AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Green Juice | मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी ‘ग्रीन ज्यूस’ गुणकारी, वाचा या रसाचे फायदे…

आजकाल मधुमेह हा एक सामान्य आजार झाला आहे. भारतात जवळपास प्रत्येक तिसरा व्यक्ती मधुमेहाचा रुग्ण आहे.

Green Juice | मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी ‘ग्रीन ज्यूस’ गुणकारी, वाचा या रसाचे फायदे...
| Updated on: Jan 19, 2021 | 3:15 PM
Share

मुंबई : आजकाल मधुमेह हा एक सामान्य आजार झाला आहे. भारतात जवळपास प्रत्येक तिसरा व्यक्ती मधुमेहाचा रुग्ण आहे. या धावपळीच्या जगतात आपल्या चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे बरेच लोक टाईप-2 मधुमेहाने ग्रस्त आहेत. भारतातील सुमारे 70 दशलक्ष लोक या आजाराने त्रस्त आहेत. म्हणूनच भारताला जगाची ‘कॅपिटल ऑफ डायबीटीस’ असेही म्हणतात (Healthy Green Juice for diabetes patients).

परंतु, हिरव्या भाज्या आणि फळांच्या रसाचे सेवन करून मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. इतकेच नाही तर हा रस आपल्या शरीरास शुद्ध करतो आणि बर्‍याच रोगांपासून आपले संरक्षण करतो. चला तर, या निरोगी रसाबद्दल जाणून घेऊया…

कसा बनवायचा हा हेल्थी रस?

हा रस तयार करण्यासाठी आपल्याकडे असलेले हिरवे सफरचंद, काकडी, लिंबू, हिरवी कोबी, हिरव्या भाज्या, पालक, बीट, लसूण, टोमॅटो, आले किंवा कारले, यापैकी कोणत्याही चार-पाच गोष्टी वापरू शकता. .

रस बनवण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी बारीक चिरून घ्या आणि गरजेनुसार त्यात पाणी टाकून, मिक्सरच्या मदतीने ‘हेल्थी ज्यूस’ तयार करा.

मधुमेहाच्या रूग्णासाठी ‘ग्रीन ज्यूस’ निरोगी!

मधुमेह असलेल्या रुग्णांना बर्‍याचदा कोणताही ज्यूस पिण्यास मनाई असते. कारण त्यात साखर जास्त प्रमाणात असते. परंतु हा निरोगी रस खास मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी आहे. मधुमेह कमी करण्यासाठी ग्रीन ज्यूस अत्यंत फायदेशीर ठरतो. टाईप-1, टाईप-2 आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल मधुमेह अशा सर्व प्रकारच्या मधुमेहावर हा रस तितकाच फायदेशीर आहे. या ग्रीन ज्यूसमुळे आपल्या शरीराची उर्जा पातळी लवकर वाढते. नियमित सकाळी या रसाचे सेवन करावे (Healthy Green Juice for diabetes patients).

ग्रीन ज्यूसचे फायदे

जीवनसत्त्वांचा स्त्रोत

हिरवे सफरचंद, काकडी, लिंबू, पालक, कारले, टोमॅटो आणि लसूण यासारख्या निरोगी वस्तूंपासून बनवलेले हा रस व्हिटामिन-ए, व्हिटामिन-सी, व्हिटामिन-के आणि लोहाचा चांगला स्रोत आहे.

ऊर्जा वाढवतो

अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध, हा ‘ग्रीन ज्यूस’ आपल्याला अनेक हानिकारक आजारांपासून वाचवतो. त्याच वेळी, हा रस आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवतो आणि दिवसभर आपली ऊर्जा देखील वाढवतो. याचबरोबर शरीरात चयापचय क्रिया देखील सुरळीत करतो.

रक्तदाब नियंत्रित करतो

‘ग्रीन ज्यूस’ केवळ मधुमेहासाठीच चांगला नाही, तर उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोका देखील कमी करतो. रोगाचा धोका कमी करण्याव्यतिरिक्त, हा रस आपल्या शरीरातील इतर अवयवांचे कार्य सुधारतो.

रक्त शुद्ध करतो

कारले आणि बीट आपले रक्त शुद्ध करते, हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. परंतु या रसातील कारले आणि बीट याशिवाय हिरवे सफरचंद, काकडी, लिंबू, आले, लसूण आणि टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट्स मुबलक प्रमाणात आहेत. या कारणास्तव, हा ज्यूस आपले रक्त शुद्ध करतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

(Healthy Green Juice for diabetes patients)

हेही वाचा :

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.