AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ गावात कधीच पाऊस पडत नाही, कारण जाणून घ्या

या गावाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे कधीच पाऊस पडत नाही. याचे कारण म्हणजे हे गाव ढगांच्या माथ्यावर वसलेले आहे. या गावाखाली ढग तयार होऊन पाऊस पडतो. इथलं दृश्य असं आहे की जे तुम्ही क्वचितच कुठेही पाहिलं असेल.

‘या’ गावात कधीच पाऊस पडत नाही, कारण जाणून घ्या
फोटो सौजन्य - फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Mar 07, 2025 | 3:01 PM
Share

आज आम्ही तुम्हाला एका खास गावाची माहिती सांगणार आहोत. जगात अशीही काही ठिकाणे आहेत जिथे वर्षभर सर्वाधिक पाऊस पडतो. उदाहरणार्थ, मेघालयातील मासिनराम गाव, जिथे जगात सर्वाधिक पाऊस पडतो. परंतु तुम्ही कधी अशा ठिकाणाबद्दल ऐकले आहे का जिथे कधीही पाऊस पडत नाही? हे ठिकाण वाळवंट आहे असं नाही, तर हे एक गाव आहे, जिथे लोक राहतात. हे गाव पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 3200 मीटर उंचीवर वसलेले आहे. याविषयी जाणून घेऊया.

येमेनची राजधानी सनाच्या पश्चिमेला मांख संचालनालयाच्या हर्ज भागात वसलेल्या अल-हुतैब असे या गावाचे नाव आहे. पर्यटक अनेकदा येथे येऊन नेत्रदीपक दृश्याचा आनंद घेतात. डोंगरमाथ्यावर इथं इतकी सुंदर घरं बांधलेली आहेत, जी लोक पाहत राहतात. याविषयी पुढे अधिक विस्ताराने जाणून घेऊया.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अल-हुतैब या गावात कधीच पाऊस पडत नाही कारण हे गाव ढगांच्या वर वसलेले आहे. या गावावर पावसाचे ढग कधीच तयार होत नाहीत. गावाच्या खाली नेहमीच ढगाळ वातावरण असते, त्यामुळे सखल भागात पाऊस पडतो पण गावात कधीच पाऊस पडत नाही.

अल-हुतैब हे गाव पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 3200 मीटर उंचीवर वसलेले आहे. गावाभोवतीचे वातावरण खरोखरच उबदार आहे. हिवाळ्यात सकाळच्या वेळी वातावरण खूप थंड असले तरी सूर्य उगवताच लोकांना उकाड्याला सामोरे जावे लागते.

ग्रामीण आणि शहरी वैशिष्ट्यांसह प्राचीन आणि आधुनिक वास्तुकलेची सांगड घालणारे हे गाव आता ‘अल-बोहरा किंवा अल-मुकारामा’ लोकांचा बालेकिल्ला बनले आहे. त्यांना येमेनी समुदाय म्हणतात.

येमेनी समाज हा मुंबईत वास्तव्यास असलेल्या मोहम्मद बुरहानुद्दीन यांच्या इस्माईली (मुस्लिम) पंथातील आहे. 2014 मध्ये मृत्यू होईपर्यंत ते दर तीन वर्षांनी या गावाला भेट देत असत.

अल-हुतैब या गावाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे कधीच पाऊस पडत नाही. याचे कारण म्हणजे हे गाव ढगांच्या माथ्यावर वसलेले आहे. या गावाखाली ढग तयार होऊन पाऊस पडतो. इथलं दृश्य असं आहे की जे तुम्ही क्वचितच कुठेही पाहिलं असेल.

हिवाळ्यात सकाळचे वातावरण एकदम थंड असते, पण जसजसा सूर्य उगवतो तसतशी उष्णता वाढते. हे गाव ‘अल-बोहरा किंवा अल-मुकारामा’ समुदायाच्या लोकांचा बालेकिल्ला आहे. या लोकांना ‘येमेनी समुदाय’ असेही म्हटले जाते.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.