AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्भावस्थेमध्ये नारळ पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे….

रळ पाणीमध्ये इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक त्यात आढळतात.

गर्भावस्थेमध्ये नारळ पाणी पिण्याचे 'हे' फायदे....
| Updated on: Mar 05, 2021 | 3:59 PM
Share

मुंबई : नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. नारळ पाणीमध्ये इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक त्यात आढळतात. जरी नारळाच्या पाण्याची चव गोड असली, तरी त्यात नैसर्गिक साखर असते आणि कृत्रिम स्वीटनर अजिबात वापरला जात नाही. त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. गर्भावस्थेमध्ये तर नारळ पाणी सर्वात चांगले मानले जाते. जास्तीत महिलांनी गर्भावस्थेमध्ये नारळ पाणी पिले पाहिजे. (Many benefits of drinking coconut water during pregnancy)

-गर्भावस्थेमध्ये पहिल्या तीन महिन्यामध्ये डिहायड्रेशनची समस्या असणे सामान्य आहे. अशा परिस्थितीत नारळ पाणी जास्त पिले पाहिजे यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. तसेच, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

-बऱ्याच महिलांना चहा आणि काॅफी पिण्याची सवय असते. मात्र, गर्भावस्थेमध्ये डाॅक्टर चहा आणि काॅफी नका घेऊ असा सल्ला देतात अशावेळी नारळ पाणी हा एक उत्तम उपाय असू शकतो. दिवसातून आपण कितीही वेळ नारळ पाणी पिऊ शकतो.

-गर्भावस्थेमध्ये नारळ पाणी पिण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती चांगली होते तसेच मूत्रपिंडाचे कार्य देखील सुधारते.

-नारळ पाण्यामुळे आई आणि बाळाला दोघांनाही चांगले पोषक तत्व मिळतात यामुळे गर्भावस्थेमध्ये नारळ पाणी पिणे आवश्यक आहे.

-कोणत्याही गोष्टीचे जास्त प्रमाणात सेवन करणे हानिकारक असू शकते. एक ग्लास नारळाचे पाणी पिऊन एखाद्या महिलेला पुरेसे पोषक मिळतात. याशिवाय नारळपाणी नेहमीच ताजे प्या. शिळे किंवा खुले नारळ पाणी पिऊ नका. जर नारळ पाण्याची चव वेगळी लागत असेल तर ते नारळ पाणी पिणे शक्यतो टाळा.

-जर्नल ऑफ मेडिसिनल फूडमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार असेही नमूद केले आहे की, नारळ पाण्यामुळे मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते. परंतु, याचवेळी हे लक्षात ठेवणे देखील महत्वाचे आहे की, ते नैसर्गिकरित्या गोड आहे आणि फ्रुक्टोज आहे म्हणून, नारळाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात सेवन करू नये. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेह रूग्णांनी दररोज 1 कपपेक्षा (240 एमएल) जास्त नारळ पाण्याचे सेवन करू नये.

संबंधित बातम्या : 

Hair Care | केसांची निगा राखण्यासाठी सोनम कपूरच्या टिप्स, तुम्हीही एकदा ट्राय करून पाहा!

Skin Care | सकस अन्न खा, भरपूर पाणी प्या, हिवाळ्यात त्वचेचे सौंदर्य जपा!   

Health | केस विरळ होण्याची समस्या, काळजी घेण्याऐवजी तुम्हीही ‘या’ चुका करताय?

(Many benefits of drinking coconut water during pregnancy)

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.