AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care | आरोग्यासाठी लाभदायी तुळशीचे पाणी, मिळतील हे जबरदस्त फायदे

तुळशीत अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आणि अँटी-ऑक्सिडेंट पोषक तत्व आहेत. जे शरीरातील वाईट घटक दूर करण्यात मदत करतात. (Tulsi water, which is beneficial for health, will have tremendous benefits)

Health Care | आरोग्यासाठी लाभदायी तुळशीचे पाणी, मिळतील हे जबरदस्त फायदे
तुळशीशिवाय अपूर्ण असते भगवान विष्णूची पूजा
| Updated on: May 29, 2021 | 11:03 PM
Share

नवी दिल्ली : आपल्या घरात तुळस असते. तुळशीचे धार्मिक आणि आरोग्यदायी असे बरेच फायदे आहेत. तुळस पवित्र मानली जाते. तुळस औषध म्हणूनही काम करते. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदानुसार, तुळशी औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. अशा परिस्थितीत तुळशीचे पाणी शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही सकाळी उठलात आणि एक ग्लास तुळशीच्या पाण्याचे सेवन केले तर तुमच्या शरीरासाठी ते चांगले आहे. (Tulsi water, which is beneficial for health, will have tremendous benefits)

तुळशीच्या पाण्याने शरीरात उर्जा निर्माण होते

तुळशीत अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आणि अँटी-ऑक्सिडेंट पोषक तत्व आहेत. जे शरीरातील वाईट घटक दूर करण्यात मदत करतात. आपण तुळशीचे पाणी प्यायल्यास ते आपल्या शरीरात उर्जा टिकून राहते. तुळशीचा उपयोग प्रत्येक घरात औषध म्हणून केला जातो. दररोज सकाळपासून उठल्यानंतर, तुळशीचे पाणी प्यायल्याने दिवसभर आपणास ऊर्जा मिळते. कारण तुळशीमध्ये अशी अनेक पौष्टिक तत्वे असतात. ज्यामुळे आळस, तणाव आणि अशक्तपणा येत नाही. हेच कारण आहे की आपल्या शरीरात उर्जा कायम राहते. दररोज सकाळी तुळशीचे पाणी पिऊन तुम्ही स्वतःला ताणतणावमुक्त ठेवू शकता. कारण तुळशीमध्ये हार्मोन्स कोर्टिसोल असते ज्यामुळे ताण कमी होतो. तुळशीचे पाणी प्यायल्याने चिंता व नैराश्य कमी होते.

तुळशीमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते

रक्तातील साखरेची पातळी राखण्यास तुळशीचे पाणी मदत करते. शरीरातील साखरेचे ऊर्जेमध्ये परिवर्तित करते. म्हणजेच ब्लड शुगरच्या रुग्णांसाठी तुळशीचे पाणी पिणे अत्यंत फायदेशीर आहे. म्हणून, ज्या लोकांना रक्तातील साखरेची समस्या आहे त्यांना सकाळपासूनच तुळशीचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

पचन समस्या दूर करते

जर तुम्ही दररोज तुळशीच्या पाण्याचे सेवन केले तर तुमच्या शरीरात गॅस व बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. ज्यामुळे पचन क्रिया ठीक राहते. तुळशीच्या पाण्यात अ‍ॅसिड रिफ्लेक्स आढळतो, ज्यामुळे पोट स्वच्छ राहते आणि अन्नही योग्य पचते. म्हणूनच, सकाळी उठल्यानंतर एक ग्लास तुळशीचे पाणी प्या.

वजन कमी करण्यास मदत करते

वाढते वजन सर्वांसाठी मोठी समस्या आहे. हे वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपायांचा अवलंब करतो, पण काही फायदा होत नाही. मात्र तुळस ही एक अशी वनस्पती आहे जी आपले कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. तुळशीमध्ये नैसर्गिक रसायने असल्याने नियमित तुळशीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.

दम्याच्या आजारात तुळशीचे पाणी प्रभावी

तुळशीचे पाणी दमा, श्वास लागणे आणि थंड सर्दी या आजारांसाठी रामबाण उपाय मानले जाते. तुळशीमध्ये एक्सपेक्टोरेंट, अंटीट्यूसिव आणि इम्यूनोमोडायलेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे दम्याचा आजार रोखण्यास मदत होते. याशिवाय हिवाळ्यात तुळशीचे पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. (Tulsi water, which is beneficial for health, will have tremendous benefits)

इतर बातम्या

Wagon R EV : टोयोटाची इलेक्ट्रिक कार भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या काय असेल खास?

Supreme Court | देशातील कोरोना परिस्थितीची सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.