AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोणचं ठरू शकतं ‘विष’; खाण्यापूर्वी ‘या’ 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा, तुम्ही पण या चुका करता का?

लोणचं जेवणाची चव वाढवते, त्यामुळे अनेकांना ताटात लोणचं असल्याशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. मात्र हे चवदार लोणचं आरोग्यासाठी विष ठरू शकतं. होय, चुकीच्या पद्धतीने जर लोणचं साठवलं तर ते आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. त्यासाठी लोणचं खाण्यापूर्वी आणि साठवण्याआधी या तीन गोष्टी नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

लोणचं ठरू शकतं 'विष'; खाण्यापूर्वी 'या' 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा, तुम्ही पण या चुका करता का?
Pickles can become toxic remember 3 things before eating and storing themImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 02, 2025 | 6:49 PM
Share

अनेकांना रोज जेवताना कांदा , लिंबू किंवा लोणचं लागतंच. काहींना तर लोणचं एवढं आवडत की ते जेवणासोबत, किंवा कधी भाजी आवडली नाही तर त्या लोणच्यासोबत चपाती किंवा भात खातात.जेवण कितीही साधं असलं तरी बाजूला आंबट-तिखट असं लोणचं नसेल तर जेवण अपूर्णच वाटते. लोणचं केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर जेवणाला झणझणीत टच देतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हेच लोणचं कधी कधी शरीरासाठी विषासारखाही ठरू शकतं. होय, हे चविष्ट लोणचं तुम्हाला नुकसानकारकही ठरू शकतं.

लोणचं खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते

एका हेल्थ एक्सपर्ट यांच्या मते चुकीच्या पद्धतीने साठवलेलं लोणचं खाल्ल्याने विषबाधा झाली होती. तज्ज्ञांच्या मते, लोणचं योग्य रीतीने प्रिझर्व न केल्यास त्यात घातक बॅक्टेरिया वाढू शकतात आणि ते गंभीर आजारांनाही कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे रोज खाण्यातलं असणारं लोणचं इतक घातक ठरू शकेल याचा विचार पण आपण कधी केलाही नसेल. पण खरंच आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यामुळे विषबाधा होऊ शकते. लोणचं नीट प्रिझर्व्ह नसेल केला, तर त्यामध्ये ‘बोटुलिझम’ नावाचा जीवाणू वाढतो. हा जीवाणू टॉक्सिन्स (विषारी द्रव्ये) तयार करतो, जे शरीरात गेल्यास पॅरालिसिससारखा गंभीर आजार होऊ शकतो. काही वेळा हे जीवघेणंही ठरू शकतं. त्यामुळे लोणचं बनवताना आणि साठवताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यावश्यक आहे.त्या कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊयात.

लोणचं साठवताना या गोष्टी लक्षात ठेवा

नेहमी स्वच्छ बरण्यांचा वापर करा : लोणचं साठवताना स्वच्छ आणि स्टेरिलाइज्ड काचेच्या बरण्यांचा वापर करा. काचेची बरणी सर्वोत्तम असते कारण प्लास्टिकमध्ये केमिकल रिस्क असतो आणि मेटलच्या डब्यात रिऍक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून काचेची बरणी उत्तम पर्याय आहे. पण बरणी वापरण्यापूर्वी गरम पाण्याने ती स्वच्छ धुवा आणि पूर्णपणे कोरडी होऊ द्या.असं केल्याने बॅक्टेरिया किंवा फंगस वाढण्याचा धोका कमी होतो.

लोणच्यामधील तेल आणि व्हिनेगर: लोणच्यामधील तेल आणि व्हिनेगर (सिरका) हे नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह असतात. पण त्यांचं प्रमाण कमी असेल, तर लोणच्यामध्ये बॅक्टेरिया वाढतात. नेहमी तेलाची पातळी वरपर्यंत राहतेय का हे तपासा.वरचा भाग कोरडा राहिला, तर फंगस लागण्याचा धोका वाढतो.म्हणून नियमितपणे लोणचं पाहत राहा आणि आवश्यक असल्यास तेल किंवा व्हिनेगर वाढवा.

हे लक्षण दिसले तर लोणचं लगेच फेकून द्या: जरलोणचं ही भारतीय जेवणातील चविष्ट परंपरा आहे, पण थोडासा निष्काळजीपणा तुमच्या आरोग्याशी खेळ करू शकते. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही घरी लोणचं बनवा किंवा बाजारातून आणा, तेव्हा स्वच्छता, योग्य साठवण आणि प्रमाणबद्ध तेल-व्हिनेगरचा वापर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.