AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्याच्या दिवसात या पदार्थांचा जेवणात समावेश करा; जाणवणार नाही उष्णतेचा त्रास

Diet For Summer drink fruit Juice and Curd : रोजच्या खाण्याच्या सवयींमधील छोटा बदल तुम्हाला तंदुरुस्त ठेवू शकतो... उन्हाळ्यात कोणत्या गोष्टींचं सेवन केलं पाहिजे? तुमच्या आहारात कोणता बदल कराल? उन्हाळ्यात कोणते पदार्थ खावेत? डाएट कसं असावं? वाचा सविस्तर...

उन्हाळ्याच्या दिवसात या पदार्थांचा जेवणात समावेश करा; जाणवणार नाही उष्णतेचा त्रास
| Updated on: Mar 17, 2024 | 3:44 PM
Share

मुंबई | 17 मार्च 2024 : मार्च महिन्याच्या मध्यावधीत आपण आहोत. सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेक समस्या जाणवू शकतात. अनेकदा आपण आजारीही पडू शकतो. अनेकांना उष्माघाताचा त्रास होतो. मात्र आहारात थोडासा बदल केला तर आपण या कडक उन्हाळ्यातही निरोगी राहू शकतो. त्यासाठी रोजच्या खानपानाच्या सवयींमध्ये तुम्हाला थोडा बदल करावा लागेल. काही पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास तुम्हाला त्रास जाणवणार नाही. हे पदार्थ नेमके कोणते आहेत? कोणत्या फळांचा ज्यूस प्यावा? जाणून घेऊयात…

आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश कराल?

मौसम कोणताही असो. तुमचा आहार तुमच्या शरिरावर परिणाम करतो. त्यामुळे सकस आहार असेल याची काळजी नेहमीच घेतली पाहिजे. शक्यतो लहानपणापासून खास आलेली भाजी – पोळी याचा जेवणात समावेश असू द्या.

या उन्हाळ्याच्या मौसमात तुम्हाला तुमच्या आहारात काही बदल करावा लागेल. तसं केल्यास तुमच्या शरिरात सकारात्मक बदल दिसतील. रोजच्या जेवणात एक तरी पातळ भाजी असेल याची काळजी घ्या. शिवाय गाजर, काकडी या सारख्या फळांचाही जेवणात समावेश करा. तसंच जेवताना तुम्ही दही देखील खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरिराचं तापमान कमी होण्यास मदत होईल.

फळं खावीत…

उन्हाळ्याच्या दिवसात शरिरात पाण्याची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणीदार फळांचा जेवणात समावेश करा. कलिंगड, खरबूज, द्राक्षे या सारखी फळं रोज खालली जातील, याकडे लक्ष द्या.

ज्यूस आणि ताक

उन्हाळ्याच्या दिवसात जितकं पाणी तुमच्या शरिरात जाईल, तितकं चांगलं…. त्यासाठी दिवसातून किमान एखादा तरी ज्यूस प्या… यात कलिंगड, खरबूज, पाईनअॅपल या फळांचा समावेश असू द्या. याशिवाय जितकं ताक प्याल तितकं शरिर ताजं तवानं राहतं. त्यामुळे शक्य होईल तेव्हा ताक आणि लस्सी प्या. याशिवाय जास्तीत जास्त पाणी प्या.

टीप- ही माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे. जर तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क करा. या टिप्स फॉलो करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.