AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही अंडी खाण्याचे शौकीन आहात? मग ही बातमी वाचा

दिवसाला एकापेक्षा अधिक अंडी खाणं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. इतकच नाही तर हाय बीपी आणि हृदयासंदर्भात त्याचा धोका होऊ शकतो.

तुम्ही अंडी खाण्याचे शौकीन आहात? मग ही बातमी वाचा
sagar joshi
sagar joshi | Updated on: Dec 16, 2020 | 10:17 AM
Share

मुंबई: अंडी खाण्याचे फायदे डॉक्टरही आपल्याला सांगतात. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं. त्यामुळे अंडी आपल्या आरोग्यासाठीही खूप उपयुक्त ठरतात. पण अंडी खाताना तुम्ही करत असलेली चूक तुम्हाला चांगलीच महागातही पडू शकते! डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे रोज फक्त एक अंडं खाणं फायद्याचं आहे. तुम्ही नियमीत व्यायाम, रनिंग किंवा वॉकिंग करत नसाल तर दिवसभरात एकच अंड खा. (What should be taken care of while eating eggs every day?)

दिवसाला एकापेक्षा अधिक अंडी खाणं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. इतकच नाही तर हाय बीपी आणि हृदयासंदर्भात त्याचा धोका होऊ शकतो.

अंडी चांगली शिजवून खा

अंडी चांगली शिजवून मगच खावीत. कारण अंड्यांमध्ये साल्मोनेला नावाचा एक बॅक्टेरिया आढळून येतो. हा बॅक्टेरिया कोंबडीपासून अंड्यांमध्ये येतो. त्यामुळे अंडं चांगल्याप्रकारे शिजवून खाल्लं नाही तर तुम्हाला अनेक आजारांना सामोरं जावं लागू शकतं. या बॅक्टेरियामुळे फूड पॉयझनिंगही होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही अंड्याचं ऑम्लेट किंवा अन्य कुठलाही प्रकार खात असाल तर ते चांगल्या रितीनं शिजवूनच खा.

नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ हार्ट ने दिलेल्या माहितीनुसार अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे आपल्या शरिरात कॅलरीजचं प्रमाणही वाढतं. ज्या लोकांना हाय बीपी, मधुमेह आणि हृदयासंदर्भात आजार आहेत त्यांनी अंड्यातील पिवळा बलक खाणं टाळलं पाहिजे. पिवळा बलक खाल्ल्याने अशा रुग्णांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.

अंडी शिजवताना तापमान नियंत्रित ठेवा

अंडी शिजवताना त्याचं तापमान नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. कारण त्यातील अनेक पोषक घटक संपण्याची शक्यता असते. अंडी मायक्रोव्हेवमध्ये गरम करणं, फ्राय केल्यानं त्यातील पोषक तत्व कमी होतात.

तुम्हाला अंडी खाल्ल्यानंतर शरीर सुजने, उल्टी, खोकला, शिंक यांसारखे प्रकार होत असतील तर तुम्हाला अंड्याची अॅलर्जी आहे. अंड्यांमधील अल्ब्यूमिनमुळे असा प्रकार होऊ शकतो. त्याचबरोबर अंडी खाल्ल्यानं शरिरातील बायोटीन नामक K व्हिटामीन कमी होतं. बायोटीनमुळे शरिरात विटामिन H आणि विटामिन B7चं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे केस गळणे आणि त्वचेसंदर्भातील अनेक आजार होऊ शकतात.

संबंधित बातम्या:

सरकारच्या आदेशानुसार हॉटेल-रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्डमध्ये होणार बदल, सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम?

Lips Care | थंडीच्या दिवसांत अशाप्रकारे घ्या आपल्या नाजूक ओठांची काळजी!

What should be taken care of while eating eggs every day?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली