AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या याबद्दलचे फायदे!

सकाळपासून सुरू होणारी धावपळ दिवसभर सुरू असते. यामुळे आपण सकाळचा नाश्ता (Breakfast) आणि दुपारचे जेवण व्यवस्थित करू शकत नाहीत. मग काय...संध्याकाळी दिवसभराचा कडता एकदाच काढला जातो आणि भरपेट दाबून जेवण केले जाते. मग जेवण झाले की, लगेचच झोपण्याची (Sleep) तयारी सुरू होते आणि दिवसभराच्या थकव्यामुळे झोपही लगेचच लागते.

Health Care : रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या याबद्दलचे फायदे!
रात्रीचे जेवण झाल्यानंतर चालणे शरीरासाठी फायदेशीर आहे. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 14, 2022 | 9:28 AM
Share

मुंबई : सकाळपासून सुरू होणारी धावपळ दिवसभर सुरू असते. यामुळे आपण सकाळचा नाश्ता (Breakfast) आणि दुपारचे जेवण व्यवस्थित करू शकत नाहीत. मग काय…संध्याकाळी दिवसभराचा कडता एकदाच काढला जातो आणि भरपेट दाबून जेवण केले जाते. मग जेवण झाले की, लगेचच झोपण्याची (Sleep) तयारी सुरू होते आणि दिवसभराच्या थकव्यामुळे झोपही लगेचच लागते. तुम्हीही रोज असेच करत असाल तर काळजी घ्या. तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. तज्ज्ञांच्या मते जेवण झाल्यावर किमान 20 मिनिटे चालणे (Walking) अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुमची पचनक्रिया चांगली राहते, तसेच अनेक आजारांपासून बचाव होतो.

रात्रीचे जेवण झाल्यानंतर फिरण्याचे फायदे कोणते हे जाणून घेऊयात

चयापचय वाढण्यास मदत

रात्रीच्या जेवणानंतर सुमारे अर्धा तास चालल्याने तुमच्या कॅलरी बर्न होतात. तुमची चयापचय क्रिया वाढते. तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या येत नाहीत आणि तुम्हाला बद्धकोष्ठता, अपचन, गॅस इत्यादींचा त्रास होत नाही. याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे वजन कमी होण्यासही मदत होते.

साखरेची पातळी नियंत्रित राहते

ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी चालणे फार महत्वाचे असल्याचे सांगितले जाते. चालण्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते. Iperglycemia चा धोका देखील कमी होतो. जर तुम्हाला मधुमेह नसेल तर जेवल्यानंतर दररोज चालणे तुम्हाला मधुमेहाच्या जोखमीपासून दूर ठेवते.

चांगली झोप येण्यास मदत

रोज रात्री चालण्याने तुम्हाला चांगली झोप येते. रक्ताभिसरण चांगले होते, त्यामुळे तुमचे मन शांत होते आणि तुम्हाला चांगली झोप लागते. चांगली झोपही आरोग्य सुधारते. बऱ्याच लोकांना रात्री झोप न येण्याची समस्या असते. मग अशावेळी आपण जेवण झाल्यावर थोडा वेळ चालले पाहिजे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत

आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे. दररोज चालण्याने आपले अंतर्गत अवयव चांगले कार्य करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. सध्याच्या वातावरणामध्ये चांगली रोगप्रतिकारक शक्ती असणे अत्यंत आवश्यक आहे.

तणाव कमी होण्यास मदत होते

दिवसभर काम केल्यावर शरीर थकतेच. शिवाय मनातील सर्व ताणतणावही दूर होतात. रोज चालण्याने हा ताण कमी होतो आणि मन शांत होते. आजकाल तणाव हे सर्व समस्यांचे कारण मानले जाते. तणाव कमी होऊन या समस्यांवरही नियंत्रण मिळते. यामुळे रात्री चालणे आपल्या मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

Health : उन्हाळ्यात मधुमेहाच्या रूग्णांनी अशाप्रकारे काळजी घेणे आवश्यक, या टिप्स फाॅलो करा! 

अँकिलोझिंग स्पॉन्डीलायटिसची प्रक्रिया धीमी करण्यासाठी काही महत्वाच्या सूचना, वाचा याबद्दल सविस्तर!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली