AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात दिवसाला किती पाणी प्यावे? अन्यथा होऊ शकतात हे गंभीर आजार

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे जास्त तहान लागत नाही. त्यामुळे लोक अनेकदा कमी पाणी पितात. पाणी कमी प्यायल्याने तुमचे शरीर अनेक आजारांचे घर बनू शकते. पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक आजरांचा धोका असतो. त्यामुळे हिवाळ्यात दिवसभरात किती पाणी प्यायला हवे जाणून घ्या.

हिवाळ्यात दिवसाला किती पाणी प्यावे? अन्यथा होऊ शकतात हे गंभीर आजार
| Updated on: Dec 18, 2023 | 7:43 PM
Share

मुंबई : भारतात थंडी सुरु झाली आहे. हिवाळा सुरु झाला की अनेक आजारांचा धोका देखील वाढतो. हिवाळ्यात आहारात तसा बदल करणे देखील महत्त्वाचे असते. तसे केले नाही तर अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात थंड वातावरणामुळे जास्त तहान लागत नाही. त्यामुळं लोकं कमी पाणी पितात. पण कमी पाणी प्यायल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो. कमी पाणी पित असाल तर त्याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम दिसू लागतात. शरीरात ७० टक्के पाणीच असते. जी शरिराला हायड्रेट ठेवते. त्यामुळे हिवाळ्यात किती पाणी प्यायला पाहिजे हे जाणून घेऊया.

डिहायड्रेशन होणे

हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने शरीर निर्जलित होते. ज्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो.

युरिन इन्फेक्शन

कमी पाणी पिल्याने युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता ही वाढते. हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने मूत्राशय आणि त्याच्या नळीला बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो. यामध्ये महिलांना अधिक धोका असतो.

तोंडाची दुर्गंधी

पाणी कमी प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी येऊ शकते. कमी पाणी प्यायल्याने आपले शरीर निर्जलीकरण होते, ज्याचा आपल्या शरीराच्या अनेक अवयवांवर वाईट परिणाम होतो.

पोटाशी संबंधित समस्या

कमी पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित आजार उद्भवतात. पचनक्रिया कमकुवत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

लघवीला दुर्गंधी

पाणी कमी पित असाल तर लघवीला पिवळी होते. शिवाय दुर्गंधी देखील येते. असं होत असेल तर समजा तुम्ही कमी पाणी पित आहात.

त्वचेचे विकार

कमी पाणी पिल्यामुळे त्वचा कोरडी पडते. याशिवाय इतर त्वचेचे आजार देखील होऊ शकतात. चेहऱ्यावर मुरुमांची समस्या वाढू शकते.

किडनीवर वाईट परिणाम

शरीरात पाण्याची कमतरता आली तर त्याचा सर्वात आधी ताण हा  किडनीवरच पडतो. जे चांगले लक्षण नाही.

एका दिवसात किती पाणी प्यावे

हिवाळ्यात स्वत:ला निरोगी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज 7-8 ग्लास पाणी प्यावे. दर तासाला मध्ये मध्ये पाणी प्यायला हवे. दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटू शकते.

चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर.
भाजप- संघाला कुठलाही धोका नाही; सुरक्षा घेऊन... संजय राऊतांचा घणाघात
भाजप- संघाला कुठलाही धोका नाही; सुरक्षा घेऊन... संजय राऊतांचा घणाघात.
सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट राज ठाकरे यांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट राज ठाकरे यांचा हल्लाबोल.
ज्यांनी विरोध केला त्यांनी व्याख्यानाला यावे;अमोल कोल्हे स्पष्टच बोलले
ज्यांनी विरोध केला त्यांनी व्याख्यानाला यावे;अमोल कोल्हे स्पष्टच बोलले.
शेतकरी संतापला! थेट ट्रॅक्टरभर मका जिल्हाधिकारी कार्यालयात
शेतकरी संतापला! थेट ट्रॅक्टरभर मका जिल्हाधिकारी कार्यालयात.
भाजपाला मोठा धक्का! भिवंडी महापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ
भाजपाला मोठा धक्का! भिवंडी महापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ.
महाराष्ट्र ICUमध्ये, सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट; ठाकरे यांचा इशारा
महाराष्ट्र ICUमध्ये, सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट; ठाकरे यांचा इशारा.
एकनाथ शिंदे- राज ठाकरे भेटीवर, राज ठाकरे स्पष्टच बोलले...
एकनाथ शिंदे- राज ठाकरे भेटीवर, राज ठाकरे स्पष्टच बोलले....
संदीप देशपांडेंचं व्हॉट्सअप स्टेट्स अन् किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
संदीप देशपांडेंचं व्हॉट्सअप स्टेट्स अन् किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
आधार-राशन कार्ड देणारी माणसं आपलीच; कारवाई कोण करणार?
आधार-राशन कार्ड देणारी माणसं आपलीच; कारवाई कोण करणार?.