AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डेंग्यू झाला असल्यास भात खावा की नाही? आहार कसा असावा?

डेंग्यूमध्ये उपचार जसे महत्त्वाचे असतात तसाच आहारही महत्त्वाचा असतो. कारण आहार योग्यप्रकारे घेतला नाही तर आजारातून बरे होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्यासाठी डॉक्टरांचे उपचारांसोबतच आहारही चांगला घ्यावा. तसेच अनेकांना असाही प्रश्न असतो की डेंग्यूमध्ये भात खाऊ शकतो का? तर त्याबद्दलही जाणून घेऊयात.

डेंग्यू झाला असल्यास भात खावा की नाही? आहार कसा असावा?
Should I eat rice or not if have dengueImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Oct 14, 2025 | 8:33 PM
Share

सध्याचं वातावरण पाहता अनेकांना डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होताना दिसत आहेत. साधं व्हायरल दिसणाऱ्या तापाची लक्षणे नंतर डेंग्यू सारख्या आजाराची निघतात. मग अशावेळी औषधांपासून ते आहारापर्यंत सगळ्याच गोष्टी बदलाव्या लागतात. काहींना याची माहिती असते तर काहींचा गोंधळ होतो. जसं की अनेकांना भात खाण्याबद्दल संभ्रम असतो. म्हणजे डेंग्यू झाला असल्यास भात खावा की नाही? असा प्रश्न असतो. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला तर घेऊच शकता. जाणून घेऊयात की डेंग्यू झाला असल्यास भात खावा की नाही. तसेच आहार नेमका कसा असावा हे देखील जाणून घेऊयात.

डेंग्यूची लक्षणे काय असतात?

डेंग्यूच्या लक्षणांमध्ये उच्च ताप, डोकेदुखी, तीव्र स्नायू आणि सांधेदुखी आणि लाल पुरळ यांचा समावेश आहे. जर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिले नाही तर डेंग्यूपासून पूर्णपणे बरे होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.

रुग्णाचा आहार कसा असावा?

आहारतज्ज्ञांच्या मते डेंग्यूच्या रुग्णांनी आहार हलकाच ठेवावा. दुपारी थोड्या प्रमाणात भात खाऊ शकतो. माफक प्रमाणात भात खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतो. तथापि, आहारतज्ज्ञांच्या मते, रात्री भात खाणे टाळावे.

डेंग्यूमध्ये काय खावे?

डेंग्यूमध्ये शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. अशावेळी पपईच्या पानांचा रस पिण्याची शिफारस केली जाते. प्लेटलेट्सचा काउंट वाढवण्यासाठी तुम्ही पपईच्या पानांच्या रसासोबत पपईचे सेवन करू शकता. पण संध्याकाळच्या वेळी पपई खाणे टाळावे. तसेच, अंड्यातील पिवळ बलक काढून टाकून अंड्याचा पांढरा भाग खाणे चांगले मानले जाते.

पौष्टिकतेने समृद्ध दही फायदेशीर ठरेल

डेंग्यूच्या रुग्णांना दही खाण्याचा सल्ला दिला जातो. शरीराची ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी दही प्रभावी ठरू शकते. पण रात्री दही खाणे टाळा. दिवसा मर्यादित प्रमाणात ते खा. याव्यतिरिक्त, जर तुम्हाला डेंग्यूपासून लवकर बरे व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहार योजनेत खिचडीचा समावेश करू शकता.

महत्त्वाची टीप: डेंग्यू झाल्यावर योग्य आहार जसा महत्त्वाचा आहे तसेच उपचारही महत्त्वाचे आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या तसेच उपचारही सुरु ठेवा.

Follow Us
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?.

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा