AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Children Vaccination | आजपासून राज्यात लहान मुलांचे लसीकरण, नावनोंदणी कशी करावी, लस नेमकी कोणाला मिळणार ?

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ओमिक्रॉनचे संकटही आणखी वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी लहान मुलांचे आजपासून लसीकरण केले जाणार आहे. संपूर्ण राज्यात यासाठी खास नियोजन करण्यात आले आहे.

Children Vaccination | आजपासून राज्यात लहान मुलांचे लसीकरण, नावनोंदणी कशी करावी, लस नेमकी कोणाला मिळणार ?
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 7:17 AM
Share

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ओमिक्रॉनचे संकटही आणखी वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी आजपासून लहान मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. संपूर्ण राज्यात यासाठी खास नियोजन करण्यात आले आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी कोवीनवर नाव नोंदणी करता येते. तसेच ऑफिलाईन पद्धतीने प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊनही लस देण्याची सुविधा करण्यात आलीय. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसारख्या मोठ्या शहरांसह पूर्ण राज्यात 15 ते 18 वर्षे या वयोगटातील मुलांचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे उद्दीष्ट सरकारने समोर ठेवले आहे.

नावनोंदणी कशी करावी ?

संपूर्ण देशात लहान मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्याचे निर्देश केंद्र सरकारने यापूर्वी दिलेले आहेत. केंद्राच्या सूचनेप्रमाणे लहान मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी https://www.cowin.gov.in या वेबसाईटवर जाऊन नावनोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येते. 15 ते 18 वर्षे या वयोगटातील मुलांचे आधारकारर्ड तसेच आधारकार्ड नसेल तर शाळेतील ओळखपत्राच्या मदतीने लसीसाठी नाव नोंदवता येते. कोवीन या वेबसाईटवर गेल्यानंतर अॅड मोअर या बटनावर क्लिक करुन एका मोबाईल क्रमांकाच्या मदतीने चार मुलांच्या लसीकरणासाठी नोंद केली जाऊ शकते.

लस कोणाला मिळणार ?

लहान मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली असली तरी 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना लस दिली जाणार नाही. ज्या मुलांचा जन्म 2007 साली किंवा त्यापूर्वी झालेला आहे, ही मुलं लस घेण्यास पात्र आहेत. त्यासाठी मुलांकडे शाळेच ओळखपत्र किंवा आधारकार्ड असणे अनिवार्य आहे. मुलांना कोव्हॅक्सिन लसीचे डोस देण्यात येणार आहेत. तसेच पालकांच्या तसेच मुलांच्या मोबाईल क्रमांकावरुन लसीकरणासाठी नावनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

15 ते 18 वयोगटातील मुले किती?

राज्यात 15 ते 18 वयोगटातील 60.63 लाख मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. यात नांदेड 1 लाख 81 हजार, जालना 1 लाख 9 हजार, लातूर 1 लाख 34 हजार, उस्मानाबाद 86 हजार, हिंगोली 65 हजार, बीड 1 लाख 42 हजार, परभणी 1 लाख1 हजार, नाशिक 3 लाख 43 हजार, मुंबई 6 लाख 12 हजार, पुणे 5 लाख 53 हजार अमरावती 49 हजार मुलांना डोस दिला जाईल. तर औरंगबााद जिल्ह्यात 2 लाख 13 हजार 823 मुलांचे लसीकरण केले जाईल.

इतर बातम्या :

Maharashtra News Live Update : नाशिकमध्ये वस्तीगृहातील 17 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह

टाटा मोटर्स बनली देशातील सर्वाधिक वाहन विक्री करणारी कंपनी; गेल्या महिन्यात तब्बल 35,300 गाड्यांची विक्री

500 चौ. फुटांच्या घरांसाठी घेतलेले पैसे परत करा, मालमत्ता करमाफीच्या निर्णयानंतर खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक

नरहरी झिरवाळ 2 दिवसांपासून कुठे? दादांचे नेते मौन का?
नरहरी झिरवाळ 2 दिवसांपासून कुठे? दादांचे नेते मौन का?.
महायुतीतील वाद उफाळला! श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईकांना खुलं आव्हान
महायुतीतील वाद उफाळला! श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईकांना खुलं आव्हान.
कोसळल्यानंतर विमानाचे 3 स्फोट? नवा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ
कोसळल्यानंतर विमानाचे 3 स्फोट? नवा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ.
अलिबाग जमीन वाद; राऊत - नार्वेकरांमध्ये दावे - प्रतिदावे
अलिबाग जमीन वाद; राऊत - नार्वेकरांमध्ये दावे - प्रतिदावे.
भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचा दणदणीत विजय!
भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचा दणदणीत विजय!.
दादांच्या जाण्याने आपण पोरके झालो! सुनेत्रा पवार भावुक
दादांच्या जाण्याने आपण पोरके झालो! सुनेत्रा पवार भावुक.
ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवर संजय राऊतांचं 'रोखठोक'
ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवर संजय राऊतांचं 'रोखठोक'.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवांचं विमान टेकऑफवेळी डगमगलं
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवांचं विमान टेकऑफवेळी डगमगलं.
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.