लोहाची कमतरता दूर करण्यासाठी ‘या’ निरोगी पेयांचा आहारात समावेश करा!

आपल्या शरीराला इतर पोषक घटकांप्रमाणे लोहाची गरज असते. शरीरातील लोहाची कमी पातळी हिमोग्लोबिनच्या उत्पादनावर परिणाम करू शकते. यामुळे अशक्तपणा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणून, आपल्या नियमित आहारात लोह समाविष्ट करणे खूप महत्वाचे आहे. लोहाची पातळी वाढविण्यासाठी आपण आपल्या आहारात विविध पेये समाविष्ट करू शकता.

लोहाची कमतरता दूर करण्यासाठी 'या' निरोगी पेयांचा आहारात समावेश करा!
निरोगी पेय
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 7:27 AM

मुंबई : आपल्या शरीराला इतर पोषक घटकांप्रमाणे लोहाची गरज असते. शरीरातील लोहाची कमी पातळी हिमोग्लोबिनच्या उत्पादनावर परिणाम करू शकते. यामुळे अशक्तपणा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणून, आपल्या नियमित आहारात लोह समाविष्ट करणे खूप महत्वाचे आहे. लोहाची पातळी वाढविण्यासाठी आपण आपल्या आहारात विविध पेये समाविष्ट करू शकता. व्हिटॅमिन सी समृद्ध पेय अॅनिमियासाठी चांगले आहेत. हे पेय तुम्ही घरीही सहज बनवू शकता. जाणून घेऊया हे कोणते पेय आहेत.

काकडी, केळ आणि पालक रस

जेव्हा आपण लोहाच्या कमतरतेसाठी व्हिटॅमिन सी ड्रिंक्सबद्दल बोलतो, तेव्हा पालकच्या रसला प्राधान्य दिले पाहिजे. पालक लोह समृद्ध आहे. ही हिरवी पालेभाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लोह व्यतिरिक्त, त्यात इतर घटक जसे जीवनसत्त्वे बी 6, बी 2, के, ई, कॅरोटीनोइड्स आणि तांबे देखील असते. काकडी, केळ आणि पालक यांचे मिश्रण करून तुम्ही निरोगी रस बनवू शकता.

संत्र्याचा रस

जेव्हा आपण व्हिटॅमिन सी चा विचार करतो. तेव्हा संत्रा ही पहिली गोष्ट मनात येते. संत्रा हे व्हिटॅमिन सी समृद्ध फळ आहे. संत्र्याचा रस आहारात समाविष्ट केला जाऊ शकतो. हे पेय रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करते. कारण त्यात लिंबूवर्गीय असते. त्यामुळे ते त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

टरबूज-डाळिंबाचा रस

फळांचा आहारात समावेश करणे आणि लोहाची कमतरता पूर्ण करण्याचा हा एक स्वादिष्ट मार्ग आहे. टरबूजमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. हे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारते. टरबूजचे काही तुकडे, डाळिंब आणि पुदिन्याची पाने घ्या आणि ते एकत्र करा. आपण त्यात थोडा मध, मीठ आणि लिंबाचा रस देखील घालू शकता.

बीटचा रस

बीटरूटमध्ये व्हिटॅमिन सी असते. त्याची पाने लोहाचा चांगला स्रोत आहेत. आपण बीटरूटचा रस बनवू शकता. त्यात मीठ आणि मिरपूड मिसळा. हे खूप चवदार आहे आणि सर्व वयोगटातील लोक त्याचा आनंद घेऊ शकतात.

अननस आणि संत्रा

अननस, संत्रापासून बनवलेला हा रस वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. परंतु त्याचे इतर आरोग्य फायदे देखील आहेत. संत्री आणि अननस हे व्हिटॅमिन सी चे चांगले स्रोत आहेत. ते शरीरातील लोहाची पातळी वाढवण्यास मदत करतात.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include these drinks in your diet to eliminate iron deficiency)

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.