AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हीच ती पाच पापं, ज्यामुळे आत्माही भटकत असतो, गरूड पुराणातील सत्य काय?

Garuda Purana: महर्षी वेद व्यास यांनी 18 पुराणे संकलित केली. त्यापैकी एक गरुड पुराण आहे. हिंदू धर्मात, हे पुराण मृत्युनंतर मोक्ष प्रदान करणारे मानले जाते. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपले कर्म सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. चला तर जाणून घेऊया गरूड पुराणामध्ये कोणत्या पापांची काय शिक्षा दिली जाते.

हीच ती पाच पापं, ज्यामुळे आत्माही भटकत असतो, गरूड पुराणातील सत्य काय?
Garud puranImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 16, 2025 | 9:21 PM
Share

हिंदू धर्मामध्ये असे अनेक ग्रंथ आहेत ज्यामध्ये काही विशेष नियमांचा उल्लेख केला आहे. त्यापैकी एक म्हणजे गरुड पुराण. गरुड पुराणाला महापुराण देखील म्हटले जाते. गरूड पुराणामध्ये मानवी जीवन, मृत्यू, पाप, पुण्य आणि धर्म यांचे तपशीलवार वर्णन केले आहे. गरूड पुराणामध्ये एखाद्या व्यक्तीने केलेल्या पापांचेही तपशीलवार वर्णन केले आहे. खरंतर, गरुड पुराणानुसार, माणूस जे काही कर्म करतो, त्याचे परिणाम त्याच्या आत्म्याला मृत्यूनंतर भोगावे लागतात. मग ते पुण्यकर्म असो किंवा पापकर्म. अशा परिस्थितीत, गरुड पुराणात असे नमूद केले आहे की जीवनात काही पापी कृत्ये आहेत ज्यापासून आपण दूर राहिले पाहिजे, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात.

आपण आपल्या संपुर्ण आयुष्यात केलेले कर्म आपल्या आत्म्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याचेही म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, आपण जितके पाप आपल्या आयुष्यामध्ये करतो त्यापैक्षा दुप्पट त्रास आपल्याला मृत्यूनंतर भोगावा लागतो. त्यामुळे असे म्हटले जाते की तृप्त आत्मा नेहमी स्वर्गात जातो आणि पापी आत्मा नेहमी नर्कामध्ये. ग्रंथांमध्ये नर्काचे देखील अनेदा उल्लेख केला जातो. असे म्हटले जाते की मृत्यूचे देवता यम तुमच्या कर्मांनुसार आणि पापांनुसार तुम्हाला शिक्षा देतात. चला तर जाणून घेऊया गरुण पुराणानुसार, आपण कोणती पापी कृत्ये टाळली पाहिजेत.

ब्राह्मण हत्या – गरुड पुराणानुसार, ब्राह्मण हत्या हे सर्वात मोठे पाप मानले जाते. ब्राह्मणांना ज्ञान आणि धर्माचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते. म्हणून, त्यांना मारणे तुमच्यासाठी खूप वेदनादायक असू शकते आणि या पापामुळे तुमच्या आत्म्यालाही खूप त्रास होऊ शकतो.

गोहत्या – हिंदू धर्मात गाईला आईचा दर्जा देण्यात आला आहे आणि अशा परिस्थितीत गरुड पुराणात स्पष्टपणे म्हटले आहे की गोहत्या हे एक मोठे पाप आहे. जर एखाद्या व्यक्तीने गोहत्यासारखे पाप केले तर त्याला प्रचंड दुःख सहन करावे लागू शकते आणि त्याच्या आत्म्यालाही अनेक त्रास सहन करावे लागतात.

पालकांचा अनादर – पालकांना देवाचा दर्जा दिला जातो. अशा परिस्थितीत जर आपण आपल्या पालकांचा अपमान केला किंवा त्यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष केले तर ते मोठे पाप मानले जाते. गरुड पुराणात या पापाचा समावेश प्रमुख पापांमध्ये करण्यात आला आहे. म्हणूनच आपण नेहमी आपल्या पालकांचा आदर केला पाहिजे.

एखाद्याचे शोषण करणे – गरुड पुराणानुसार, जर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्याचे शोषण केले, किंवा एखाद्याची मालमत्ता अन्याय्य पद्धतीने हडप केली, किंवा एखाद्यावर बलात्कार केला, तर ते केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या आत्म्यासाठी देखील खूप वेदनादायक असू शकते. कारण गरुड पुराणात हे एक महापाप मानले आहे.

धर्माच्या मार्गापासून दूर जाणे…. एखाद्या व्यक्तीला त्याच्या जीवनात नेहमीच धर्माच्या मार्गाचे अनुसरण करण्याचा सल्ला दिला जातो, कारण जो व्यक्ती आपल्या जीवनात धर्माच्या मार्गापासून दूर जातो आणि विविध प्रकारच्या पापकर्मांमध्ये अडकतो, त्याचा नाश निश्चित असतो आणि तो गरुड पुराणात सांगितलेल्या शिक्षेला देखील पात्र ठरतो. म्हणून माणसाने नेहमी धर्माच्या मार्गाचे अनुसरण केले पाहिजे.

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.