AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Valentine Day : धर्माच्या सीमा ओलांडत लग्नगाठ बांधली, रसिका आणि आसिफचा आंतरधर्मीय प्रेम विवाह पुन्हा चर्चेत

कधीकाळी संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या नाशिकमधील एक विवाह पुन्हा एकदा दीड वर्षांनी व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने चर्चेत आली आहे.

Valentine Day : धर्माच्या सीमा ओलांडत लग्नगाठ बांधली, रसिका आणि आसिफचा आंतरधर्मीय प्रेम विवाह पुन्हा चर्चेत
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Feb 13, 2023 | 10:59 AM
Share

नाशिक : काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ( Social Media ) एक लग्नपत्रिका व्हायरल झाली होती. त्यामध्ये लिहिलं होतं रसिका ( Rasika ) आडगावकर आणि आसिफ ( Asif )  खान. त्यामुळे या विवाहाला धार्मिक रंग देऊन लग्न मोडण्यासाठी कट्टरवादी लोकांनी यामध्ये पुढाकार घेतला होता. त्यामुळे संपूर्ण राज्यात हा चर्चेचा विषय झाला होता. यामधील विशेष बाब म्हणजे दोन्ही समाजातील कट्टरवादी लोकांनी या लग्नाला विरोध करूनही दोन्ही मुला-मुलीकडील कुटुंबं त्यांच्यासोबत होते. त्यामुळे लग्न होणार हे जवळपास निश्चित होते. मात्र, विरोध पाहता लग्न होणार की नाही अशी सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली होती.

पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. असं असलं तरी आजही आंतरधर्मीय असो नाहीतर आंतरजातीय विवाह असो त्याला अनेक ठिकाणी विरोध केला जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना सुद्धा घडतात.

आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाह केल्यानंतर समाज काय म्हणेल, नातेवाईकांमध्ये काय चर्चा होईल अशा भीतीपोटी अनेक विवाह होत नाही पण याच भिंती तोडून दीड वर्षापूर्वी आसिफ आणि रसिकाचा विवाह पार पडला होता.

विशेष म्हणजे संपूर्ण ठिकाणाहून विरोध होत असतांना तत्कालीन मंत्री बच्चू कडू यांनी आसिफ आणि रसिकाची भेट घेतली होती. त्यानंतर हा विवाह निर्विघ्नपणे पार पडला होता. आज त्यांच्या लग्नाला जवळपास दीड वर्षे पूर्ण झाले आहे.

आसिफ आणि रसिका यांची खरंतर ओळख महाविद्यालयात झाली होती. त्यांची चांगली मैत्री झाल्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. त्यानंतर दोघांनीही आपल्या घरी याबाबत माहिती देऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

दोन्ही कुटुंबाकडून संमती मिळाल्यानंतर लग्न सोहळा पार पडत होता. मात्र, नातेवाइकांनीच लग्नपत्रिका व्हायरल करत लग्न मोडण्यास सुरुवात केली होती, त्यानंतर कट्टरवादी लोकांनी यामध्ये उडी घेत लग्न मोडण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, आज दीड वर्षे झाले असून रसिका आणि आसिफ यांचा सुखाने संसार सुरू असल्याचे सांगत आहे. आम्ही लग्न करतांना हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला होता असे सांगत असतांना त्यांना आजही तो विरोध डोळ्यासमोर येत आहे.

आसिफ आणि रसिका यांच्या प्रेमाची चर्चा सध्या सुरू असलेल्या व्हॅलेंटाईन विकमध्ये चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा, त्यामध्ये झालेला विरोध आणि आता सुखी असलेल्या संसाराची चर्चा होऊ लागली आहे.

Follow Us
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री... कथित डॉनच्या घरावर छापा
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं,
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं, महाजन यांचा पत्ता कट?
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय