Mango benefits : केवळ चवीष्टच नाही आरोग्यासाठी लाभदायी आहे आंबा, जाणून घ्या याचे बहुगुणी फायदे

आंब्यामध्ये विटामीन, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम सारखे पोषक तत्वे असतात. जी शरीरातील विविध समस्यांपासून आपली मुक्तता करतात. (Mango is not only delicious but also beneficial for health, know its many benefits)

Mango benefits : केवळ चवीष्टच नाही आरोग्यासाठी लाभदायी आहे आंबा, जाणून घ्या याचे बहुगुणी फायदे
केवळ चवीष्टच नाही आरोग्यासाठी लाभदायी आहे आंबा
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 7:08 AM

मुंबई : उन्हाळा ऋतू जवळ आला की सर्वांना ओढ लागते ती फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याची. लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे असे हे फळ म्हणजे आंबा. एखादा क्वचितच असा अपवाद असेल ज्या व्यक्तीला आंबा आवडत नसेल. रसाळ, मधाळ असे गुणधर्म असलेला हा आंबा केवळ चवीष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. आंब्यामध्ये विटामीन, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम सारखे पोषक तत्वे असतात. जी शरीरातील विविध समस्यांपासून आपली मुक्तता करतात. त्वचेपासून पोटापर्यंत सर्व समस्या दूर करतात. (Mango is not only delicious but also beneficial for health, know its many benefits)

आंब्याचे आरोग्यदायी फायदे (Benefits of Mango)

रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते

आंबा हे बहुगुणी फळ आहे. याचे आरोग्यासाठी विविध फायदे आहेत, त्यापैकीच एक म्हणजे रोगप्रतिकारशक्ती. आंब्याचे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती सुधारते, ज्यामुळे आपण कोणत्याही आजाराचा सहज सामना करु शकतो. आंब्यामध्ये विटामीन ए, विटामीन के, विटामीन ई, विटामीन बी मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आपली प्रतिकारशक्ती बळकट होते.

निरोगी हृदय

निरोगी हृदयासाठी आंबा उपयुक्त मानले जाते. यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम शरीरातील रक्तवाहिन्या शांत ठेवतात. यामुळे हृदयाचा ठोके आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत होते. मॅन्गिफेरीन नावाचा अँटीऑक्सिडंट हृदयाच्या पेशींना जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतो.

पचनक्रिया सुधारते

आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, यामुळे बद्धकोष्ठता आणि अतिसार सारख्या पचनासंबंधी समस्यांपासून मुक्ती मिळतो. बद्धकोष्ठता ग्रस्त लोकांनी आंब्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामीन सी असते. यामुळे आंब्याचे सेवम केल्याने विटामीन सी ची कमतरता भरुन निघते. शरीरातील कोलेजेन नावाची प्रथिने तयार करण्यासाठी विटामीन सी आवश्यक असते. यामुळे केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच आपण सुरकुत्या आणि रुक्ष केसांपासून सुटका मिलू शकता.

डोळ्यांसाठी फायदेशीर

आंब्यामध्ये विटामीन ए असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. विटामीन ए ची कमतरता असल्यास रुक्ष डोळे, रात्री कमी दिसणे आदि समस्या उद्भवू शकतात. यातील अँटीऑक्सिडेंट ल्यूटिन आणि इतर घटक देखील डोळ्यांना सूर्यप्रकाशापासून वाचवू शकतात. (Mango is not only delicious but also beneficial for health, know its many benefits)

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

इतर बातम्या

Tesla विरोधात चीन आक्रमक, आधी लष्कराकडून बंदी, आता सरकारी कार्यालयांमध्ये नो एंट्री

12 आमदारांच्या नियुक्त्यांवर कधी निर्णय घेणार? HC ने राज्यपालांकडे मागितले स्पष्टीकरण

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.