AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या ताटात ‘हे’ पदार्थ दिसायलाही नको, अन्यथा डोळ्यांपासून किडनीपर्यंत होतील गंभीर दुष्परिणाम!

मधुमेही लोकांनी आपल्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे अतिशय आवश्‍यक असते. काही पदार्थांमुळे मधुमेहाची पातळी आणखी वाढू शकते. त्यामुळे कुठल्या गोष्टी मधुमेही लोकांना टाळाव्या, याची माहिती या लेखातून घेणार आहोत.

मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या ताटात ‘हे’ पदार्थ दिसायलाही नको, अन्यथा डोळ्यांपासून किडनीपर्यंत होतील गंभीर दुष्परिणाम!
मधुमेहाची समस्या
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Apr 22, 2022 | 1:33 PM
Share

मुंबई : ताणतणाव, बदलती जीवनशैली (Lifestyle) खाण्याच्या चुकीच्या सवयी, व्यसन आदी विविध कारणांमुळे भारतात मोठ्या प्रमाणात मधुमेहाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. मधुमेहींची वाढती संख्या पाहता भारताला मधुमेहींची राजधानी म्हटले जात आहे. पुर्वी फक्त प्रगत देशांमधील समजला जाणारा मधुमेह (diabetes) हा आजार आता भारतात सर्वत्र पसरत चालला आहे. याला प्रामुख्याने चुकीच्या आहार सवयी कारणीभूत आहेत. अनेक पदार्थ असे असतात ज्यांच्या सेवनामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी (Blood sugar levels) वाढत असते. त्यामुळे अशा लोकांनी आपल्या आहारात काही पदार्थांना वगळने आवश्‍यक असते. कुठले पदार्थ खाण्यापासून वाचले पाहिजे, याची माहिती या लेखातून घेणार आहोत.

रताळे

रताळ्यांमध्ये बीटा कॅरोटीन असते. ज्यामुळे याचे ग्लाईसेमिक इंडेक्समध्ये वाढ होत असते. रताळ्यांमध्ये कार्बोहाइड्रेटचे प्रमाणदेखील जास्त असते. यामुळे मधुमेही लोकांच्या आरोग्यासाठी हे घातक असते.

हिरवे वाटाणे

मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी हिरवे वाटाणे खाणे टाळले पाहिजे. वाटाण्यांमध्येही कार्बोहाइड्रेटचे प्रमाण अधिक असते. यामुळे मधुमेहींची साखरेची पातळी आणखीन वाढू शकते.

मका

भारतासारख्या देशात मक्याचे अधिक सेवन केले जात असते. विविध अन्न घटकांमध्ये मका वापरला जात असतो. परंतु मक्यातदेखील मोठ्या प्रमाणात कार्बोहाइड्रेट असतात. त्यामुळे मधुमेहींनी मका खाणे टाळायल हवे.

फास्ट फूड

अनेक लोक प्रक्रिया केलेले अन्न तसेच फास्ट फूडचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असतात. परंतु हे त्याच्या आरोग्यासाठी धोकेदायक ठरु शकते. विशेषत: मधुमेही लोकांनी याचे सेवन करणे टाळलेच पाहिजे. बर्गर, पिझ्झा, मोमोज, फ्राइड घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहाइड्रेट असतात. त्यामुळे मधुमेहींच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत असतो.

पिष्टमय भाज्या

पिष्टमय भाज्या मधुमेहींसाठी धोकेदायक ठरु शकतात. त्यामुळे मधुमेहाची समस्या असलेल्यांनी या भाज्यांपासून स्वत:ला लांब ठेवावे. वाटाणे, मकई आदींमध्ये पिष्टमय घटकांचे प्रमाण अधिक असते. यामुळे रक्तातील साखर वाढण्याचा धोका नाकारता येत नाही.

द्राक्ष आणि चिकू

मधुमेही लोकांनी द्राक्ष आणि चिकू या दोन्हींचे सेवन करणे टाळायला हवे. या फळांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढीस लागत असते. त्यामुळे याचे सेवन करणे मधुमेही लोकांसाठी घातक ठरु शकते.

संबंधित बातम्या

आग्रा गेल्यावर ‘या’ पदार्थांचा आस्वाद घ्यायलाच हवा; शास्त्र असतं ते!

कोण म्हणतं सॉरी म्हटल्यानं प्रश्‍न संपतात… तुमच्या नात्यावर असा होईल दुष्परिणाम

Health Care : उन्हाळ्याच्या हंगामामध्ये अति थंड पाण्याचे सेवन करणे टाळाच, वाचा महत्वाचे!

Follow Us
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
Abhijit Dipake | आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, व्हिडीओ पहाच
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! तजिंदर बग्गांचा गंभीर आरोप; सोशल मीडियावर नवा वाद
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेप
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेपार्ह...
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार...
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार खोटी?
24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
E 20 Janata Party | E-20 विरोधात जनआक्रोश! 24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप...
Viral Video | 37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप बनवण्याची घाणेरडी पद्धत उघड
दिल्लीत हालचाली वाढल्या! वकीलांसोबतच्या चर्चेत मोठा निर्णय? अभिजीत
दिल्लीत हालचाली वाढल्या! वकीलांसोबतच्या चर्चेत मोठा निर्णय? अभिजीत दीपकेच्या भेटीगाठी सुरुच
AK-47 ने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार, मोदींचं आश्वासन कुठं गेलं? हे सरकार
Rahul Gandhi | AK-47 ने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार, मोदींचं आश्वासन कुठं गेलं? हे सरकार खोटं आहे; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
महत्त्वाच्या विधेयकाची प्रस्तावना अजून प्रलंबित, अधिवेशनाच्या दुसऱ्या
महत्त्वाच्या विधेयकाची प्रस्तावना अजून प्रलंबित, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही मोठा गोंधळ