AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोड खाल्ल्यावर लगेच झोप का येते? 99% लोकांना माहीत नाही यामागचं खरं कारण

गोड पदार्थ खाणे अनेकांना आवडते, पण गोड खाल्ल्यानंतर लगेच झोप येते, हे तुम्हाला माहीत आहे का? यामागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत. याला गैरसमज मानण्यापेक्षा, चला तर मग यामागची खरी कारणे आणि शरीरातील होणारे बदल सविस्तरपणे जाणून घेऊया.

गोड खाल्ल्यावर लगेच झोप का येते? 99% लोकांना माहीत नाही यामागचं खरं कारण
Health Tips
| Edited By: | Updated on: Aug 03, 2025 | 3:03 PM
Share

गोड पदार्थ खायला जवळपास सगळ्यांनाच आवडतात. पण तुम्ही कधी अनुभवले आहे का की, गोड खाल्ल्यानंतर लगेचच झोप येऊ लागते? अनेकांना हे केवळ एक गैरसमज वाटतो, पण यामागे काही वैज्ञानिक कारणे आहेत. गोड खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे शरीरात काही हार्मोनल बदल होतात आणि सुस्तपणा येतो. चला तर, यामागील खरी कारणे सविस्तरपणे जाणून घेऊया.

1. वाढलेली ब्लड शुगर आणि इन्सुलिन

मिठाईमध्ये जास्त प्रमाणात साखर असते. गोड खाल्ल्यानंतर शरीरातील रक्तातील साखर अचानक वाढते. या वाढलेल्या साखरेला नियंत्रित करण्यासाठी शरीर इन्सुलिन नावाचं हार्मोन सोडतं. इन्सुलिन साखरेला पेशींमध्ये घेऊन जाऊन ऊर्जेमध्ये रूपांतरित करतं. या प्रक्रियेसोबतच, मेंदूमधील असे हार्मोन वाढतात जे तुम्हाला आराम आणि झोप आल्यासारखं वाटायला लावतात.

2. सेरोटोनिन हार्मोनची भूमिका

आरोग्य तज्ज्ञांनुसार, गोड खाल्ल्यावर रक्तातील ट्रिप्टोफॅन नावाच्या अमिनो ॲसिडचं प्रमाण वाढतं. हे ट्रिप्टोफॅन मेंदूत जाऊन सेरोटोनिन नावाच्या न्यूरोट्रान्समीटरमध्ये बदलतं. सेरोटोनिनमुळे मूड चांगला राहतो आणि आराम मिळतो. हा हार्मोन मेलाटोनिन हार्मोनच्या निर्मितीलाही चालना देतो, जो झोपेचं नियमन करतो. म्हणूनच गोड खाल्ल्यावर शांत वाटतं आणि झोप येऊ लागते.

3. ब्लड शुगर क्रॅश आणि थकवा

गोड खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी जितक्या वेगाने वाढते, तितक्याच वेगाने ती खाली येते. यालाच ‘ब्लड शुगर क्रॅश’ म्हणतात. जेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी अचानक खाली येते, तेव्हा शरीर खूप थकून जातं आणि सुस्त वाटू लागतं. या थकव्यामुळेही झोप येते. त्यामुळे गोड खाल्ल्यानंतर येणारी झोप ही शरीरातील ऊर्जेच्या चढ-उतारांमुळेही येते.

4. पचनक्रियेवरील ताण

गोड पदार्थ खाल्ल्यावर शरीर ते पचवण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करतं. पचन होत असताना, रक्ताभिसरण पचनसंस्थेकडे जास्त होतं आणि मेंदूकडे कमी. यामुळे मेंदूला सुस्त वाटतं आणि झोप येऊ लागते. म्हणूनच, जेवण झाल्यावर किंवा गोड खाल्ल्यावर लगेचच आराम करण्याची इच्छा होते.

यावर उपाय काय?

1. गोड खाल्ल्यावर लगेच झोप येण्यापासून वाचण्यासाठी गोड पदार्थ कमी प्रमाणात खा.

2. आहारात फायबर आणि प्रोटीन असलेले पदार्थ जास्त घ्या, ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते.

3. गोड खाल्ल्यानंतर थोडं चालणं किंवा हलका व्यायाम केल्यास मदत होते.

4. दिवसभर पुरेसं पाणी प्या आणि झोपेचं वेळापत्रक नियमित ठेवा.

जर तुम्ही वारंवार गोड खाऊन झोपत असाल, तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं आणि तुमच्या चयापचय क्रियेवर परिणाम करू शकतं.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.