AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या मुलाला यशस्वी आणि बुद्धिमान बनवायचे असेल तर नक्की शिकवा चाणक्य यांच्या ‘या’ 6 गोष्टी

मुलांचे संगोपन केवळ अभ्यासापुरते मर्यादित नसते. तर योग्य मित्र निवडणे, चांगले चारित्र्य घडवणे, भावनांवर नियंत्रण ठेवणे, शिस्त आणि विचारपूर्वक निर्णय घेणे या सर्व गोष्टी त्यांचे भविष्य भक्कम करू शकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण मुलांना यशस्वी आणि बुद्धिमान बनवण्यासाठी चाणक्य नीती यांच्या या 6 गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.

तुमच्या मुलाला यशस्वी आणि बुद्धिमान बनवायचे असेल तर नक्की शिकवा चाणक्य यांच्या 'या' 6 गोष्टी
| Edited By: | Updated on: Jun 13, 2026 | 4:01 PM
Share

आजच्या वेगवान जीवनात पालक अनेकदा आपल्या मुलांच्या चांगल्या शिक्षणावर, चांगल्या शाळांवर आणि अभ्यासेतर उपक्रमांवर जास्त भर देतात. अशातच एक प्रश्न अनेकदा मागे राहून जातो तो म्हणजे आपण आपल्या मुलांना जीवनाबद्दल योग्य समज देत आहोत का? कारण चांगले गुण कायम टिकून राहतात, परंतु सवयी आणि संस्कार व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला दीर्घकाळ घडवतात. म्हणूनच आचार्य चाणक्य यांनी दिलेली अनेक शिकवण आजही लोकांना विचार करण्यास प्रेरित करते. त्यांची तत्त्वे केवळ राजकारण किंवा प्रशासनापुरती मर्यादित नव्हती, तर त्यांनी व्यक्तीचे जीवन संतुलित आणि सामर्थ्यवान कसे बनवायचे हे देखील शिकवले. मुलांच्या सुरुवातीच्या काळात रुजवलेल्या काही सवयी त्यांना भविष्यात जबाबदार, स्वावलंबी आणि सुज्ञ व्यक्ती बनवू शकतात.

मुलाचे भविष्य केवळ त्यांच्या अभ्यासानेच नव्हे, तर त्याच्या सवयींनीही घडते. प्रत्येक पालकाला वाटते की त्यांच्या मुलाने यशस्वी व्हावे, पण यशाची सुरुवात अनेकदा लहान सवयींमधूनच होते. लहानपणी शिकलेल्या गोष्टी हळूहळू त्यांच्या विचार, वागणूक आणि निर्णयांचा भाग बनतात. आचार्य चाणक्यांनीही अशीच काही मूलभूत तत्त्वे सांगितली आहेत, जी मुलांना लहानपणापासूनच शिकवणे आवश्यक मानले जाते. चला तर मग कोणती आहेत ती तत्वे ते जाणून घेऊयात.

1. लहानपणापासूनच मुलांमध्ये मित्र निवडण्याची समज द्या

मुलं त्यांच्या मित्रांकडून खूप काही शिकतात. पालकांना अनेकदा वाटते की मैत्री ही एक वैयक्तिक बाब आहे, परंतु संगतीचा प्रभाव हा अ‍धिक दिवस जाणवतो. जी मुलं कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचारांना महत्त्व देणाऱ्या लोकांच्या संगतीत राहतात. त्यामुळे त्यांच्यामध्येही तशाच सवयी विकसित होतात. मुलांना इतरांबद्दल मत न बनवता, चांगल्या आणि वाईट प्रभावांमधील फरक ओळखायला शिकवणे अधिक महत्त्वाचे आहे.

2. स्वतःला अधिक महत्त्व द्यायला शिकवा

सोशल मीडिया आणि तुलनेच्या या युगात मुलं सहज प्रभावित होतात. इतरांच्या नजरेत चांगले दिसणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, असे त्यांना वाटते. पण खरी ओळख ही व्यक्तीच्या वागणुकीतून आणि निर्णयांतून घडते. लोकप्रिय असणे आणि एक चांगला माणूस असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे मुलांना शिकवणे महत्त्वाचे आहे. हेच कणखर चारित्र्याचे लक्षण आहे.

3. मुलांना वैयक्तिक मर्यादांचे महत्त्व शिकवा

आजच्या डिजिटल जगात मुलं अनेकदा अगदी लहानसहान गोष्टीसुद्धा सर्वत्र सांगत असतात. त्यामुळे प्रत्येक भावना, प्रत्येक समस्या आणि प्रत्येक वैयक्तिक माहिती प्रत्येकाशी शेअर करू नये, हे त्यांना समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. त्यांनी विश्वास आणि गुप्ता यांमधील फरक समजून घेतला पाहिजे. कुटुंब, मित्र आणि ऑनलाइन जगात मर्यादा निश्चित करणे हे एक आवश्यक जीवन कौशल्य बनले आहे.

4. बोलण्यापूर्वी विचार करण्याची सवय लावा

मुले अनेकदा राग, उत्साह किंवा भावनेच्या भरात पटकन बोलून जातात. याच गोष्टी पुढे जाऊन नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू शकतात. जर त्यांना लहानपणापासूनच बोलण्यापूर्वी काही सेकंद विचार करायला शिकवले, की एखादी गोष्ट आवश्यक आहे का किंवा ती अधिक चांगल्या प्रकारे सांगता येईल का तर ही सवय त्यांचे नातेसंबंध आणि व्यक्तिमत्त्व दोन्ही मजबूत करू शकते.

5. त्यांना कठोर परिश्रम आणि शिस्तीपासून दूर राहायला शिकवू नका

आजकाल मुलांनाही झटपट यश हवे असते. परंतु जीवनातील अनुभव दाखवतो की सातत्यपूर्ण कठोर परिश्रम आणि शिस्त दीर्घकाळात अधिक फायदेशीर ठरतात. पालकांनी आपल्या मुलांना हे पटवून दिले पाहिजे की प्रत्येक यश मिळवण्यासाठी वेळ, संयम आणि सराव लागतो. जेव्हा मुलांना प्रयत्नांचे महत्त्व समजते, तेव्हा अपयशसुद्धा त्यांना कमजोर करत नाही.

6. मुलांना त्यांचा भावना समजून घ्यायला आणि त्या नियंत्रित करायला शिकवा

भावनिकदृष्ट्या कणखर मुलं भविष्यात चांगले निर्णय घेतात. राग, निराशा, भीती किंवा उत्साह यांसारख्या भावना ओळखायला आणि त्या योग्य रीतीने व्यक्त करायला शिकणे महत्त्वाचे आहे. घरात असे वातावरण निर्माण करणे, जिथे मुले मोकळेपणाने बोलू शकतील, त्यांना त्यांच्या भावना समजून घेण्यास आणि त्या नियंत्रित करण्यास मदत करते. ही सवय त्यांना आयुष्यातील आव्हानांना सामोरे जातानाही संतुलित राहण्याचे सामर्थ्य देते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप