AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डेंग्यू झाला असल्यास भात खावा की नाही? आहार कसा असावा?

डेंग्यूमध्ये उपचार जसे महत्त्वाचे असतात तसाच आहारही महत्त्वाचा असतो. कारण आहार योग्यप्रकारे घेतला नाही तर आजारातून बरे होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्यासाठी डॉक्टरांचे उपचारांसोबतच आहारही चांगला घ्यावा. तसेच अनेकांना असाही प्रश्न असतो की डेंग्यूमध्ये भात खाऊ शकतो का? तर त्याबद्दलही जाणून घेऊयात.

डेंग्यू झाला असल्यास भात खावा की नाही? आहार कसा असावा?
Should I eat rice or not if have dengueImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Oct 14, 2025 | 8:33 PM
Share

सध्याचं वातावरण पाहता अनेकांना डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होताना दिसत आहेत. साधं व्हायरल दिसणाऱ्या तापाची लक्षणे नंतर डेंग्यू सारख्या आजाराची निघतात. मग अशावेळी औषधांपासून ते आहारापर्यंत सगळ्याच गोष्टी बदलाव्या लागतात. काहींना याची माहिती असते तर काहींचा गोंधळ होतो. जसं की अनेकांना भात खाण्याबद्दल संभ्रम असतो. म्हणजे डेंग्यू झाला असल्यास भात खावा की नाही? असा प्रश्न असतो. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला तर घेऊच शकता. जाणून घेऊयात की डेंग्यू झाला असल्यास भात खावा की नाही. तसेच आहार नेमका कसा असावा हे देखील जाणून घेऊयात.

डेंग्यूची लक्षणे काय असतात?

डेंग्यूच्या लक्षणांमध्ये उच्च ताप, डोकेदुखी, तीव्र स्नायू आणि सांधेदुखी आणि लाल पुरळ यांचा समावेश आहे. जर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिले नाही तर डेंग्यूपासून पूर्णपणे बरे होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.

रुग्णाचा आहार कसा असावा?

आहारतज्ज्ञांच्या मते डेंग्यूच्या रुग्णांनी आहार हलकाच ठेवावा. दुपारी थोड्या प्रमाणात भात खाऊ शकतो. माफक प्रमाणात भात खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतो. तथापि, आहारतज्ज्ञांच्या मते, रात्री भात खाणे टाळावे.

डेंग्यूमध्ये काय खावे?

डेंग्यूमध्ये शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. अशावेळी पपईच्या पानांचा रस पिण्याची शिफारस केली जाते. प्लेटलेट्सचा काउंट वाढवण्यासाठी तुम्ही पपईच्या पानांच्या रसासोबत पपईचे सेवन करू शकता. पण संध्याकाळच्या वेळी पपई खाणे टाळावे. तसेच, अंड्यातील पिवळ बलक काढून टाकून अंड्याचा पांढरा भाग खाणे चांगले मानले जाते.

पौष्टिकतेने समृद्ध दही फायदेशीर ठरेल

डेंग्यूच्या रुग्णांना दही खाण्याचा सल्ला दिला जातो. शरीराची ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी दही प्रभावी ठरू शकते. पण रात्री दही खाणे टाळा. दिवसा मर्यादित प्रमाणात ते खा. याव्यतिरिक्त, जर तुम्हाला डेंग्यूपासून लवकर बरे व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहार योजनेत खिचडीचा समावेश करू शकता.

महत्त्वाची टीप: डेंग्यू झाल्यावर योग्य आहार जसा महत्त्वाचा आहे तसेच उपचारही महत्त्वाचे आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या तसेच उपचारही सुरु ठेवा.

Follow Us
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच
ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा
Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा आरक्षणावरून सरकारला थेट सवाल
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल