AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात फंगल इंफेक्शन होऊ नये यासाठी स्वत:चे करा असे संरक्षण

पावसाळ्यात वातावरण आल्हाददायक बनत असले तरी, त्यामुळे आर्द्रता देखील वाढते, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता वाढते. यामुळे त्वचेशी संबंधित समस्याही वाढू लागतात. पावसाळ्यात त्वचेच्या संसर्गापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हे जाणून घ्या.

पावसाळ्यात फंगल इंफेक्शन होऊ नये यासाठी स्वत:चे करा असे संरक्षण
Monsoon skin fungal infectionImage Credit source: tv9 marathi
| Edited By: Mayuri Sajerao | Updated on: Jun 30, 2025 | 8:03 PM
Share

पावसाळा हा ऋतू उष्णतेच्या कडाक्यापासून आराम घेऊन येतो. आपल्यापैकी अनेकांना पावसाळा हा ऋतू खूप आवडतो तर काहींना नाही. सध्या हवामानात संतुलन राखण्यासाठी तसेच शेती क्षेत्रासाठी तसेच पृथ्वीवरील जीवनासाठी हे खूप महत्वाचे आहे. तर पावसाळा या हंगामात फायद्यांसोबतच काही नुकसान देखील आहेत. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे या ऋतूत अनेक आजार होण्याची भीती असते आणि अनेकांना त्वचेशी संबंधित समस्याही उद्भवू लागतात. बुरशीजन्य संसर्ग म्हणजेच फंगल इंफेक्शन टाळण्यासाठी काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात त्वचचे संसर्ग होण्याचे प्रमाण खूप वाढते. त्यामुळे या ऋतूत तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टी आधीच लक्षात ठेवल्या तर त्या टाळता येतात, जेणेकरून तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागणार नाही. फंगल इंफेक्शन टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

त्वचा कोरडी आणि स्वच्छ ठेवा

त्वचचे संसर्ग टाळण्यासाठी त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवणे खूप महत्वाचे आहे. आंघोळ केल्यानंतर ताबडतोब टॉवेलने स्वतःला पुसून घ्या आणि मान, पाय आणि काखेच्या दरम्यानच्या भागाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. जेव्हा तुम्हाला घाम येतो तेव्हा टॅल्कम पावडर वापरा आणि तुमची त्वचा सुती कापडाने पुसून टाका.

पावसात भिजल्यानंतर करा हे काम

जर तुम्ही पावसात भिजला असाल तर त्यानंतर घरी गेल्यावर लगेच साध्या पाण्याने आंघोळ करा. पावसात भिजल्यानंतर डोके स्वच्छ करा. ओल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ राहू नका. यामुळे पुरळ आणि मुरुम यासारख्या समस्या उद्भवतात.

पावसाळ्यात बाहेरून येताना घ्या अशी काळजी

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कामावरून किंवा इतर कुठूनही घरी आल्यावर लगेच घरामध्ये वावरू नका. त्याआधी येऊन हातपाय धुवा. विशेषतः जर तुमचे पादत्राणे ओले झाले तर स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. कारण पावसाळ्यात पायांच्या बोटांमध्ये त्वचेचे संसर्ग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

उन्हात कपडे वाळवा

बऱ्याचदा पावसात कपडे दमट राहतात. त्यामुळे असे कपडे घालणे टाळा. तुमचे कपडे, टॉवेल इत्यादी योग्यरित्या उन्हात ठेवा. विशेषतः अंतर्वस्त्रे फक्त उन्हात वाळवा. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या त्वचेच्या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर स्वतःवर उपचार करण्याऐवजी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि योग्य सल्ला घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी घडामोड! खासदारांनंतर आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी एका वाक्यातच सांगितलं, आमचा...
एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडल
MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब...
मोठी बातमी! 5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब; थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार
दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?
Operation Tiger | दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...