AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सैयारा पाहून का रडत आहेत तरूण? काय आहे नेमकी कथा, जाणून घ्या

अलीकडेच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या सैयारा चित्रपटाला पाहून तरुण ढसाढसा रडताना, मिठीमारताना आणि बेशुद्ध झालेले डझनभर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबाबत काही लोक तरुणांची टिंगल करताना दिसत आहेत, तर बरेच जण त्यांच्या भावनांच्या बाजूने उभे राहून वादविवाद करताना दिसत आहेत. पण या चित्रपटात असं काय आहे की तरुणांची अशी अवस्था होत आहे, याचं उत्तर प्रख्यात मानसशास्त्रज्ञांनी दिलं आहे.

सैयारा पाहून का रडत आहेत तरूण? काय आहे नेमकी कथा, जाणून घ्या
Why Are Youngsters Crying After Watching SaiyaraImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 25, 2025 | 10:27 AM
Share

अलीकडेच प्रदर्शित झालेला बॉलिवूड चित्रपट सैयारा पाहून ढसाढसा रडताना, मिठीमारताना आणि बेशुद्ध झालेल्या तरुणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा देखील सुरू आहे. काही लोक तरुणांच्या या प्रतिक्रियेला चित्रपटाच्या कथानकाशी भावनिक जोड मानत आहेत, तर काही जण याला तरुणांचा पूर्णपणे नाटकीपणा मानत आहेत. तरीही प्रश्न उभा राहतो की, या रोमँटिक प्रेमकथेचा शेवट देखील खूप सुखद आहे, तरीही अशी कोणती कारणे आहेत की तरुणांच्या अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत.

चित्रपट पाहून का रडत आहेत तरूण?

या संपूर्ण घटनाक्रमावर आता सर्वात अचूक उत्तर मानसशास्त्रज्ञांनी दिलं आहे. दिल्लीतील एका रुग्णालयातील क्लिनिकल सायकोलॉजीच्या डॉक्टरांनी एका वृत्तावाहिनीला सांगितले की, तरुण का रडत आहेत? याचं उत्तर कदाचित चित्रपटात अजिबात नाही. हा चित्रपट नाही, तर भूतकाळ आहे. हे अश्रू पडद्यावर घडणाऱ्या गोष्टींमुळे कमी आणि प्रेक्षकांच्या स्वतःच्या भूतकाळात लपलेल्या गोष्टींमुळे जास्त येत आहेत.

पुढे त्या सांगतात, ‘या भावना अवचेतनात आधीपासून असलेल्या न सुटलेल्या अनुभवांमधून येतात. जेव्हा लोक असा चित्रपट पाहतात जो त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील काही भाग दर्शवतो, तेव्हा त्या आठवणी पुन्हा उफाळून येऊ शकतात आणि एक खोलवरची प्रतिक्रिया जन्माला घालू शकतात.

जेव्हा सुखद अंत विसंगत वाटतो

आपल्यापैकी अनेकजण चित्रपटातील पात्रांशी जोडले गेलेले वाटतात. आपण त्यांच्या कथांमध्ये आपल्या कथांचे काही तुकडे पाहतो, पण जेव्हा चित्रपटाचा अंत सकारात्मक असतो आणि आपल्या खऱ्या आयुष्यातील कथा तशी नसते, तेव्हा यामुळे आपल्याला दुखापत, चिंता किंवा अगदी फसवणूक झाल्यासारखं वाटू शकतं. लोक विचार करू शकतात, मला असा अंत का मिळाला नाही? माझ्यासाठी असं कोणी का नव्हतं? हा विरोधाभास त्यांना त्यांच्या भूतकाळाचा बळी वाटायला लावू शकतो असे त्यांचे मत आहे.

असं झाल्यास काय करावं?

अशा गंभीर ट्रिगर्सचा अनुभव हा खोलवरच्या, न सुटलेल्या भावनिक वेदनांचा संकेत असू शकतो. जर कोणाला चित्रपट पाहताना पॅनिक अटॅक येत असतील किंवा खूप जास्त उदास वाटत असेल, तर त्यांनी समुपदेशनाचा विचार करावा. यात चित्रपटाचा प्रश्न नाही, तर तुम्ही ज्या वेदनांमधून गेला आहात त्यातून बाहेर पडण्याचा आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.