत असल्याची तक्रार करत असतील तर त्यांना चष्मा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक, कमकुवत डोळ्यांनी लक्ष केंद्रित केल्याने डोकेदुखी होऊ शकते.

4) डोळ्यांमधील थकवा

अनेकदा मुले लक्ष केंद्रीत करुन काही वाचू शकत नाही, पाहू शकत नाही, डोळ्यातून पाणी येते अशा वेळी मुलाच्या डोळ्यांना थकवा जाणवत असेल तर त्याच्या डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, जर त्यांना चष्म्याची गरज असेल, तर त्याचा वापर नक्की करावा.

संबंधीत बातम्या : 

वाढत्या वयाबरोबर शरीर आरोग्याबाबत हे संकेत देतं, वेळीच आहाराकडे लक्ष द्या…

फायद्यांसोबतच लसणाचे नुकसानही आहेत, तुम्हाला माहितीये का..?

तिळाच्या चिक्कीचे सहा फायदे ठेवतील तुम्हाला तंदुरुस्त, हिवाळ्यात ऊर्जेचा स्त्रोत

Follow Us
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे...
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
Amravati Rain | अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील आठवडी बाजारात शिरले पाणी
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया