AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मकर संक्रांतीच्या दिवशी का खाल्ली जाते खिचडी? जाणून घ्या खिचडी खाण्याचे शरीराला होणारे फायदे

अनेक ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाण्याची परंपरा आहे. सांस्कृतिक परंपरे सोबतच त्यामागे आरोग्यदायी फायदे देखील आहे. खिचडीचे सेवन केल्याने हिवाळ्यात शरीराला पोषण तर मिळतेच पण खिचडी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

मकर संक्रांतीच्या दिवशी का खाल्ली जाते खिचडी? जाणून घ्या खिचडी खाण्याचे शरीराला होणारे फायदे
Khichdi on Makar Sankranti Image Credit source: tv9 marathi
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Jan 13, 2025 | 8:15 AM
Share

मकर संक्रांत हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक सण आहे जो दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. हा सण सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचे प्रतीक आहे. मकर संक्रांतीनंतर दिवस मोठा होतो आणि रात्र लहान होते. मकर संक्रांतीला कापणीचा सण देखील म्हटले जाते. मकर संक्रांत हा सण देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केल्या जातो. परंतु उत्तर भारतात खिचडी खाण्याची आणि दान करण्याची विशेष परंपरा आहे.

खिचडीचा संबंध केवळ मकर संक्रांतीच्या सणाशी नाही तर त्यामागे अनेक सांस्कृतिक आणि आरोग्य विषयक कारणे देखील आहेत. हिवाळ्यामध्ये खिचडीचे सेवन केल्याने शरीराला उष्णता मिळते. त्यासोबतच ते एक संपूर्ण पौष्टिक अन्न देखील आहे. जाणून घेऊ खिचडी खाण्याचे काही फायदे आणि मकर संक्रांतीला खिचडी का खाल्ली जाते याचे कारण.

मकर संक्रांतीला खिचडी खाण्याची परंपरा

मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी डाळ, तांदूळ आणि तीळ यांची खिचडी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाणे शुभ मानले जाते. उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये या दिवशी खिचडी बनवण्याची आणि खाण्याची परंपरा आहे. कारण हा सण सूर्यदेवाच्या उपासनेचा प्रतीक मानला जातो. तिळ,गुळ आणि दही टाकून खिचडी खाल्ली जाते. जी चवीला चांगली लागतेच पण त्यासोबत ती आरोग्यासाठी ही फायदेशीर मानली जाते.

खिचडीचे आरोग्याला होणारे फायदे

पचायला सोपी : खिचडी हलकी आणि पचायला सोपी असते. त्यामुळे पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत होते. हिवाळ्यात जड आणि मसालेदार अन्न अनेकदा पोटासाठी त्रासदायक ठरते त्यामुळे खिचडी हा एक आरोग्यदायी पर्याय आहे.

पोषक तत्त्वांनी समृद्ध : खिचडी मध्ये तांदूळ आणि डाळीचे मिश्रण प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचा चांगला स्त्रोत बनवते. त्यात तीळ आणि तूप टाकल्याने त्याची पौष्टिकता आणखीन वाढते.

शरीराला उबदार ठेवते

मकर संक्रांतीच्या काळामध्ये थंडी वाढलेली असते. त्यामुळे तीळ आणि उडीद डाळ यापासून बनवलेल्या खिचडीचे सेवन केल्याने शरीराला उष्णता मिळते आणि थंडीपासून बचाव होतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते: खिचडी मध्ये असलेली कडधान्य आणि तीळ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. तसेच शरीराला इन्फेक्शनशी लढण्यास सक्षम बनवतात.

ऊर्जा प्रदान करते: खिचडी मध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात. ज्यामुळे ऊर्जा मिळते हे हिवाळ्यात आळस आणि थकवा जाणवू देत नाही.

Follow Us
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...