AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केळी, लिंबू की सफरचंद? सर्वात जास्त पौष्टिक फळ कोणते?

निरोगी राहण्यासाठी रोज सफरचंद खावे, असे म्हटले जाते. वजन कमी करण्यासाठी काही लोक सकाळी केळी खातात. ही दोन्ही फळे आरोग्यदायी मानली जातात, मात्र नवीन संशोधनानुसार लिंबू हे सर्वात जास्त पौष्टिक फळ असल्याचे समोर आले आहे. चला, यामागील रहस्य जाणून घेऊया

केळी, लिंबू की सफरचंद? सर्वात जास्त पौष्टिक फळ कोणते?
lemon apple banana
| Edited By: | Updated on: Jul 31, 2025 | 4:24 PM
Share

‘रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा,’ असे नेहमीच म्हटले जाते. तसेच, वजन कमी करण्यासाठी किंवा त्वरित ऊर्जा मिळवण्यासाठी केळीलाही एक उत्तम पर्याय मानले जाते. ही दोन्ही फळे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत यात शंका नाही. पण ‘सर्वात आरोग्यदायी फळ कोणते?’ असा प्रश्न विचारल्यास, तुम्ही साधारणतः सफरचंद, संत्री किंवा केळीचेच नाव घ्याल, नाही का? मात्र, एका नवीन संशोधनाने वैज्ञानिकांनी याबद्दल एक धक्कादायक आणि आश्चर्यकारक सत्य समोर आणले आहे. एका नवीन अभ्यासात ४१ फळांचे सखोल विश्लेषण केल्यानंतर, लिंबू (Lemon) हे आरोग्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर असल्याचे निष्कर्ष त्यांनी काढले आहेत!

लिंबू ‘नंबर वन’ का ठरले?

‘ईटी’ च्या अहवालानुसार, अमेरिकेतील विल्यम पॅटरसन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 41 फळांची तुलना केली. या अभ्यासात फळांचे पौष्टिक घनता (Nutritional Density), जीवनसत्त्वांचे प्रमाण (Vitamin Content), अँटीऑक्सिडंट्स आणि आरोग्याचे फायदे या आधारावर मूल्यांकन करण्यात आले. सर्व फळांच्या विश्लेषणामध्ये, लिंबाने सर्वाधिक व्हिटॅमिन सी, विद्रव्य फायबर (Soluble Fiber), फ्लेवोनॉइड्स आणि इतर ‘प्लांट कंपाऊंड्स’ यांच्या जोरावर या यादीत पहिला क्रमांक पटकावला. लिंबामध्ये आढळणारे हे सर्व घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, पचनास मदत करण्यासाठी आणि हृदयविकारांचा धोका कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.

पहा, लिंबाची साल किती फायदेशीर आहे?

संशोधकांच्या मते, लिंबाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, त्याचे पोषक तत्वे केवळ चवीपुरती किंवा दिखाव्यापुरती नाहीत, तर ते शरीरात कसे कार्य करतात यातही ते खास आहेत. हे फळ नैसर्गिकरित्या आंबट असले तरी, शरीरात चयापचय (Metabolize) झाल्यानंतर त्याचा अल्कधर्मी प्रभाव पडतो. याचा अर्थ, ते शरीरातील ‘पीएच संतुलन’ सुधारते, ज्यामुळे पोट आणि पचनसंस्थेच्या आरोग्यात सुधारणा होते. या अभ्यासात लिंबाच्या सालीचाही उल्लेख केला आहे, ज्याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. लिंबाच्या सालीमध्ये ‘लिमोनीन’ नावाचे तेल आढळते, जे ‘अँटीमायक्रोबियल’ आणि संभाव्य ‘अँटी-कॅन्सर’ गुणधर्मांनी परिपूर्ण असते. लिंबाच्या जाड सालीमध्ये हे तेल जास्त प्रमाणात असते, जे तिला खास बनवते. तुम्ही ही साल किसून जेवणात वापरू शकता, ज्यामुळे केवळ चवच वाढणार नाही, तर आरोग्यालाही अनेक फायदे मिळतील.

अनेक आजारांवर लिंबू आहे रामबाण

लिंबातील फ्लेवोनॉइड्स रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यासोबतच, त्यातील विद्रव्य फायबर रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) स्थिर ठेवते आणि पोटात चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देते. गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिणे हा एक अत्यंत फायदेशीर उपाय आहे. विशेषतः, मधासोबत लिंबाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, कारण ते पचन क्रिया वेगवान करते. तुम्ही सॅलड, सूप किंवा राईस बाऊल्समध्ये लिंबाचा रस वापरू शकता, ज्यामुळे चव आणि पोषण दोन्ही वाढते.

सफरचंद आणि केळी देखील पौष्टिक असतात, पण लिंबू आपल्या विशेष गुणधर्मांमुळे या दोघांनाही मागे टाकते. हे छोटेसे फळ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते हृदय आणि पोटाच्या आरोग्यात सुधारणा करण्यापर्यंत अनेक आरोग्य फायदे प्रदान करते. मात्र, आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, रिकाम्या पोटी कच्चा लिंबू खाणे टाळावे. त्याची आंबटपणा दातांच्या इनॅमलला (Enamel) नुकसान पोहोचवू शकते आणि काही लोकांना पोटात जळजळही होऊ शकते. त्यामुळे, लिंबाचा रस नेहमी पाण्यात मिसळून पिणे चांगले. ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत, त्यांनी लिंबाचे सेवन सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.