AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care | आरोग्यासाठी लाभदायी तुळशीचे पाणी, मिळतील हे जबरदस्त फायदे

तुळशीत अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आणि अँटी-ऑक्सिडेंट पोषक तत्व आहेत. जे शरीरातील वाईट घटक दूर करण्यात मदत करतात. (Tulsi water, which is beneficial for health, will have tremendous benefits)

Health Care | आरोग्यासाठी लाभदायी तुळशीचे पाणी, मिळतील हे जबरदस्त फायदे
तुळशीशिवाय अपूर्ण असते भगवान विष्णूची पूजा
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 29, 2021 | 11:03 PM
Share

नवी दिल्ली : आपल्या घरात तुळस असते. तुळशीचे धार्मिक आणि आरोग्यदायी असे बरेच फायदे आहेत. तुळस पवित्र मानली जाते. तुळस औषध म्हणूनही काम करते. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदानुसार, तुळशी औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. अशा परिस्थितीत तुळशीचे पाणी शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही सकाळी उठलात आणि एक ग्लास तुळशीच्या पाण्याचे सेवन केले तर तुमच्या शरीरासाठी ते चांगले आहे. (Tulsi water, which is beneficial for health, will have tremendous benefits)

तुळशीच्या पाण्याने शरीरात उर्जा निर्माण होते

तुळशीत अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आणि अँटी-ऑक्सिडेंट पोषक तत्व आहेत. जे शरीरातील वाईट घटक दूर करण्यात मदत करतात. आपण तुळशीचे पाणी प्यायल्यास ते आपल्या शरीरात उर्जा टिकून राहते. तुळशीचा उपयोग प्रत्येक घरात औषध म्हणून केला जातो. दररोज सकाळपासून उठल्यानंतर, तुळशीचे पाणी प्यायल्याने दिवसभर आपणास ऊर्जा मिळते. कारण तुळशीमध्ये अशी अनेक पौष्टिक तत्वे असतात. ज्यामुळे आळस, तणाव आणि अशक्तपणा येत नाही. हेच कारण आहे की आपल्या शरीरात उर्जा कायम राहते. दररोज सकाळी तुळशीचे पाणी पिऊन तुम्ही स्वतःला ताणतणावमुक्त ठेवू शकता. कारण तुळशीमध्ये हार्मोन्स कोर्टिसोल असते ज्यामुळे ताण कमी होतो. तुळशीचे पाणी प्यायल्याने चिंता व नैराश्य कमी होते.

तुळशीमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते

रक्तातील साखरेची पातळी राखण्यास तुळशीचे पाणी मदत करते. शरीरातील साखरेचे ऊर्जेमध्ये परिवर्तित करते. म्हणजेच ब्लड शुगरच्या रुग्णांसाठी तुळशीचे पाणी पिणे अत्यंत फायदेशीर आहे. म्हणून, ज्या लोकांना रक्तातील साखरेची समस्या आहे त्यांना सकाळपासूनच तुळशीचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

पचन समस्या दूर करते

जर तुम्ही दररोज तुळशीच्या पाण्याचे सेवन केले तर तुमच्या शरीरात गॅस व बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. ज्यामुळे पचन क्रिया ठीक राहते. तुळशीच्या पाण्यात अ‍ॅसिड रिफ्लेक्स आढळतो, ज्यामुळे पोट स्वच्छ राहते आणि अन्नही योग्य पचते. म्हणूनच, सकाळी उठल्यानंतर एक ग्लास तुळशीचे पाणी प्या.

वजन कमी करण्यास मदत करते

वाढते वजन सर्वांसाठी मोठी समस्या आहे. हे वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपायांचा अवलंब करतो, पण काही फायदा होत नाही. मात्र तुळस ही एक अशी वनस्पती आहे जी आपले कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. तुळशीमध्ये नैसर्गिक रसायने असल्याने नियमित तुळशीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.

दम्याच्या आजारात तुळशीचे पाणी प्रभावी

तुळशीचे पाणी दमा, श्वास लागणे आणि थंड सर्दी या आजारांसाठी रामबाण उपाय मानले जाते. तुळशीमध्ये एक्सपेक्टोरेंट, अंटीट्यूसिव आणि इम्यूनोमोडायलेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे दम्याचा आजार रोखण्यास मदत होते. याशिवाय हिवाळ्यात तुळशीचे पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. (Tulsi water, which is beneficial for health, will have tremendous benefits)

इतर बातम्या

Wagon R EV : टोयोटाची इलेक्ट्रिक कार भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या काय असेल खास?

Supreme Court | देशातील कोरोना परिस्थितीची सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली