AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Family Tips : आजकालच्या पोरींना सासू-सासऱ्यांसोबत का राहायचं नसतं? ही 5 कारणं माहीत आहेत का?

साधारणपणे मुलं लग्नानंतर बायकोला घेऊन आईवडिलांसोबत राहतो. पत्नीनेही आईवडिलांची सेवा करावी अशी त्याची अपेक्षा असते. पण असंख्य मुली स्वतंत्र विचाराच्या असतात. त्यांना नोकरी आणि करिअर सांभाळायचं असतं. पण सासूसासऱ्यांना मात्र, सून घरातच राहावी असं वाटत असतं. त्यामुळे या मुली सासूसासऱ्यांपासून वेगळं राहण्याचा प्रयत्न करतात.

Family Tips : आजकालच्या पोरींना सासू-सासऱ्यांसोबत का राहायचं नसतं? ही 5 कारणं माहीत आहेत का?
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 2:28 PM
Share

आजच्या काळात कौटुंबिक गोष्टीत अनेक बदल झाला आहे. पूर्वी संयुक्त कुटुंब असायचं. सर्व लोक एकत्रितपणे घरात गुण्यागोविंदाने राहायचे. कोणताही वाद नव्हता. सर्वांचा एकोपा होता. मात्र, काळानुसार अनेक गोष्टी बदलत गेल्या. शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि नोकरीसाठी कुटुंब पद्धती विघटन झाली. अनेक लोक नोकरीसाठी शहरात येऊ लागले. संसार थाटू लागले. त्यावेळीही लग्न झालेल्या मुली सासू-सासऱ्यांचा सांभाळ करायच्या. त्यांच्यासोबत राहायच्या. आता पिढी बदलली आणि सर्वच बदललं. आजकालच्या मुली या संयुक्त कुटुंबात राहायला मागत नाहीत. सासूसासरे त्यांना नको असतात. त्यांना वेगळं राहायला आवडतं. आजकालच्या मुली सासू सासऱ्यांसोबत का राहत नाहीत? काय आहेत त्यामागची कारणे. कोणती पाच कारणे आहेत?

स्वातंत्र्यावर गदा

सध्याचं युग हे प्रगत युग आहे. त्यामुळे मुलं असो वा मुली स्वतंत्र विचार करत असतात. त्यांची स्वत:ची ऐक जीवनशैली असते. त्यानुसार ते वागत असतात. त्यांच्या स्वत:च्या म्हणून काही भूमिका असतात. त्यांना आपल्या पसंतीने काही गोष्टी व्हाव्या असं वाटत असतं. त्यामुळेच मुलीही हल्ली मनाप्रमाणे नवरा निवडत असतात. प्रेमप्रकरण असेल तर ब्रेकअप कधी घ्यायचा हेही त्यांना माहीत असतं. लग्नानंतरही या मुलींना स्वातंत्र्य हवं असतं. त्यांना त्यांचा स्पेस हवा असतो. पण काही घरात अजूनही सासू आणि सासऱ्यांचीच मक्तेदारी घरात चालत असते. त्यामुळे या महिला वैतागतात. त्यांना लादणं हा प्रकार आवडत नाही. स्वातंत्र्य हवं असतं. एखादा निर्णय घेताना आपल्यालाही विचारात घेतलं पाहिजे असं वाटत असतं. पण सर्व काही उलट घडत असल्याने त्यांची गळचेपी होत असते.

जनरेशन गॅप

जनरेशन गॅप हा मुली सासू सासऱ्यांसोबत न राहण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सासू-सासरे जुन्या वळणाचे असतात. ते आजच्या गोष्टी समजून घेत नाहीत. नव्या गोष्टी ते अॅडजस्ट करत नाहीत. तर आजच्या मुली या जुन्या वळणाने जायला मागत नाहीत. त्यांना प्रथा परंपरा आणि घरातील नियम आवडत नाहीत. त्या बंधनात अडकायला आवडत नाहीत. त्यांचा घरातील जुन्या लोकांच्या विचारधारेशी ताळमेळ होत नाही. त्यामुळे ताण तणाव निर्माण होतो.

नवऱ्यासोबत वेळ घालवता न येणं

संयुक्त कुटुंबात मुलींना स्पेस मिळत नाही. त्यांना नवऱ्यासोबत एकांतात वेळ घालवता येत नाही. नवऱ्या भोवती घरातील मंडळीचा सतत घोळका असतो. त्यामुळे नवऱ्याशी मनातील गोष्टीही बोलता येत नाही. अडचणी सांगता येत नाही. किंवा कुठे फिरायलाही जाता येत नाही. त्यामुळे नवऱ्यासोबत वेळ घालवण्यासाठीही या मुली सासू-सासऱ्यांसोबत राहायला मागत नाहीत.

नवरा-बायकोत ढवळाढवळ

दोन अनोळखी लोक लग्नाच्या बंधनात अडकतात. त्यावेळी त्यांच्यात गोडवाही निर्माण होतो आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून खटकेही उडत असतात. जेव्हा दाम्प्त्य वेगळं राहतं तेव्हा ते एकमेकांशी संवाद साधून त्यावरून मार्ग काढतात. पण सासू-सासऱ्यांसोबत राहिल्याने त्यांची प्रायव्हेसीही कमी होते. सासू-सासरे हे मुलगा आणि सुनेच्या वादात हस्तक्षेप करतात. मुलींना या गोष्टी आवडत नाहीत. नवरा बायकोच्या वादात तिसरे लोक कशाला? अशी त्यांची भूमिका असते. पण तरीही दोघेही दाखवण्यासाठी एकत्र असल्याचा आव आणतात. पण नात्यातून पाणी बरंच वाहून गेलेलं असतं.

करिअर

आजच्या मुली करिअरबाबत फार गंभीर असतात. त्यांना नोकरी करायला आवडतं. अनेकदा तर नवरा बायको दोघे मिळून नोकरी करत असतात. दोघेही घर सांभाळत असतात. पण जेव्हा मुली सासू-सासऱ्यांसोबत राहतात तेव्हा सासू-सासरे त्यांना नोकरी सोडण्यासाठी दबाव आणतात. त्यांना नोकरी आणि करिअर करण्यात अडथळा होतात. सुनेने घर आणि मुल सांभाळावं असं त्यांना वाटतं. पण मुलींना मात्र आपलं करिअर सांभाळून सर्व करायचं असतं. परिणामी घरात खटके उडतात. त्यामुळे या तरुणी वैतागतात. त्यांचे वाद सुरू होतात.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार