AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pollution | भारतातील मोठ्या शहरांमध्ये प्रदूषण वाढीची समस्या, आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता!

वाढत्या वायू प्रदूषणामुळे श्वास घेण्यास अडथळा, डोळ्यांची जळजळ, सायनस, खोकला आणि फुप्फुसासंबंधित समस्या देखील उद्भवू शकतात.

Pollution | भारतातील मोठ्या शहरांमध्ये प्रदूषण वाढीची समस्या, आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता!
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 20, 2020 | 4:15 PM
Share

मुंबई : उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा यासारख्या मोठ्या शहरात पिक कापणीनंतर उरणारा पेंढा जाळल्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत वायू प्रदूषण वाढत आहे. आजकाल दिल्लीची हवेची गुणवत्ता खराब होत चालली आहे. दिल्ली-एनसीआर भागात हवेचा गुणवत्ता निर्देशांक असमाधानकारक होत आहे. मंगळवारी तिथल्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 250च्या आसपास होता. दिल्लीसह मोठ्या शहरांतील वातावरण काही दिवस खराब राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.( Increased Air Pollution Precaution tips)

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणाचा परिणाम तुमच्या शरीरावर देखील होऊ शकतो. याशिवाय श्वास घेण्यास अडथळा, डोळ्यांची जळजळ, सायनस, खोकला आणि फुप्फुसासंबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत वायू प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण काही गोष्टींचा अवलंब करू शकता.

मास्क लावणे अनिवार्य

कोरोना काळात मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. शहरांत वायू प्रदूषण वाढत असताना विना मास्क घराबाहेर जाऊ नये. मास्क लावल्यानंतर वारंवार हातांनी स्पर्श करु नका. एकदा वापरलेला मास्क पुन्ह वापरू नये. रीयुजेबल मास्क असल्यास स्वच्छ धुवून आपण तो पुन्हा वापरू शकता. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा.( Increased Air Pollution Precaution tips)

आहारात ‘या’ घटकांचा समावेश करा

  • योग्य आहाराने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर आणि प्रतिकारशक्तीवर होतो. प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आहारा ‘या’ घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे.
  • तुळस अनेक प्रकारच्या आजारांपासून आपले रक्षण करते. म्हणूनच प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुळशीच्या पानाच्या काढ्याचे नियमित सेवन करा.
  • दररोज कोमट दूध प्या. यामुळे आपल्या प्रतिकारशक्तीत वाढ होईल. यामुळे फुप्फुसाचे धुळीकणांपासून संरक्षण होऊ शकते.
  • शक्य तेवढे पाणी प्या. अधिकच्या पाण्यामुळे शरीरातून विषाणू बाहेर पडण्यास मदत होईल.
  • कफ मुक्त होण्यासाठी मधात मिसळलेली मिरपूड सेवन करा.
  • यासह आहारात गुळाचा समावेश करा.

मोकळ्या जागेत व्यायाम करू नये.

उघड्यावर मोकळ्या जागेत व्यायाम करणे शक्यतो टाळा. कारण सकाळी आणि संध्याकाळी प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक असते. मैदानाऐवजी घरी किंवा व्यायामशाळेत व्यायाम करू शकता. मुलांनाही मैदानी खेळाऐवजी घरातील बैठे खेळ खेळण्यास सांगा. (Increased Air Pollution Precaution tips)

घरात हवा शुद्ध करणाऱ्या वनस्पती लावा.

बरेच लोक घरात कृत्रिम एअर फिल्टरचा वापर करतात. या व्यतिरिक्त, घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी आपण कोरफड, वेली, मनीप्लांट, स्पायडर प्लांट इत्यादीसारख्या हवा स्वच्छ करणाऱ्या नैसर्गिक वनस्पती लावू शकता. यामुळे घरतील वायू प्रदूषण कमी होईल.

एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे काय?

एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच हवेचा गुणवत्ता निर्देशांक हवेची योग्यता दर्शवतो. हवेची गुणवत्ता 0 ते 50 दरम्यान चांगली मानली जाते, 51 ते 100पर्यंत समाधानकारक, 101 ते 200पर्यंत मध्यम, 201 ते 300पर्यंत खराब, 301 ते 400पर्यंत अत्यंत खराब आणि 401 ते 500 दरम्यान गंभीर मानली जाते.

(Increased Air Pollution Precaution tips)

हेही वाचा : 

मेंदूतल्या नसांपर्यंत पोहोचला जीवघेणा Coronavirus, AIIMS मध्ये समोर आलं धक्कादायक प्रकरण

Protein Food | प्रोटीनसाठी ‘आर्टिफिशियल सप्लीमेंट्स’ऐवजी, आहारात करा ‘या’ नैसर्गिक घटकांचा समावेश!

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?